शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 21:51 IST

गेल्या काही वर्षात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात आणि तुरळक पाऊस पडल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : अत्यल्प पाऊस, सोयाबीन, मूग, उडीदाचे उत्पन्न घटणार

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : गेल्या काही वर्षात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात आणि तुरळक पाऊस पडल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला. त्यातच सध्या मोठ्या प्रमाणात रोग आल्याने तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात सापडले आहे.आॅगस्ट महिना संपत आला तरी ३५१ मिमीच्या वर पाऊस पडला नाही. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे उत्पन्न ५० टक्क्यांपर्यंत घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात ६६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. जूनमध्ये पेरण्या आटोपल्यानंतर या महिन्यात २०९ मिमी पाऊस कोसळल्याने पिकांची उगवण चांगली झाली. मात्र जुलैमध्ये प्रमाण घटून १११ मिमी पाऊस आला. त्यामुळे ऐन महत्त्वाच्या काळात पावसाने दगा दिल्याने पीक हिरवी दिसत असली तरी त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. पाऊस गायबच झाल्याने कोरडवाहू भागातील कापूस, सोयाबीन पिके सुकली आहे. मूग आणि उडीदाच्या उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत केवळ ३१५ मिमी पावसाची नोंद झाली. पाऊस यावेळी फारच कमी पडला आहे. कमी पावसामुळे नदी, नाले कोरडे पडले आहे. कोणत्याही प्रकल्पाने ५० टक्क्यापर्यंतही पातळी गाठली नाही. ६७.२५ दलघमी साठवण क्षमता असणाºया म्हसणी धरणात १९.८५ दलघमी पाणीसाठा आहे, तर पाथ्रड, कुंभारकिन्हीसह इतर छोट्या प्रकल्पाने तळ गाठला आहे. मुबलक पाऊस न पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही. परिणामी विहिरी आटल्या. ओलिताची सोय असणाºया शेतकºयांच्या कपाशीची स्थिती चांगली असली तरी आता मात्र पाणी पुरत नाही. त्यामुळे पीक हिरवी दिसत असली तरी यावर्षी उत्पादनात घट होणार असं मानलं जात आहे. त्यामुळे शेतकºयांची काळजी पुन्हा एकदा वाढली आहे.पिकांवर रोगांचा प्रादुर्भावकमी पाऊस, प्रतिकूल वातावरण यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग आला आहे. सोयाबीनवर तर गेल्या दहा वर्षात पाहिली नाही एवढी अळी असल्याचे सांगण्यात येते. एका झाडावर २५ च्या वर अळ्या आढळतात. तर कपाशीवर फुलकिडा पांढरी माशी हा रोग आल्याने झाडांची स्थिती वाईट आहे. त्यामुळे कपाशी, सोयाबीन या पिकांची दुरावस्था झाली असून शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कमी पाऊस त्यातच पिकांवरील रोगामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असली तरी कृषी खात्याचे जिल्ह्यातील अधिकारी मात्र परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगत आहे.