शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

भाजपसमोर अंतर्गत बंडाळीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 05:00 IST

प्रशासनाची निवडणूक पूर्व तयारी झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्त्याच्या हालचालींना वेग आला आहे. मागील पंचवार्षिकमध्ये थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. नंतर भाजपने शिवसेनेला सोबत घेत उपाध्यक्ष  व एक सभापती पद देऊन सत्तेत सहभागी करून घेतले होते.  मात्र, २०१९ मध्ये राज्यात भाजप व शिवसेनेची युती फिस्कटली होती. तथापि, पालिकेत भाजप व शिवसेना युती कायम होती.

अविनाश खंदारेलोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पालिकेवरील वर्चस्वासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपकडून रणनीती आखली जात आहे. एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, प्रहार सुद्धा रिंगणात आहे. तिसरी आघाडी निर्माण होण्याचे संकेत असून भाजपला अंतर्गत बंडाळीला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाची निवडणूक पूर्व तयारी झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्त्याच्या हालचालींना वेग आला आहे. मागील पंचवार्षिकमध्ये थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. नंतर भाजपने शिवसेनेला सोबत घेत उपाध्यक्ष  व एक सभापती पद देऊन सत्तेत सहभागी करून घेतले होते.  मात्र, २०१९ मध्ये राज्यात भाजप व शिवसेनेची युती फिस्कटली होती. तथापि, पालिकेत भाजप व शिवसेना युती कायम होती.

अतिक्रमणाचा मुद्दा निवडणुकीत ठरेल कळीचा...वाढते अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मोहननगर, आनंदनगर, गोकुळनगर, महसूलनगर, महसूल कॉलनीमध्ये अतिक्रमण वाढत आहे. व्यंकटेशनगर, शिवाजीनगर, आदिवासी कॉलनी, कारखाना कॉलनी, जिजाऊनगर, बोरबन, चरडेनगर यासह अनेक प्रभागात रस्ता, नाली आदी मूलभूत सुविधा मिळाल्या नाही. त्याचाही त्रास राजकीय पक्षांना होणार आहे.

भाजपमध्ये आजी-माजी आमदारांचे गट- भाजपच्या दोन आजी व माजी आमदारांचे प्रबळ गट निर्माण  झाले आहे. भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष  यांना मानणारा एक गट आहे. या दोन्ही गटात चांगलीच धुसफूस सुरू आहे. भाजपमधील गटातटाचे राजकारण व अंतर्गत धुसफुशीचा परिणाम पालिकेच्या राजकारणावर दिसून येणार आहे. अंतर्गत बंडाळी शमविण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाची चांगलीच  दमछाक होणार असल्याचे संकेत आहे. इतरही पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे. त्यातून उमेदवारी देताना नेतृत्वाच्या नाकीनऊ येणार आहे. 

तिसरी आघाडी बिघडविणार समीकरण- पालिकेच्या निवडणुकीत अनेक पक्ष रिंगणात उतरणार असले तरी खरी लढत मात्र भाजप, शिवसेना, काँग्रेस, एमआयएम आणि नव्यानेच निर्माण झालेल्या तिसऱ्या आघाडीत होण्याची शक्यता आहे. - राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, वंचित आघाडी यांचीही अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. पालिकेच्या राजकारणात आजपर्यंत काँग्रेस, भाजप, शिवसेना यांनीच अनेक वर्षांपासून सत्ता उपभोगली आहे. मात्र, आता अनेकांना आरक्षण बदल झाल्यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.- काही नवीन युवक व महिलांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. त्यादृष्टीने नवयुवक आणि महिलांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भागातील जनतेशी संपर्क वाढविला जात आहे. - आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे गणित बिघडले आहे. मात्र, पक्षीय राजकारणामुळे त्यांनी आपला मोर्चा इतर प्रभागाकडे वळविला आहे. 

सर्वच पक्ष लागले कामालाराज्यातील काही पालिकांची निवडणूक जाहीर होवून स्थगित झाली आहे. येथेही कोणत्याही क्षणी निवडणूक घोषित होऊ शकते. हे लक्षात घेऊन सर्व प्रमुख पक्षांनी राजकीय बैठका घेऊन हालचालींना वेग दिला आहे. त्यामुळे आमचा पक्ष किती चांगला आहे व आमची सत्ता आल्यानंतर कशी कामे करू शकतो, ही भूमिका मतदारांना पटवून सांगण्यास सुरूवात झाली आहे. आपापल्या परीने काँग्रेस,  भाजप, शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, वंचित बहुजन आघाडी यासह नव्यानेच निर्माण झालेल्या तिसऱ्या आघाडीसह अपक्षही जोमाने कामाला लागले आहे. तिसरी आघाडी सर्व प्रस्थापित पक्षांना डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहे. शहरात नव्यानेच निर्माण झालेल्या तिसऱ्या आघाडीत अनेक होतकरू तरुणांचा समावेश आहे.  

 

टॅग्स :BJPभाजपा