शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

कोविडनंतर आठ टक्के मुलींनी सोडले शिक्षण; 'असर'चा निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 14:17 IST

पाच वर्षांत सहा टक्क्यांनी वाढले ‘शाळाबाह्य’चे प्रमाण

अविनाश साबापुरे

यवतमाळ : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत देशभरातील शिक्षण क्षेत्राची त्रेधा उडविली. यातच तब्बल ७.९ टक्के मुलींनी दहावीनंतर शाळा सोडली, तर दोन टक्के मुलींनी आठवीनंतर शिक्षण सोडल्याची गंभीर आकडेवारी पुढे आली आहे. प्रथम फाउंडेशनने बुधवारी जाहीर केलेल्या ‘असर’ अहवालातून ही आकडेवारी पुढे आली आहे.

प्रथम संस्थेने २०२२ या वर्षभरातील देशातील शैक्षणिक परिस्थितीचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सर्वे केला. त्यासाठी देशभरातील ६१६ जिल्ह्यांतील १९ हजार ६० खेड्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या गेल्या. २७ हजार ५३६ स्वयंसेवकांनी देशातील सहा लाख ९९ हजार ५९७ विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन हे सर्वेक्षण केले. त्यातून शालेय शिक्षणाची कोविडनंतरची परिस्थिती पुढे आणणारा असर (ॲन्यूअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट) अहवाल शासनाला बुधवारी सादर करण्यात आला.

या अहवालानुसार २०१६ मध्ये १६.१ आणि २०१८ मध्ये १३.५ टक्के १६ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनी शाळाबाह्य होत्या. मधली दोन वर्षे कोरोनामुळे शाळाच बंद होत्या. तर २०२२ मध्ये मात्र १६ वर्षे वयोगटातील ७.९ टक्के विद्यार्थिनी शाळाबाह्य असल्याचे पुढे आले आहे. याच वयोगटातील सात टक्के मुलेही दहावीनंतर शाळेतच गेलेले नाहीत. मागील दोन सर्वेक्षणाच्या तुलनेत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण २०२२ मध्ये घटल्याचे दिसत असले तरी २०१८ या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत २०२२ मधील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनानंतर परत शाळेत जाण्यापेक्षा अनेक मुलींचे लग्न आटोपल्याची शक्यता या अहवालातून पुढे आली आहे. दहा राज्यात शाळा सोडणाऱ्या मुलींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

कोणत्या राज्यात किती मुली शाळाबाह्य

*राज्य - सरासरी*

  • राजस्थान - ९.४ टक्के
  • छत्तीसगड - ११.१ टक्के
  • ओडिशा - ७.३ टक्के
  • झारखंड - ५.२ टक्के
  • बिहार - ६.७ टक्के
  • गुजरात - ८.० टक्के
  • उत्तरप्रदेश - १५.० टक्के
  • पश्चिम बंगाल - २.६ टक्के
  • मध्यप्रदेश - १७.० टक्के
  • आंध्रप्रदेश - २.० टक्के

 

गुरुजींची हजेरी मात्र वाढली

कोरोनाकाळानंतर शाळेतील शिक्षकांच्या हजेरीत मात्र वाढ झाली आहे. असर अहवालानुसार २०१० मध्ये प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या वर्षभरातील उपस्थितीचे प्रमाण ८६.४ टक्के होते. २०१४ आणि २०१८ मध्येही हे प्रमाण ८५.८ टक्के होते. परंतु २०२२ च्या ताज्या अहवालानुसार शिक्षकांच्या उपस्थितीचे प्रमाण ८७.५ टक्के नोंदविले गेले. विशेष म्हणजे, याच कालावधीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाणही वाढले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळा