शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

संमती ६२ हजार पालकांची, शाळेत केवळ १५ हजार विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 5:00 AM

राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग भरविणे सुरू केले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून अशी पत्रे गोळा केली. जिल्ह्यात नववी ते बारावीच्या वर्गात १ लाख ४९ हजार ७८५ विद्यार्थी आहेत.

ठळक मुद्देनववी ते बारावीचे वर्ग सुरू : पालकांच्या मनात धाकधुक

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लाॅकडाऊननंतर जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू करताना ६२ हजार ९०९ पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संमतीपत्र दिले. प्रत्यक्षात केवळ १५ हजार ४२१ विद्यार्थीच शाळेत येत आहेत. यावरून पालकांच्या मनात अजूनही धाकधुक असल्याचे स्पष्ट होते. राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग भरविणे सुरू केले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून अशी पत्रे गोळा केली. जिल्ह्यात नववी ते बारावीच्या वर्गात १ लाख ४९ हजार ७८५ विद्यार्थी आहेत. त्यापैकी ४२ टक्के म्हणजे ६२ हजार ९०९ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र भरून दिले. परंतु, प्रत्यक्षात केवळ दहा टक्के म्हणजे १५ हजारच पालकांनी मुलांना शाळेत पाठविले आहे. उर्वरित ९० टक्के पालकांच्या मनात संभ्रम अद्याप कायम असल्याचे यावरून स्पष्ट होते. दरम्यान, शाळांमध्ये सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर, थर्मल गन आदी गोष्टींचा काटेकोर वापर होत आहे. शाळाही केवळ चार तासच भरविली जात आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत पाठविले पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहेत. तर शासनानेही कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका वर्तविला आहे. त्यामुळे बहुतांश पालक मुलांना सध्याच शाळेत पाठविण्याबाबत ठाम भूमिका घेताना दिसत नाही. तर अनेक विद्यार्थी मात्र शिक्षणाच्या ओढीने स्वत:च जमेल त्या मार्गाने शाळा गाठताना दिसत आहे. त्यांना शिक्षक वर्गाकडूनही पालकांप्रमाणे सांभाळून घेतले जात आहे. 

शाळांतील उपस्थितीसोमवारी १५ हजार ४२१ विद्यार्थी शाळेत आले. मात्र दुसऱ्या दिवशीपासून या उपस्थितीमध्ये वाढ होत असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. सध्या कोणत्या तालुक्यात किती विद्यार्थी शाळेत उपस्थित होत आहेत, याची आकडेवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत गोळा केली जात आहे. त्याचा एकत्रित अहवाल दोन दिवसानंतर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

स्वॅब टेस्टमुळे शिक्षकांची संख्या कमीजिल्ह्यात एकंदर ३३९७ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्धारित होते. प्रत्यक्षात त्यापेक्षाही अधिक शिक्षकांनी चाचणी करून घेतली. त्यातील ८१ शिक्षक व ८ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे कर्मचारी सध्या शाळेत अनुपस्थित आहेत. तर काही शिक्षकांची चाचणी होऊनही त्यांचे अहवाल येणे बाकी असल्यामुळे तेही शाळेत गैरहजर आहेत. मात्र उर्वरित सर्व शिक्षक अध्यापनासाठी मेहनत घेत आहे. 

४२ टक्के पालकांचे संमतीपत्र आले आहे. विद्यार्थी उपस्थिती हळूहळू वाढेल. ज्यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली, तेवढे शिक्षक वगळता सर्वच शिक्षक शाळेत अध्यापन करीत आहेत.                   - दीपक चवणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यवतमाळ

टॅग्स :SchoolशाळाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या