शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे

By admin | Updated: December 9, 2014 22:58 IST

पेपरफूट प्रकरणाच्या तपासात औरंगाबाद पोलिसांनी चौकशीचा भाग म्हणून जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना एक प्रश्नावली दिली होती. त्यातील प्रश्नांची जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे घेऊन

यवतमाळ : पेपरफूट प्रकरणाच्या तपासात औरंगाबाद पोलिसांनी चौकशीचा भाग म्हणून जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना एक प्रश्नावली दिली होती. त्यातील प्रश्नांची जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे घेऊन मंगळवारी पथक औरंगाबादकडे रवाना झाले.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या नोकरभरती प्रक्रियेत पेपरफुटीची घटना घडली. त्यामध्ये औरंगाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने एका सहायक विक्रीकर निरीक्षकासह ११ जणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून प्रश्नपत्रिकाही जप्त करण्यात आली होती. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने आणि पेपरफुटीच्या प्रकरणासंदर्भात लक्षवेधी उपस्थित झाली आहे. त्यामुळे हा विषय अधिवेशनात चर्चेला येण्याची दाट शक्यता आहे. वेळेअभावी तसे नाही झाले तरी त्याची यथोचित माहिती लक्षवेधी उपस्थित करणाऱ्या लोकप्रतिनिधींना द्यावी लागते. त्याचाच एक भाग म्हणून पेपरफूट प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. अटकेतील ११ जणांची कसून चौकशी करण्यात आली. घटनेचा मुख्य सूत्रधार सहायक विक्रीकर निरीक्षक खामनकर हा पेपर फोडणाऱ्या व्यक्तीचे नाव सांगायला तयार नाही. त्यामुळे त्याची नार्को टेस्ट करण्यासाठी पोलिसांनी तयारी चालविली आहे. शिवाय भरती प्रक्रिया राबविणाऱ्या जिल्हा निवड समितीतील पदाधिकाऱ्यांचा तर यात सहभाग नाही ना या दृष्टीनेही बारकाईने चौकशी केली जात आहे. त्यामुळेच पुन्हा हा तपास यवतमाळवर केंद्रित करण्यात आला.
औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह यांची या प्रकरणाच्या तपासावर बारिक नजर आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या नेतृत्वातील एक पथक सोमवारी यवतमाळात पाठविले. यावेळी या पथकाने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी यांची चौकशी केली. त्यानंतर दोघांनाही एक प्रश्नावली देण्यात आली. तसेच या प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरूपात मागितली. प्रभारी सीईओ कुळकर्णी यांनी सोमवारीच ही माहिती औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन केली. मात्र जिल्हाधिकारी महिवाल यांनी ही माहिती मंगळवारी देण्याचे सांगितले होते. त्यामुळे पथक येथेच थांबून राहिले. मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी महिवाल यांनी ती माहिती औरंगाबाद पोलिसांना दिली. त्यानंतर पथक येथून औरंगाबादकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसातून देण्यात आली.
औरंगाबाद पोलिसांनी पेपरफुटीच्या तपासाला वेग दिला असला तरी अद्याप पेपर फोडणाऱ्याचे नाव पुढे आले नाही. त्यामुळे जनसामान्यांमध्ये त्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)