यूजीसीच्या परीक्षा निर्णयाविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:00:12+5:30

राज्यात कोरोनाची परिस्थिती बघता या निर्णयामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. राज्य सरकारने विद्यार्थी हिताचा व आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने या निर्णयाचे समर्थन केले पाहिजे. परीक्षा घेताना कोणाला बाधा होणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे सध्या विलगीकरण केंद्र म्हणून उपयोगात आणली जात आहे.

Elgar against UGC's exam decision | यूजीसीच्या परीक्षा निर्णयाविरुद्ध एल्गार

यूजीसीच्या परीक्षा निर्णयाविरुद्ध एल्गार

ठळक मुद्देरायुकाँचा विरोध : घाटंजीतून एक हजार विरोधाची पत्रे पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : अंतिम वर्षाच्या परीक्षेचा यूजीसीने घतेलेला निर्णय अत्यंत धक्कादायक आहे. परीक्षेला पूरक वातावरण नाही. त्यामुळे त्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, यासाठी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस एक हजार पत्रे पाठविण्याचे आंदोलन सुरू केले.
राज्यात कोरोनाची परिस्थिती बघता या निर्णयामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. राज्य सरकारने विद्यार्थी हिताचा व आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने या निर्णयाचे समर्थन केले पाहिजे. परीक्षा घेताना कोणाला बाधा होणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे सध्या विलगीकरण केंद्र म्हणून उपयोगात आणली जात आहे. तसेच गावी परत गेलेल्या विद्यार्थ्यांना परत वसतिगृहात येणे वाहतूक व्यवस्थेअभावी अवघड आहे.
यूजीसीने परीक्षेचा निर्णय मागे घ्यावा व पुढील काळात कोरोनाचे संकट कमी होताच परीक्षा घ्याव्या, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली. त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रितेश बोबडे यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष प्रणव भारती, विराज निवल, शिवम ठाकरे, नीलेश दुल्लरवार, प्रणय शेंद्रे, विवेक गडे, विक्की चव्हाण, मंगेश निकोडे, सूरज मोतेवार, सचिन आणेवार, नयन गाडे, हर्षल गजबे आदींनी आंदोलन केले.

Web Title: Elgar against UGC's exam decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.