शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

टंचाईत आर्णीला दिलासा

By admin | Updated: February 29, 2016 02:06 IST

सतत पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देणाऱ्या आर्णीकरांना येत्या उन्हाळ्यात मात्र काहीसा दिलासा मिळणार आहे.

दररोज पाणी : अरुणावती प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडलेआर्णी : सतत पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देणाऱ्या आर्णीकरांना येत्या उन्हाळ्यात मात्र काहीसा दिलासा मिळणार आहे. अरुणावती प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने शहरात दररोज पाणीपुरवठा होण्याची शक्यता वाढली आहे. आर्णी शहरात १६ विहिरी व सात बोअरवेलच्या माध्यमातून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळा नसतानाच ही परिस्थिती असल्याने उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाईमध्ये पाणीपुरवठ्याचे काय होणार याची चिंता नगरपरिषदेला सतावत होती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन महत्त्वाच्या विहिरी अरुणावती नदीपात्राला लागून आहे. या विहिरींच्या बळावरच जवळपास ५० टक्के शहराला पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या विहिरींची पातळी कमी झाल्याने पाणीपुरवठ्याची समस्या गंभीर बनली होती. काही भागात तर तब्बल आठ-आठ दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात होता. या परिस्थितीवर उपाय म्हणून अरुणावती प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडणे हा पर्याय पुढे आला. त्यामुळे नगरपरिषदेकडून तातडीने अरुणावती प्रकल्पाला पत्र देवून पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली. आरक्षित पाणीसाठा यावर्षी वाढविण्याची विनंतीही पत्रात करण्यात आली. मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता यवतमाळ, पाटबंधारे मंडळ, कार्यकारी अभियंता अरुणावती प्रकल्प दिग्रस यांना २६ फेब्रुवारीला पत्र पाठविले. याची दखल घेत लगेच प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. कोरडे पडलेले अरुणावती नदीचे पात्र सध्या भर उन्हाळ्यात दुथडी भरून वाहात आहे. यामुळे नदीला लागून असलेल्या विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी वाढण्यासाठी फायदा होणार आहे. जनावरांनासुद्धा पाणी मिळण्याची सोय होणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात नदीपात्र पाण्याने भरलेले पाहून आर्णीकर नागरिक सुखावले आहेत.(शहर प्रतिनिधी)