शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

धरणग्रस्तांच्या आंदोलनात वादाची ठिणगी; आजी-माजी आमदारांत बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 12:09 IST

आमदार बोदकुरवार ठाकरे सरकारला दोषी ठरवत होते, तर माजी आमदार विश्वास नांदेकर फडणवीस सरकारला दोष देत होते. यातून हा वाद वाढला.

ठळक मुद्देएकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मारेगाव (यवतमाळ) : धरणाच्या प्रश्नावरून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी गेलेले भाजपचे वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिवसेनेचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्यात तालुक्यातील हटवांजरी येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी शनिवारी दुपारी चांगलीच बाचाबाची झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

हटवांजरी येथील खोदकाम सुरू असलेल्या धरणाच्या जागेवर शेतकऱ्यांचे होते. शनिवारी दुपारी माजी आमदार विश्वास नांदेकर आंदोलनस्थळी पोहोचले. ते आंदोलकांशी चर्चा करत असतानाच तेथे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारदेखील पोहोचले. दोघेही शेतकऱ्यांशी सवांद साधत होते. याचवेळी शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे पाप कोणत्या सरकारचे? या मुद्द्यावरून दोघांमध्ये शाब्दीक वाद सुरू झाला.

आमदार बोदकुरवार ठाकरे सरकारला दोषी ठरवत होते, तर माजी आमदार विश्वास नांदेकर फडणवीस सरकारला दोष देत होते. यातून हा वाद वाढला. वाद एवढा विकोपाला गेला की, विश्वास नांदेकर हे थेट आमदार बोदकुरवार यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, तिथे उपस्थित पोलिसांनी या वादात मध्यस्थी करून दोघांनाही बाजूला केले. त्यानंतर आंदोलन स्थळावरील तणाव निवळला.

मी आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वी विश्वास नांदेकर शेतकऱ्यांशी बोलत होते. मी ही त्याठिकाणी पोहोचलो. याप्रकरणी काय होऊ शकते, याविषयी शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना वादाला सुरूवात झाली. नांदेकर हे फडणवीस सरकारला दोषी ठरवत होते. वास्तविक धरणाची मंजुरी काॅंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात आणि शेतकऱ्यांचे सातबारावरून नाव कमी करण्याचा प्रकार महाविकास आघाडीच्या काळात घडला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सन २०१५मध्ये मोबदल्यात वाढ केली होती. यावरून वाद झाला.

- आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, वणी

मी हटवांजरी येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असताना आमदार बोदकुरवार त्या ठिकाणी आले. मी सन्मानपूर्वक त्यांना बसायला जागा दिली. दोघेही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत असताना बोदकुरवार यांनी या सर्व प्रकरणाला ठाकरे सरकार दोषी आहे, असा आरोप केला. यावरून आमच्यात वाद झाला. राज्यातील ठाकरे सरकारवर अकारण टीका करणे आम्ही सहन करणार नाही.

-विश्वास नांदेकर, माजी आमदार, वणी

टॅग्स :PoliticsराजकारणFarmerशेतकरीagitationआंदोलनMLAआमदार