शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

राकाँ-भाजपच्या कुबड्या घेऊनही काँग्रेस हरली

By admin | Updated: January 21, 2016 02:16 IST

तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर कित्येक वर्ष वर्चस्व राहिलेल्या काँग्रेसची हालत खस्ता झाली आहे.

किशोर वंजारी नेरतालुक्याच्या सहकार क्षेत्रावर कित्येक वर्ष वर्चस्व राहिलेल्या काँग्रेसची हालत खस्ता झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या कुबड्या घेऊनही या पक्षाला बहुमत तर दूर जवळपासही पोहोचता आले नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने या पक्षाची शक्ती दिसून आली. एवढेच नव्हे तर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची या युतीची खेळी फसली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्रावर काँग्रेसचा दबदबा होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाला हा पक्ष जवळही करत नव्हता. आता मात्र काँग्रेसची या पक्षाशी चांगलीच गट्टी जमली आहे. स्वत:ची ताकद कमी पडत असल्याचे पाहून जुळवून घेतले खरे, मात्र त्यातही यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. याउलट तालुक्यात शिवसेनेची ताकद दिवसागणिक वाढत आहे. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत मिळविलेल्या विजयाने हुरळून जात बाजार समितीसाठीही काँग्रेस-राकाँ-भाजपा एकत्र आली. खविसंच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी खेळली गेली. यात त्यांना विजय मिळाला. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीसाठीही हीच रणनीती आखली गेली. मात्र यश आले नाही. केवळ चार जागांवर या युतीला समाधान मानावे लागले. दुसरीकडे शिवसेनेने तब्बल १५ जागा जिंकत सहकार क्षेत्रावर पुन्हा आपला झेंडा रोवला. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तळ ठोकून होते. जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे यांनीही प्रचंड मेहनत घेतली. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र यश आले नाही. एकेकाळी काँग्रेसपुढे कुणाचाही थारा लागत नव्हता. माणिकराव ठाकरे यांचा तालुक्याशी संपर्क तुटल्यानंतर काँग्रेस खिळखिळी होत गेली. नगरपालिका, बहुतांश ग्रामपंचायती या पक्षाच्या हातातून गेल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांची वाणवा असलेल्या भाजपाशी जुळवून घेत या पक्षाला निवडणूक लढवावी लागत आहे. वास्तविक नेर बाजार समितीत शेतकऱ्यांना विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. व्यापारी आणि दलाल यांच्यात हातमिळवणी असल्याने शेतकऱ्यांना पैशासाठी कित्येक महिने चकरा माराव्या लागतात. नियोजनाचा अभाव याठिकाणी प्रामुख्याने दिसून येतो. बाजार समितीच्या कार्यप्रणालीला शेतकरी कंटाळले. तरीही त्यांनी काँग्रेसवर विश्वास टाकला नाही. काँग्रेसने या प्रश्नांसाठी कधीही मोर्चे, आंदोलने केली नाही, शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही. त्यामुळेच या पक्षाला सत्तेपासून याहीवेळी दूर राहावे लागले. शिवसेनेवर पुन्हा विश्वास दाखवित काँग्रेस-राकाँ-भाजप युतीला बाहेरची वाट दाखविली.