शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

कोटी ओतले, तरी पाणी कुठे मुरले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:02 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती घडेल, अशी घोषणा राज्यशासनाने केली होती. या योजनेत राज्यभरात विविध कामे होती घेण्यात आली. तरी साठविलेले पाणी भूगर्भात मुरलेच नाही. यामुळे भूजलाची पातळी घसरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

ठळक मुद्देजलयुक्तच्या कामावर प्रश्नचिन्ह : उन्हाळ्यापूर्वीच भूजल पातळी अर्धा मीटर घटली

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती घडेल, अशी घोषणा राज्यशासनाने केली होती. या योजनेत राज्यभरात विविध कामे होती घेण्यात आली. तरी साठविलेले पाणी भूगर्भात मुरलेच नाही. यामुळे भूजलाची पातळी घसरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यामुळे कोट्यवधी रूपये खर्च केलेल्या अभियानात तांत्रिक अडचणी तर राहिल्या नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपये ओतूनही प्रशासनात कुठेतरी पाणी मुरल्याची शंका व्यक्त केली जात आहे.यवतमाळ जिल्हा सतत दुष्काळी स्थितीचा सामना करत आहे. यावर्षीही जिल्ह्यात अपुरा पाऊस पडला. यामुळे भूजल पातळी अर्ध्या मिटरने खाली गेली आहे. उन्हाळ्याचे तीन महिने पुढे आहेत. अशात भूजल पातळी अर्ध्या मिटरने खाली आली आहे. पुढील काळात ही भूजलपातळी आणखी खाली जाण्याचा धोका आहे.जिल्ह्यात यावर्षी ७०० एमएम इतका पाऊस झाला. पडलेला पाऊस डोंगरमाथ्यावरून सरळ खाली वाहून गेला. पडलेले पाणी काही प्रमाणात साठविल्या गेले. मात्र ते पाणी जमिनीत मुरले नाही. यामुळे संपूर्ण जिल्हा आज दुष्काळाच्या सावटात आहे.जलयुक्त शिवार योजनेचे काम जिल्ह्यातील अनेक भागात पार पडले. ज्या भागात हे कामकाज घेण्यात आले. त्या ठिकाणी याचा फारसा प्रभाव दिसत नाही. यामुळे जलयुक्त शिवार योजनेत खोदण्यात आलेले शेततळे तंत्रशुद्ध पद्धतीने झाले नव्हते काय, नदीपात्र आणि नाल्यांच्या रूंदीकरणासोबत डोंगरमाथ्यावरचे कामकाजही मोठे आहे. असे असतानाही भूजल पातळीत वाढ झाली नाही. उलट दरवर्षीच त्यामध्ये घट नोंदविली जात आहे. यामुळे कोट्यवधी रूपयांच्या खर्चानंतरही भूजल पातळीत सुधारणा न झाल्याने दुष्काळी उपाययोजना राबवाव्या लागणार आहे.हरियाली, वॉटरशेड प्रकल्पाचे काय झाले?जलयुक्त शिवार अभियानापूर्वी हरियाली योजना राबविली गेली. वॉटर शेड प्रकल्पाअंतर्गत डोंगराच्या पायथ्याशी आडवे चर खोदण्यात आले. डोंगरावर पाणी मुरविण्याचे काम वर्षानुवर्षे राबविले जात आहे. यानंतरही भूजलस्त्रोत चिंताजनक आहे. यामुळे सिंचन समृद्धीला बे्रक लागला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई