शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी कर्जमाफी - पालकमंत्री मदन येरावार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 17:51 IST

जून महिन्यात राज्य शासनाने केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजे कर्जमाफीची घोषणा दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात अंमलात आणली. शासनाने दिलेला शब्द पाळला असून पारदर्शकपणे आणि ऑनलाइन पद्धतीने केलेली ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे.

यवतमाळ : जून महिन्यात राज्य शासनाने केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजे कर्जमाफीची घोषणा दिवाळीपूर्वी प्रत्यक्षात अंमलात आणली. शासनाने दिलेला शब्द पाळला असून पारदर्शकपणे आणि ऑनलाइन पद्धतीने केलेली ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे. हे सरकार शेतक-यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. अडचणीतील शेतक-यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी ही कर्जमाफी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्ह्यातील शेतक-यांना कर्जमाफी अंतर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रम आणि पात्र कुटुंबाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. मंचावर वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री डॉ. अशोक उईके, राजेंद्र नजरधणे, संजीवकुमार रेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, संजय जोशी आदी उपस्थित होते.ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानून पालकमंत्री येरावार म्हणाले, कर्जमाफीची रितसर सुरुवात आजपासून प्रत्येक जिल्हास्तरावर झाली आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-याच्या मागे शासन सदैव उभे आहे. कृषी वाहिन्या, जलयुक्त शिवार, शेततळे, मार्केट लिंकेज आदी योजना सरकारने आणल्या आहेत. एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही. या योजनेचे अनेक वैशिष्टे आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकेच्या 1 लक्ष 48 हजार 765 आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 1 लक्ष 68 हजार 962 शेतकरी असे एकूण 3 लक्ष 42 हजार 200 शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यात बीड नंतर यवतमाळ येथील कर्जमाफी मिळणा-या शेतक-यांची संख्या सर्वात जास्त आहे. सद्यस्थितील दिवाळीनिमित्त काही दिवसांच्या सुट्टया आल्या असल्या तरी कर्जमाफीची ही प्रक्रिया नियमित सुरु राहील. शासन, प्रशासन प्रत्येक शेतक-यांपर्यंत पोहचेल. शेतक-यांच्या खात्यात 15 नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.यावेळी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले, ही संपूर्ण आणि सरसकट कर्जमाफी आहे. या कर्जमाफीत प्रत्येक अडचणीत असलेल्या शेतक-यांचा समावेश झाला आहे. शासनाने शेतक-यांचा सातबारा कोरा केला आहे. या कर्जमाफीमुळे समोरच्या हंगामात बँकांची दारे शेतक-यांसाठी उघडी झाली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, शेतक-यांना मिळालेली कर्जमाफी ही दिवाळीच्या आनंदात दुग्धशर्करा योग आहे. तांत्रिक अडचणीवर मात करून जिल्हा प्रशासनाने सर्व लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी केली. यासाठी पालकमंत्र्यांचे मोठे सहकार्य लाभले. सहकार विभाग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, महसूल यंत्रणा आदी शासकीय यंत्रणांनी या कामासाठी चांगली मेहनत घेतली, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुबारकपूर (ता.बाभुळगाव) येथील किरण गोडे, नांदसावंगी (ता.बाभुळगाव) येथील गोविंद भटकर, मुकुटबन (ता.झरीजामणी) येथील मनोहर देवाडकर, रमेश माडीकुन्टवार (सत्तापल्ली, ता. झरीजामणी), कैलास ताकसांडे (वाटखेड, ता. राळेगाव), अनंता मानकर (वाटखेड, ता. राळेगाव) यांच्यासह एकूण 29 शेतक-यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र, साडीचोळी, टॉवेल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या या 29 शेतक-यांची कर्जमाफीची एकूण रक्कम 24 लक्ष 92 हजार 168 ऐवढी आहे. तत्पूर्वी सहायक निबंधक अर्चना माळवे यांनी उपस्थितांना मुख्यमंत्री यांचा संदेश वाचून दाखविला. यावेळी सहकार विभागाचे सुनील भालेराव, कैलास खटारे, नितीन देशपांडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाढे पाटील, अग्रणी बँक व्यवस्थापक कैलास कुमरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी