शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

दात्यांनी दिले १३ हजार रक्तपिशव्यांचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

शासकीय रुग्णालयात समाजातील सर्वच घटकातील व्यक्तीला अपघाताने का होईना यावे लागते. गंभीर स्वरूपाचा अपघात असल्यास जखमींना तातडीची शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज पडते. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील रुग्ण, प्रसूतीसाठी आलेल्या महिला यांनाही वेळोवेळी रक्त द्यावे लागते.

ठळक मुद्देशासकीय रक्तपेढी : वर्षभरात १२६ ऐच्छिक रक्तदान शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दानात सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाला महत्त्व दिले जाते. असे असले तरी अनेकदा जवळच्या नातेवाईकासाठीसुद्धा धडधाकट असलेले आप्तस्वकिय रक्तदान करण्यासाठी मागेपुढे पाहतात. समाजात अजूनही रक्तदानाबद्दल अनेक समज-गैरसमज आहे. या सर्वांवर मात करत यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीच्या चमूने रक्तपिशव्या संकलनाचा आपलाच विक्रम निर्माण केला आहे. याची दखल राज्य रक्त संक्रमण परिषदेने घेतली आहे. यावर्षी तब्बल १३ हजार ४३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.शासकीय रुग्णालयात समाजातील सर्वच घटकातील व्यक्तीला अपघाताने का होईना यावे लागते. गंभीर स्वरूपाचा अपघात असल्यास जखमींना तातडीची शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज पडते. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील रुग्ण, प्रसूतीसाठी आलेल्या महिला यांनाही वेळोवेळी रक्त द्यावे लागते. इतकेच नव्हेतर सिकलसेल, थायलेसिमिया आणि अ‍ॅनिमिया यासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज पडते. येथील रुग्णांना शासकीय रक्तपेढीतून रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो. यासाठी महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधीक्षक डॉ.रवींद्र राठोड यांच्यासह रक्तपेढी विभागातील संपूर्ण चमू काम करते. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, सामाजिक संघटनेचे सदस्य, पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये जाणीव जागृतीचे काम केले जाते. थोर संतांच्या, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीला रक्तदानाच्या माध्यमातून अभिवादन करावे हा नवा विचार रुजविला जात आहे.वाढदिवस किंवा कुटुंबातील इतर कार्यक्रम या औचित्यावरही रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांनाही रक्तदान केले जाते. यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिले जाते. यासाठी विकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विकास येडशीकर, रक्तपेढी प्रमुख डॉ.स्रेहलता हिंगवे, डॉ.संजय खांडेकर, डॉ.नीलिमा लोढा, डॉ.हर्षल गुजर, डॉ.विशाल नरोटे यांच्यासह रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.दत्ता चौरे, डॉ.राहुल राठोड, डॉ.रसिका अलोणे, डॉ.शिवाजी आत्राम यांच्यासह समाजसेवा अधीक्षक मोबीन दुंगे, आशीष खडसे, गणेश कानडे, तंत्रज्ञ संजय गवारे, देवेंद्र मानकर, रमेश आमले, मधुकर मडावी, प्रदीप वाघमारे, सचिन मेहत्रे, राहुल भोयर, प्रतीक मोटे, नीलेश पळसपगार, अधिपरिचारक केशिराज मांडवकर, परिचर रामदास आगलावे, अभय मुरकुटे, दिलीप केराम, विठ्ठल डोळस आदी प्रयत्नरत आहे.उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांची गरजउन्हाळ्यात रक्तदात्यांची संख्या व रक्तदान शिबिरांची संख्या रोडावलेली असते. अशावेळी आवश्यक रक्तसाठा असावा याकरिता जाणीवपूर्वक शिबिरांचे आयोजन करून रक्तसाठा कायम राखण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व उपक्रमांतूनच वर्षभरात १२६ ऐच्छिक रक्तदान शिबिर शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून घेतले. ऐच्छिक रक्तदात्यांना डोनर कार्डवर दोन हजार ५०० रक्तपिशव्या गरजेच्यावेळी देण्यात आल्या. अत्यवस्थेतील रुग्णांना विनामूल्य तीन हजार २०० रक्तपिशव्या देण्यात आल्या.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी