शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

शेतकऱ्यांचा अंत पाहू नका

By admin | Updated: February 29, 2016 02:04 IST

अधिकारी, कर्मचारी व राज्यकत्यांनी स्वत:ची स्वार्थी प्रवृत्ती बाजुला सारून जनतेचे जीवनमरणाचे प्रश्न सोडवा, ..

एच.एम. देसरडा : पुसद येथे बळीराजा चेतना अभियानात मार्गदर्शन पुसद : अधिकारी, कर्मचारी व राज्यकत्यांनी स्वत:ची स्वार्थी प्रवृत्ती बाजुला सारून जनतेचे जीवनमरणाचे प्रश्न सोडवा, अन्यथा आगडोंब उसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलनाचे उपाध्यक्ष, अर्थतज्ज्ञ प्रा.एच.एम. देसरडा यांनी शनिवारी येथे दिला. येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठन, वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा चेतना अभियान अंतर्गत ‘सहभाग वाढवा, दुष्काळ हटेल’, ‘शेती, पाणी, रोजगार’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृषीभूषण दीपक आसेगावकर होते. कार्यक्रमाला अमरावतीच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, उपविभागीय अधिकारी कैलास वानखेडे, तालुका कृषी अधिकारी पी.एम. राठोड, अ‍ॅड. आप्पाराव मैंद, प्राचार्य डॉ. गणेश पाटील उपस्थित होते. प्रा. देसरडा म्हणाले, विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळ आहे. मात्र अनेकांना शेतकऱ्यांच्या समस्या व दुष्काळाशी कहीही देणे-घेणे नाही. शासनकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे ही दुष्काळी परिस्थिती वाढत आहे. पाऊस एखाद्या वेळी धोका देतो मात्र जनतेला लुबाडणारे अधिकारी, कर्मचारी, नेते, व्यापारी दररोजच धोका देत असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळाचा अभ्यास करताना जवळपास १० वर्र्षे खेडेगावात शेती केली. त्यामुळे शेती आणि दुष्काळ जवळून अभ्यासता आला. त्याचाच परिणाम म्हणून राज्य आणि देशाच्या विविध कमिट्यावर काम करता आले तर समाजाच्या प्रत्येक घटकाला पाहता आले. माणूस हा निसर्गाशी वैर करून जगू शकत नाही पण काहींनी निसर्गाशी ऐशीतैशी केली आहे. निसर्ग गरजा पूर्ण करतो पण हाव पूर्ण करत नाही. दुष्काळाच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून पाठपुराव केला होता. आजच्या राजकारण्यांकडे याचा अभाव असून, लोकप्रतिनिधी कुठेच जात नासल्याचे खंत व्यक्त केली. संचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले. (प्रतिनिधी)