शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 06:00 IST

मराठवाड्यात तणावाची स्थिती राहिल्याने उमरखेड आगाराने २५ बसफेऱ्या रद्द केल्या. यवतमाळात दुपारनंतर काही दुकाने उघडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी अध्यक्ष रमेश गिरोडकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, प्रवक्ता राजा गणवीर, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत लोडगे, यागेश पारवेकर उपस्थित होते.

ठळक मुद्दे२५ बसफेऱ्या रद्द : ३५ संघटना बंदमध्ये सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात शुक्रवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला यवतमाळात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वाहतूक व्यवस्थेवर मात्र बंदचा परिणाम जाणवला. परिवहन महामंडळाला २५ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या.भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात बंदचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यापारपेठ बंद करीत बाईक रॅली काढली. बसस्थानक चौकात विविध संघटनांनी पाठिंबा देत सभा घेतली.मराठवाड्यात तणावाची स्थिती राहिल्याने उमरखेड आगाराने २५ बसफेऱ्या रद्द केल्या. यवतमाळात दुपारनंतर काही दुकाने उघडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी अध्यक्ष रमेश गिरोडकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, प्रवक्ता राजा गणवीर, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत लोडगे, यागेश पारवेकर उपस्थित होते. या बंदला संभाजी ब्रिगेड, संताजी तेली संघटना, मराठा सेवा संघ, ऑल इंडिया धनगर समाज, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, प्रहार ऑटोचालक संघटना, कापड व्यापारी संघटना, ओबीसी आरक्षण बचाव समिती, माळी समाज संघटना, भारतीय पिछडा शोषित संघटन, गोर सेना, ऑटो युनियन, मालवाहू वाहतूक, बिरसा मुंडा संघटना, ए.पी.जे, कळंब चौक व्यापारी संघटना, शेतकरी वारकरी, एमआयएम, बिरसा ब्रिगेड शामादादा कोलाम, पेन्शनर कर्मचारी, इन्टक, समता सैनिक दल यांच्यासह ३५ संघटनांनी पाठिंबा दिला होता.तालुका पातळीवरही निघाले मोर्चेयवतमाळ शहरात बंदकरिता विविध सामाजिक संघटना एकवटल्या होत्या. तर याच संघटनांच्या स्थानिक शाखांनी सोळाही तालुका पातळीवर बंदचे आयोजन केले होते. वणी, पुसद येथे दुपारी रॅली काढण्यात आली. तर आर्णी, नेर, घाटंजी, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, पांढरकवडा अशा सर्वच तालुक्यांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.समर्थक-विरोधक आले आमनेसामनेयवतमाळच्या मारवाडी चौकात बंदचे समर्थक आणि विरोधक आमने सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. काहींनी दुकाने बंद ठेवण्यास नकार देत मोदी-मोदी अशा घोषणाही दिल्या. शहरचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी वेळीच पोहचून दोन्ही गटांची समजूत काढली.

टॅग्स :Strikeसंप