शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

धरणग्रस्तांच्या आंदोलनात वादाची ठिणगी; आजी-माजी आमदारांत बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 12:09 IST

आमदार बोदकुरवार ठाकरे सरकारला दोषी ठरवत होते, तर माजी आमदार विश्वास नांदेकर फडणवीस सरकारला दोष देत होते. यातून हा वाद वाढला.

ठळक मुद्देएकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मारेगाव (यवतमाळ) : धरणाच्या प्रश्नावरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी गेलेले भाजपचे वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिवसेनेचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्यात तालुक्यातील हटवांजरी येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी शनिवारी दुपारी चांगलीच बाचाबाची झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

हटवांजरी येथील खोदकाम सुरू असलेल्या धरणाच्या जागेवर शेतकऱ्यांचे होते. शनिवारी दुपारी माजी आमदार विश्वास नांदेकर आंदोलनस्थळी पोहोचले. ते आंदोलकांशी चर्चा करत असतानाच तेथे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारदेखील पोहोचले. दोघेही शेतकऱ्यांशी सवांद साधत होते. याचवेळी शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे पाप कोणत्या सरकारचे? या मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दीक वाद सुरू झाला.

आमदार बोदकुरवार ठाकरे सरकारला दोषी ठरवत होते, तर माजी आमदार विश्वास नांदेकर फडणवीस सरकारला दोष देत होते. यातून हा वाद वाढला. वाद एवढा विकोपाला गेला की, विश्वास नांदेकर हे थेट आमदार बोदकुरवार यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, तिथे उपस्थित पोलिसांनी या वादात मध्यस्थी करून दोघांनाही बाजूला केले. त्यानंतर आंदोलन स्थळावरील तणाव निवळला.

मी आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वी विश्वास नांदेकर शेतकऱ्यांशी बोलत होते. मी ही त्याठिकाणी पोहोचलो. याप्रकरणी काय होऊ शकते, याविषयी शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना वादाला सुरूवात झाली. नांदेकर हे फडणवीस सरकारला दोषी ठरवत होते. वास्तविक धरणाची मंजुरी काॅंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात आणि शेतकऱ्यांचे सातबारावरून नाव कमी करण्याचा प्रकार महाविकास आघाडीच्या काळात घडला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सन २०१५मध्ये मोबदल्यात वाढ केली होती. यावरून वाद झाला.

- आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वणी

मी हटवांजरी येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असताना आमदार बोदकुरवार त्या ठिकाणी आले. मी सन्मानपूर्वक त्यांना बसायला जागा दिली. दोघेही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असताना बोदकुरवार यांनी या सर्व प्रकरणाला ठाकरे सरकार दोषी आहे, असा आरोप केला. यावरून आमच्यात वाद झाला. राज्यातील ठाकरे सरकारवर अकारण टीका करणे आम्ही सहन करणार नाही.

-विश्वास नांदेकर, माजी आमदार, वणी

टॅग्स :PoliticsराजकारणFarmerशेतकरीagitationआंदोलनMLAआमदार