शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

कोटी ओतले, तरी पाणी कुठे मुरले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:02 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती घडेल, अशी घोषणा राज्यशासनाने केली होती. या योजनेत राज्यभरात विविध कामे होती घेण्यात आली. तरी साठविलेले पाणी भूगर्भात मुरलेच नाही. यामुळे भूजलाची पातळी घसरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

ठळक मुद्देजलयुक्तच्या कामावर प्रश्नचिन्ह : उन्हाळ्यापूर्वीच भूजल पातळी अर्धा मीटर घटली

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती घडेल, अशी घोषणा राज्यशासनाने केली होती. या योजनेत राज्यभरात विविध कामे होती घेण्यात आली. तरी साठविलेले पाणी भूगर्भात मुरलेच नाही. यामुळे भूजलाची पातळी घसरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यामुळे कोट्यवधी रूपये खर्च केलेल्या अभियानात तांत्रिक अडचणी तर राहिल्या नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपये ओतूनही प्रशासनात कुठेतरी पाणी मुरल्याची शंका व्यक्त केली जात आहे.यवतमाळ जिल्हा सतत दुष्काळी स्थितीचा सामना करत आहे. यावर्षीही जिल्ह्यात अपुरा पाऊस पडला. यामुळे भूजल पातळी अर्ध्या मिटरने खाली गेली आहे. उन्हाळ्याचे तीन महिने पुढे आहेत. अशात भूजल पातळी अर्ध्या मिटरने खाली आली आहे. पुढील काळात ही भूजलपातळी आणखी खाली जाण्याचा धोका आहे.जिल्ह्यात यावर्षी ७०० एमएम इतका पाऊस झाला. पडलेला पाऊस डोंगरमाथ्यावरून सरळ खाली वाहून गेला. पडलेले पाणी काही प्रमाणात साठविल्या गेले. मात्र ते पाणी जमिनीत मुरले नाही. यामुळे संपूर्ण जिल्हा आज दुष्काळाच्या सावटात आहे.जलयुक्त शिवार योजनेचे काम जिल्ह्यातील अनेक भागात पार पडले. ज्या भागात हे कामकाज घेण्यात आले. त्या ठिकाणी याचा फारसा प्रभाव दिसत नाही. यामुळे जलयुक्त शिवार योजनेत खोदण्यात आलेले शेततळे तंत्रशुद्ध पद्धतीने झाले नव्हते काय, नदीपात्र आणि नाल्यांच्या रूंदीकरणासोबत डोंगरमाथ्यावरचे कामकाजही मोठे आहे. असे असतानाही भूजल पातळीत वाढ झाली नाही. उलट दरवर्षीच त्यामध्ये घट नोंदविली जात आहे. यामुळे कोट्यवधी रूपयांच्या खर्चानंतरही भूजल पातळीत सुधारणा न झाल्याने दुष्काळी उपाययोजना राबवाव्या लागणार आहे.हरियाली, वॉटरशेड प्रकल्पाचे काय झाले?जलयुक्त शिवार अभियानापूर्वी हरियाली योजना राबविली गेली. वॉटर शेड प्रकल्पाअंतर्गत डोंगराच्या पायथ्याशी आडवे चर खोदण्यात आले. डोंगरावर पाणी मुरविण्याचे काम वर्षानुवर्षे राबविले जात आहे. यानंतरही भूजलस्त्रोत चिंताजनक आहे. यामुळे सिंचन समृद्धीला बे्रक लागला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई