शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या जागा शंभर टक्के भरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 05:00 IST

प्रत्यक्षात जिल्ह्यात ११ वीचे वर्गही सुरू करण्यात आले आहे. शहरी भागातील महाविद्यालयांची जेवढी मंजूर ‘इनटेक कॅपेसिटी’ आहे, तेवढे विद्यार्थी प्रवेशित झाले आहे. ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांची देखील परिस्थिती अशीच आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये मंजूर जागांपेक्षा कमी प्रवेश झाल्याचे वास्तव आहे. मात्र यंदाच्या प्रवेश संख्येबाबत अद्याप शिक्षण विभागाने प्रत्यक्ष पडताळणी केलेली नाही. ती झाल्यावरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. 

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची चिंताच मिटली : दहावी उत्तीर्णांपेक्षा अधिक जागा

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात यंदाही अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात आली. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे सुरुवातीला महाविद्यालय स्तरावरून विद्यार्थ्यांना लिंक पाठवून ऑनलाइन अर्ज मागविले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या अकरावीच्या सर्व जागा भरल्या असून अद्यापही उरलेल्या काही विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.यंदा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेतून एकंदर ३६ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्यासाठी अकरावीच्या विज्ञान, कला, वाणिज्य शाखांच्या तब्बल ३९ हजार ७६० जागा उपलब्ध आहेत. शिवाय एमसीव्हीसीच्याही अडीच हजार जागा आहेत. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही.प्रत्यक्षात जिल्ह्यात ११ वीचे वर्गही सुरू करण्यात आले आहे. शहरी भागातील महाविद्यालयांची जेवढी मंजूर ‘इनटेक कॅपेसिटी’ आहे, तेवढे विद्यार्थी प्रवेशित झाले आहे. ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांची देखील परिस्थिती अशीच आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये मंजूर जागांपेक्षा कमी प्रवेश झाल्याचे वास्तव आहे. मात्र यंदाच्या प्रवेश संख्येबाबत अद्याप शिक्षण विभागाने प्रत्यक्ष पडताळणी केलेली नाही. ती झाल्यावरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. 

शिक्षक संख्येवर परिणाम नाहीजिल्ह्यात अकरावीच्या तुकड्या असलेले ३२२ महाविद्यालये आहेत. मात्र, सर्वच महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या जागा भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे संचमान्यतेचा प्रश्न निर्माण होऊन शिक्षक संख्या कमी होण्याची शक्यता नसल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

मागील वर्षाची स्थितीयंदाप्रमाणेच मागील वर्षीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या जागा अधिक होत्या. यंदा संपूर्ण जागा भरल्या असून काही दिवसांपूर्वी ज्यांनी आयटीआयला अर्ज टाकला मात्र आता आयटीआयला नंबर लागला नाही, असे विद्यार्थी आता अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनाही प्रवेश दिला जात आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र