शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

जिल्हा प्रशासन ‘मिशन मोड’मुळे झाले गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:13 PM

जिल्हा प्रशासनाने कात टाकली असून सर्वच क्षेत्रात तीन महिन्यात उल्लेखनीय कामगिरीचा टप्पा गाठला. आता ‘मिशन मोड’ पद्धतीचा अवलंब करून कामकाज केले जात आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यातच बदल : तासन्तास चालणाऱ्या बैठका अर्ध्या तासात पूर्ण, जिल्हाधिकाºयांचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्हा प्रशासनाने कात टाकली असून सर्वच क्षेत्रात तीन महिन्यात उल्लेखनीय कामगिरीचा टप्पा गाठला. आता ‘मिशन मोड’ पद्धतीचा अवलंब करून कामकाज केले जात आहे. पूर्वी मुख्यालयात तासन्तास चालणाºया आढावा बैठका आता अर्ध्या तासात आटोपून खºया अर्थाने कामासाठी वेळ दिला जात आहे. यामुळे संगणकीकृत गाव शेततळे, नरेगाची वेळेत मजुरी, अशा विविध योजनांनी गती पकडली आहे.जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा काही दिवसापूर्वी प्रचंड दबावात व तणावात कार्यरत होती. यामुळे दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला होता. जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी पदभार स्वीकारताच यंत्रणेत सहकार्याची भावना निर्माण करून कामकाजाची गती वाढविण्यास प्रोत्साहन दिले. संगणकीकृत गाव यामध्ये सप्टेंबरपर्यंत केवळ ७९९ गावे झाली होती. आता केवळ तीन महिन्यात दोन हजार ८५ गावे रिएडीट आज्ञावलीअंतर्गत संगणकीकृत झाली. यात जिल्ह्याने राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला.शेततळे निर्मितीसाठी एसडीओंनी पुढाकार घेतला असून तीन महिन्यात २५० शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्णत्वास नेले आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जॉब कार्डची पडताळणी पूर्ण करून मजुरी वितरण नियमित केले आहे. बीएलओच्या कामाला शिक्षकांनी विरोध केला होता. मात्र यात जिल्ह्याने इतर पाच मतदारसंघाच्या तुलनेत आघाडी घेतली असून मुख्य निवडणूक आयुक्तांकडून शाबासकी मिळाली.प्रत्येक सोमवारी आढावा बैठक होत असून ठळक मुद्यांवरच आवश्यक ते निर्देश देऊन निकाली काढली जाते. महत्त्वाच्या मुद्यांवर तालुका व उपविभाग स्तरावरील अधिकाऱ्यांना बोलविण्याऐवजी ‘व्हीसी’व्दारे आढावा घेतला जातो. यामुळे सर्वच घटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.तहसील कार्यालय व इतर यंत्रणेतील पेंडन्सी दूर करण्यासाठी कर्मचाºयांना प्रोत्साहित केले असून आठवड्यातील सुट्यांच्या दिवशी जुने काम हातावेगळे केले जात आहे. महिला वर्गही या मिशनमध्ये उत्स्फूर्त सहभागी झाला आहे.निवेदन घेऊन येणाऱ्यांसाठी अर्जंट रेफरन्सछोट्याछोट्या समस्या घेऊन सामान्य नागरिक जिल्हा मु्ख्यालयी येतात. त्यांचे अर्ज, निवेदने निकाली काढण्यासाठी ‘अर्जंट रेफरन्स’ हे सॉफ्टवेअर विकसित केले असून संकीर्ण अंतर्गत नोंद घेतली जाते. प्रत्येक दिवशी त्या विभागाकडे अर्जाच्या पूर्ततेबाबत पाठपुरावा होतो.प्रशासनाकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी छोटे छोटे फेरबदल केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून तीन महिन्यांतच जिल्हा राज्य पातळीवर पहिल्या पाचमध्ये आहे. यासाठी कर्मचारी व अधिकाºयांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.’- डॉ.राजेश देशमुख,जिल्हाधिकारी, यवतमाळ