शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

मनसंवर्धनानेच प्रभावी जलसंधारण शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:25 PM

ऑनलाईन लोकमतकळंब : भविष्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. गावकऱ्यांच्या मनसंवर्धनानंतरच प्रभावी जलसंधारणाची बिजे रोवली जाईल, असा विश्वास पाणी फाऊंडेशनचे डॉ.अविनाश पोळ यांनी व्यक्त केला.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-२०१८ अंतर्गत येथे आयोजित तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी ...

ठळक मुद्देअविनाश पोळ : कळंब येथे वॉटर कप स्पर्धेची तालुकास्तरीय बैठक

ऑनलाईन लोकमतकळंब : भविष्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. गावकऱ्यांच्या मनसंवर्धनानंतरच प्रभावी जलसंधारणाची बिजे रोवली जाईल, असा विश्वास पाणी फाऊंडेशनचे डॉ.अविनाश पोळ यांनी व्यक्त केला.सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-२०१८ अंतर्गत येथे आयोजित तालुकास्तरीय बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, उपसभापती महादेव काळे, पंचायत समिती सदस्य विलास राठोड, स्वाती दरणे, पूजा शेळके, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, वनपरिक्षेत्राधिकारी विनय वानखडे, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मंगला उईके, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता उदगवार आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले, पाणी फाऊंडेशनच्या कार्यात सर्व विभाग महत्वपूर्ण योगदान देतील. तशा सूचनाही त्यांनी अधिकाºयांना दिल्या. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तहसीलदार रणजित भोसले यांनी तर, आभार सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी यांनी मानले. कार्यशाळेला कृषी विभाग, पंचायत विभाग व महसूल विभागाचे कर्मचारी, सरपंच, प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी आणि गावकरी उपस्थित होते.