शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोटी ओतले, तरी पाणी कुठे मुरले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:02 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती घडेल, अशी घोषणा राज्यशासनाने केली होती. या योजनेत राज्यभरात विविध कामे होती घेण्यात आली. तरी साठविलेले पाणी भूगर्भात मुरलेच नाही. यामुळे भूजलाची पातळी घसरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

ठळक मुद्देजलयुक्तच्या कामावर प्रश्नचिन्ह : उन्हाळ्यापूर्वीच भूजल पातळी अर्धा मीटर घटली

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती घडेल, अशी घोषणा राज्यशासनाने केली होती. या योजनेत राज्यभरात विविध कामे होती घेण्यात आली. तरी साठविलेले पाणी भूगर्भात मुरलेच नाही. यामुळे भूजलाची पातळी घसरल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यामुळे कोट्यवधी रूपये खर्च केलेल्या अभियानात तांत्रिक अडचणी तर राहिल्या नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपये ओतूनही प्रशासनात कुठेतरी पाणी मुरल्याची शंका व्यक्त केली जात आहे.यवतमाळ जिल्हा सतत दुष्काळी स्थितीचा सामना करत आहे. यावर्षीही जिल्ह्यात अपुरा पाऊस पडला. यामुळे भूजल पातळी अर्ध्या मिटरने खाली गेली आहे. उन्हाळ्याचे तीन महिने पुढे आहेत. अशात भूजल पातळी अर्ध्या मिटरने खाली आली आहे. पुढील काळात ही भूजलपातळी आणखी खाली जाण्याचा धोका आहे.जिल्ह्यात यावर्षी ७०० एमएम इतका पाऊस झाला. पडलेला पाऊस डोंगरमाथ्यावरून सरळ खाली वाहून गेला. पडलेले पाणी काही प्रमाणात साठविल्या गेले. मात्र ते पाणी जमिनीत मुरले नाही. यामुळे संपूर्ण जिल्हा आज दुष्काळाच्या सावटात आहे.जलयुक्त शिवार योजनेचे काम जिल्ह्यातील अनेक भागात पार पडले. ज्या भागात हे कामकाज घेण्यात आले. त्या ठिकाणी याचा फारसा प्रभाव दिसत नाही. यामुळे जलयुक्त शिवार योजनेत खोदण्यात आलेले शेततळे तंत्रशुद्ध पद्धतीने झाले नव्हते काय, नदीपात्र आणि नाल्यांच्या रूंदीकरणासोबत डोंगरमाथ्यावरचे कामकाजही मोठे आहे. असे असतानाही भूजल पातळीत वाढ झाली नाही. उलट दरवर्षीच त्यामध्ये घट नोंदविली जात आहे. यामुळे कोट्यवधी रूपयांच्या खर्चानंतरही भूजल पातळीत सुधारणा न झाल्याने दुष्काळी उपाययोजना राबवाव्या लागणार आहे.हरियाली, वॉटरशेड प्रकल्पाचे काय झाले?जलयुक्त शिवार अभियानापूर्वी हरियाली योजना राबविली गेली. वॉटर शेड प्रकल्पाअंतर्गत डोंगराच्या पायथ्याशी आडवे चर खोदण्यात आले. डोंगरावर पाणी मुरविण्याचे काम वर्षानुवर्षे राबविले जात आहे. यानंतरही भूजलस्त्रोत चिंताजनक आहे. यामुळे सिंचन समृद्धीला बे्रक लागला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई