शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

जिल्ह्यात वर्षभरात दीड हजार अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:09 IST

राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाने रस्ते गुळगुळीत आणि चकचकीत झाले. यामुळे वाहनांचा वेग वाढला. हा वेग नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे वर्षभरात जिल्ह्यात तब्बल दीड हजार अपघात घडले. यात ३५० जणांचे बळी गेले, तर ५५२ जणांना कायमचे जायबंदी व्हावे लागले.

ठळक मुद्दे३५० बळी : जिल्ह्यात १२ ब्लॅक स्पॉट, रस्ता सुरक्षा अभियान फोल, आजपासून वाहतूक सुरक्षा अभियान

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाने रस्ते गुळगुळीत आणि चकचकीत झाले. यामुळे वाहनांचा वेग वाढला. हा वेग नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे वर्षभरात जिल्ह्यात तब्बल दीड हजार अपघात घडले. यात ३५० जणांचे बळी गेले, तर ५५२ जणांना कायमचे जायबंदी व्हावे लागले.गतवर्षीच्या तुलनेत अपघाताचा आकडा दुपटीने वाढला आहे. २०१८ मध्ये जिल्ह्यात तब्बल दीड हजार अपघातांची नोंद झाली. हे अपघात रोखण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोरच उभे ठाकले आहे. रस्ते गुळगुळीत झाल्याने अपघाताची संख्या वाढतच आहे. यामुळे आता वाहन चालकांनी जागृत होण्याची गरज आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात वाहनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात वाहनाचा आकडा चार लाख चार हजार ८९२ वर पोहोचला आहे. मात्र मोजक्यांकडेच चालक परवाना आहे.यावरून वाहनधारकांना चालविण्याचे ज्ञान अपूर्ण असल्याचे स्पष्ट होते. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. काही ठिकाणी रस्त्याच्याकडेला अपघात प्रवणस्थळ, असे फलक दिसतात. कुठे मोठे खड्डे आहेत. राज्य मार्गावर अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा मोठे स्पीड ब्रेकर आहे. काही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग, रेडीयमही लावण्यात आले. तरीही अपघातांच्या संखेत वाढ होत आहे.बालकांच्या हातात वाहनअनेक पालक १८ वर्षांपूर्वीच पाल्यांच्या हाती वाहन देतात. ही मुले सुसाट वेगाने वाहने चालवितात. यामुळे शहरातील रस्त्यांवर अपघात घडतात. वाहन चालविताना हेल्मेटही वापरले जात नाही. चारचाकी वाहनात सीट बेल्टचा वापर केला जात नाही. हे प्रकार अपघाताला निमंत्रण देतात. वाहतूक शाखेने सुसाट वेगाने वाहन चालविणाऱ्यांविरूद्ध कंबर कसली. गतवर्षी २४४ वाहनांवर कारवाई झाली. यावर्षी ७२५ वाहनांवर कारवाई करण्यात आली.ब्लॅक स्पॉट म्हणजे कायउपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ‘ब्लॅक स्पॉट’ची व्याख्या जाहीर केली. ज्या स्थळावर सतत तीन वर्षे अपघात झाले, त्यात चारपेक्षा जादा बळी गेले, असे स्थळ म्हणजे ब्लॅक स्पॉट होय. जिल्ह्यात असे १२ ब्लॅक स्पॉट आहेत. यामध्ये वणी पोलीस ठाण्याअंतर्गत ब्राम्हणी फाटा, रेल्वे क्रॉसिंग, मंदर फाटा, शिरपूर मार्गावरील चारगाव चौकी, आर्णीत कोसदनी घाट, पुसदमध्ये उमरखेड रोडवरील गॅस एजंसी पॉर्इंट, उमरखेड येथे विडूळ फाटा, यवतमाळ ग्रामीणमध्ये हिवरीलगतचा भाग, महागाव येथे महागाव ते कलगाव रोड, नांदगव्हाण घाट, पुसद ग्रामीणमध्ये पॉलीटेक्नीक कॉलेज जवळ विठाळा, कळंबमधील चापर्डा या स्थळांचा समावेश आहे.

टॅग्स :Accidentअपघात