शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या आमदारांचा परफॉर्मन्स तपासणार

By admin | Updated: April 20, 2017 00:12 IST

जिल्हा परिषद निवडणुकीतील आमदारांचा परफॉर्मन्स तपासण्याचा निर्णय भाजपाने घेतला. थेट मुख्यमंत्र्यांनी

मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितला : जिल्हा परिषद निवडणूक रवींद्र चांदेकर  यवतमाळ जिल्हा परिषद निवडणुकीतील आमदारांचा परफॉर्मन्स तपासण्याचा निर्णय भाजपाने घेतला. थेट मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांच्या मतदार संघातून भाजपाचे नेमके किती जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य विजयी झाले, याचा लेखाजोखा मागितला असून त्यात जिल्ह्यातील भाजपाच्या पाचपैकी दोन आमदारांवर टांगती तलवार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेणे सुरू केले आहे. दोन वर्षांनंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदारांची हीच कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. आमदारांची कामगिरी तपासण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक भाजप आमदाराच्या विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाची स्थिती काय होती, याची बारीकसारीक माहिती घेणे सुरू केले. यात कोणत्या आमदाराची कामगिरी सरस आणि कोणत्या आमदाराची निरस, याचा हिशेब ठेवला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ६१ पैकी १८ जागा जिंकून भाजपाने दुसरे स्थान पटकाविले आहे. शिवसेनेने २० जागा जिंकून पहिला क्रमांक पटकाविला. ही बाब भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. भाजप आणि शिवसेनेचे विळ्या-भोपळ्याचे सख्य असल्याने पुढील विधानसभा निवडणुकीत रंगत येणार आहे. स्वत:च्या बळावर पुढील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील भाजप आमदारांची कामगिरी तपासली जात आहे. पालकमंत्र्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघातून भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यात यश प्रात केले. त्याचप्रमाणे वणी आणि राळेगावच्या आमदारांनीही आपल्या मतदार संघात भाजपाला बऱ्यापैकी विजयी करून पक्षात वजन वाढविले. मात्र केळापूर-आर्णी आणि उमरखेडचे आमदार जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या लेखी नापास ठरल्याची माहिती आहे. भाजपाला किमान २७ ते २८ जागांवर सदस्य निवडून येतील, अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात आली होती. मात्र केळापूर आणि उमरखेडच्या आमदारांची कामगिरी ढेपाळल्याने पक्षाला १८ जागांवरच थांबावे लागले, असे सांगितले जात आहे. हाच लेखाजोखा थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जाणार आहे. त्यावरून मुख्यमंत्री याबाबत संबंधित आमदारांना जाब विचारण्याची शक्यता आहे. नंतर पुढील दोन वर्षांत आपापल्या मतदार संघात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी त्यांना निर्देश दिले जातील. त्याउपरही पक्षाची गत अशीच राहिल्यास दोन आमदारांना पुढील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविताना प्रचंड कठीण जाणार आहे. यामुळे सर्वच आमदारांना हुरहूर लागली आहे. मुख्यमंत्री नेमकी कोणती भूमिका घेतात, अशी धास्ती आमदारांना सतावत आहे. पक्षापेक्षा आमदार झाले मोठे ! मागील विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेने भाजपाचा विजय सुकर झाला. नवखे उमेदवार १५ दिवसांत आमदार बनले. आता काही आमदारांच्या डोक्यात आमदारकी भीनली आहे. आपण स्वत:च्या बळावर निवडून आलो, असे काहींना वाटत आहे. दुसरीकडे विविध मुद्यांवरून जनतेच्या मनात काही भाजप आमदारांची ‘इमेज’ नकारात्मक (निगेटीव्ह) निर्माण झाली आहे. मात्र तरीही त्यांना पक्षापेक्षा आपण मोठे झाल्याचा भास होतो, असे भाजपमधीलच काही धुरीणांचे मत बनले आहे. पुढील दोन वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतच त्यांना त्यांची खरी किंमत कळण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत वेळ निघून जाईल. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा तर मागितला नसावा ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. भाजपात शिस्त बिघडली, सोईचे राजकारण पूर्वी भाजपाला तत्त्वनिष्ठ पक्ष म्हणून ओळखले जायचे. मात्र आता भाजपप्रमाणेच बहुतांश पक्षात पूर्वीसारखे नेते आणि कार्यकर्ते उरले नाही. आता सर्व राजकारण सोयीनुसार चालत आहे. त्याचा प्रत्यय जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना आला. देश व राज्यात प्रमुख विरोधक असलेल्या काँग्रेसलाच थेट अध्यक्षपद देऊन भाजपाने तत्त्वनिष्ठतेचा बुरखा स्वत:च फाडून टाकला. काँग्रेसमध्येही तत्त्वनिष्ठता उरली नाही. त्यामुळे त्यांचेही नेते जिल्हा परिषदेत भाजपच्या मांडीला मांडी लावून बसतात, मात्र बाहेर मंचावर भाजपवर आसूड ओढतात. यामुळेच हल्लीचे राजकारण नेते, उमेदवार व संबंधित पक्षांच्या सोयीनुसार चालत असल्याचे दिसून येत आहे.