शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोरोनाला घाबरू नका, पण खबरदारी जरूर बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 6:00 AM

वातावरणातील सततच्या बदलाने सर्दी पडसा, खोकला हे आजार होतात. अशीच लक्षणे कोरोनातही दिसतात. अशावेळी हा रूग्ण सर्दी पडशाचा की कोरोनाचा, हे तपासण्यासाठी रूग्णाची ‘हिस्ट्री’ जाणून घेतली जाते. तो बाहेर देशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता का, तो बाहेर देशात गेला होता काय, हे पाहिले जाते. त्यानंतर उपचार केला जातो.

ठळक मुद्देसध्याच मास्क लावण्याची गरज नाही

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज आहे. कोणीही घाबरू नये.- डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्सकरुपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या दहशतीने जिल्ह्यात वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक जण सर्दी, खोकला आणि शिंका येणाऱ्या व्यक्तीकडे संशयाच्या नजरेने पाहात आहे. मुळात कोरोना आणि सर्वसामान्य आजार यात फरक आहे. घाबरण्याचे कारण नाही. मात्र खबरदारी घ्यावीच लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे लागणार आहे. स्वच्छता पाळावी लागणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्याशी साधलेला संवाद...सर्दी-खोकल्याचे रूग्ण आणि कोरोनाचे रूग्ण यात काय फरक आहे?वातावरणातील सततच्या बदलाने सर्दी पडसा, खोकला हे आजार होतात. अशीच लक्षणे कोरोनातही दिसतात. अशावेळी हा रूग्ण सर्दी पडशाचा की कोरोनाचा, हे तपासण्यासाठी रूग्णाची ‘हिस्ट्री’ जाणून घेतली जाते. तो बाहेर देशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता का, तो बाहेर देशात गेला होता काय, हे पाहिले जाते. त्यानंतर उपचार केला जातो. कोरोनाचा विषाणू भारतात निर्माण झालेला नाही. या आजारात सतत ताप राहतो. खोकला थांबत नाही. इतरही काही लक्षणे असतात. त्याकरिता तीन चाचण्या घेतल्या जातात. तीन चाचण्या ‘निगेटीव्ह’ आल्यावरच रूग्णाला सुटी दिली जाते.मास्क बांधणे आवश्यक आहे काय?मुळात मास्कची काहीच सध्याच गरज नाही. उलट अधिक वेळ मास्क राहिला तर त्यावरूनही जंतू पसरू शकतात. त्यापेक्षा स्वच्छ रूमाल वापरला तरी चालेल. तो दररोज स्वच्छ धुतलेला असावा. स्वच्छ रूमाल सुरक्षित आहे.हॅन्डवॉश गरजेचे आहे काय?कोरोनाला रोखण्यासाठी स्वच्छता गरजेची आहे. यामध्ये स्वत:ची स्वच्छता, परिसर स्वच्छता करणे आणि वारंवार हात धुतले पाहिजे. स्वच्छ पाण्याने, साबणाने धुतले तरी चालतील. भाज्या धुऊन आणि पूर्ण शिजवूनच खाव्या. आपली स्वच्छता ही विषाणू पसरण्यापासून पायबंद घालण्यास मदत करणारी ठरते. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगली पाहिजे.६० वर्षांवरील वृद्धांना जपण्याची आवश्यकताकोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील सर्व कर्मचारी, आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, नगरपरिषद अशी सर्वच यंत्रणा अलर्ट आहे. ती युद्धपातळीवर काम करीत आहे. प्रत्येक ठिकाणी जनजागृतीचे काम सुरू आहे. आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार कोरोना रूग्णात ६० वर्षावरील नागरिकांची संख्या जास्त आहे. ० ते ९ वर्षे वयोगटात अशा रूग्णांची संख्या नगण्य आहे. २० वर्षापेक्षा अधिक वय असणाºया रूग्णांची संख्या केवळ २ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना