शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘सीएमजीएसवाय’चा भ्रष्टाचार पूर्वनियोजित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:10 IST

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत पूर्वनियोजित भ्रष्टाचार होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. अभियंताच भागीदार म्हणून कंत्राटदाराच्या भूमिकेत वावरत असल्याने कामाचे अंदाजपत्रक आधीच वाढवून हा भ्रष्टाचार केला जातो आहे.

ठळक मुद्देअभियंत्याची भागिदारी ? : अंदाजपत्रक आधीच वाढविले जाते, गौण खनिजाचीही मार्जीन, पुसद-उमरखेड विभागाचा कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत पूर्वनियोजित भ्रष्टाचार होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. अभियंताच भागीदार म्हणून कंत्राटदाराच्या भूमिकेत वावरत असल्याने कामाचे अंदाजपत्रक आधीच वाढवून हा भ्रष्टाचार केला जातो आहे.संपूर्ण जिल्ह्यातच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे सुरू आहेत. पुसद, उमरखेड व महागाव तालुक्यातील अनेक कामे वादग्रस्त ठरली आहे. या भागात दोन तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामात चक्क अंदाजपत्रकातून पूर्वनियोजित भ्रष्टाचार केला जात असल्याचे सांगितले जाते. कारण अभियंताच भागीदार असल्याने कंत्राटदारांची पाठराखण करतो. त्यातूनच कामाचे बजेट आधीच वाढविले जाते. यातून ‘सीएमजीएसवाय’च्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे.रस्त्याच्या कामासाठी लागणारा मुरूम माळपठार असल्याने अवैधरित्या उत्खनन करून वापरला जात आहे. देवठाणा-जवळा-जामनाईक क्र.१ या रस्त्याच्या कामासाठी तर चक्क मोठमोठाले खड्डेच जंगल परिसरात केले गेले आहे. बहुदा वनजमिनीवर हे उत्खनन केले असावे, अशी शंका आहे. खडका-लेव्हा-पेढीच्या रस्ता बांधकामात एका कंत्राटदाराला २६ लाखांचा दंड ठोठावला गेला होता. त्यातील सात लाख रुपये भरले गेले. उर्वरित १९ लाखांसाठी पत्रव्यवहार सुरू आहे. तलाठी व मंडल अधिकाऱ्याच्या पुढाकाराने गौण खनिजाची ही चोरी उघडकीस आली होती. रस्त्यांच्या बांधकामासाठी लागणाºया गौण खनिजाचा आणि विशेषत: मुरुमाचा प्रचंड घोळ या तीन तालुक्यात आहे. रॉयल्टीचे चेक तपासल्यास तो उघड होईल.पुसद, उमरखेड, महागाव या तीन तालुक्यात ८० कोटींची कामे प्रस्तावित आहेत. त्याच्या निविदाही काढल्या गेल्या आहेत. या कामांचे अंदाजपत्रके तपासल्यास वाढीव बजेटचा घोळ उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºया धानमुख-दगडथर ते उमरखेड तालुका सीमा हा सहा कोटींचा रस्ता प्रस्तावित आहे. वास्तविक हा रस्ता आधीच जिल्हा परिषदेने बांधला आहे. त्याचे हॉटमिक्सद्वारे बरेच किलोमीटरचे रूंदीकरणही झाले आहे. त्यानंतरही त्यावर ‘सीएमजीएसवाय’मधून सहा कोटी रुपये खर्च केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे गरज नसताना पुन्हा-पुन्हा त्याच रस्त्यावर निधी टाकला जातो, तर दुसरीकडे प्रचंड आवश्यकता असलेल्या रस्त्यांना डावलले जाते. ‘मार्जीन’ हे प्रमुख कारण त्यासाठी सांगितले जाते. एकाच रस्त्यावर पुन्हा काम केल्यास प्रचंड मार्जीन उरते, तर उखडलेल्या रस्त्यावर काम केल्यास कमी लाभ मिळतो. म्हणून उखडलेले रस्ते दुर्लक्षित करून चांगल्या रस्त्यांवर निधी टाकण्याचा सपाटा सुरू आहे.हजारो वृक्ष लागवडीचा निधी हडपलारस्त्याचे बांधकाम करताना दुतर्फा वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. ही बाब विचारात घेऊन कंत्राटदाराला वृक्ष लागवडीचे बंधन घालण्यात आले आहे. त्यासाठी कामाच्या अंदाजपत्रकातच निधीची तरतूद केली जाते. मात्र पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत कामांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. परंतु त्या तुलनेत वृक्ष लावलीच गेली नाही आणि काहिशी लावली गेली असेल तर ती जगविली गेली नाही. यामुळे कंत्राटदारांनी लावलेले वृक्ष दाखवावे, असे आव्हान समाजातून दिले जात आहे. बांधकाम साहित्याच्या शासकीय दरातच प्रत्येक विभागाला किमान पाच कोटी रुपये केवळ वृक्ष लागवडीसाठी शासनाने दिले आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कागदावरच ही वृक्ष लागवड करून निधी हडपला जातो.लोकप्रतिनिधीही तीन टक्के ‘मार्जीन’चे वाटेकरी!उमरखेड व महागाव तालुक्यात ‘सीएमजीएसवाय’च्या कामाच्या गुणवत्तेची ‘कत्तल’ करणारा अभियंता एका डॉक्टरच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनाही तीन टक्क्यात ‘मॅनेज’ करीत असल्याची चर्चा आहे. वर्क आॅर्डर होताच मार्जीनची रक्कम पोहोचविली जात असल्याने कुणीच या कामांच्या गुणवत्तेबाबत ओरड करीत नाही.निविदांना पुसदमध्ये जादा दर, उमरखेडला कमी कसा?पुसदमधील कंत्राटदार मार्जीनला थारा देत नसल्याने तेथील निविदा नियोजित दराच्या जादा किंवा बरोबरीत सुटतात. त्याचवेळी महागाव व उमरखेडमध्ये कंत्राटदार मार्जीनला सहज तयार होत असल्याने तेथील निविदा कमी दराने मंजूर होतात. अर्थात कमी दराच्या या निविदांमध्ये ‘वाटपा’नंतर खरोखरच कामाची गुणवत्ता काय राहात असेल याचा अंदाज येतो.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार