शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

भाजपसमोर अंतर्गत बंडाळीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 05:00 IST

प्रशासनाची निवडणूक पूर्व तयारी झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्त्याच्या हालचालींना वेग आला आहे. मागील पंचवार्षिकमध्ये थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. नंतर भाजपने शिवसेनेला सोबत घेत उपाध्यक्ष  व एक सभापती पद देऊन सत्तेत सहभागी करून घेतले होते.  मात्र, २०१९ मध्ये राज्यात भाजप व शिवसेनेची युती फिस्कटली होती. तथापि, पालिकेत भाजप व शिवसेना युती कायम होती.

अविनाश खंदारेलोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पालिकेवरील वर्चस्वासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपकडून रणनीती आखली जात आहे. एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, प्रहार सुद्धा रिंगणात आहे. तिसरी आघाडी निर्माण होण्याचे संकेत असून भाजपला अंतर्गत बंडाळीला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाची निवडणूक पूर्व तयारी झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्त्याच्या हालचालींना वेग आला आहे. मागील पंचवार्षिकमध्ये थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. नंतर भाजपने शिवसेनेला सोबत घेत उपाध्यक्ष  व एक सभापती पद देऊन सत्तेत सहभागी करून घेतले होते.  मात्र, २०१९ मध्ये राज्यात भाजप व शिवसेनेची युती फिस्कटली होती. तथापि, पालिकेत भाजप व शिवसेना युती कायम होती.

अतिक्रमणाचा मुद्दा निवडणुकीत ठरेल कळीचा...वाढते अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मोहननगर, आनंदनगर, गोकुळनगर, महसूलनगर, महसूल कॉलनीमध्ये अतिक्रमण वाढत आहे. व्यंकटेशनगर, शिवाजीनगर, आदिवासी कॉलनी, कारखाना कॉलनी, जिजाऊनगर, बोरबन, चरडेनगर यासह अनेक प्रभागात रस्ता, नाली आदी मूलभूत सुविधा मिळाल्या नाही. त्याचाही त्रास राजकीय पक्षांना होणार आहे.

भाजपमध्ये आजी-माजी आमदारांचे गट- भाजपच्या दोन आजी व माजी आमदारांचे प्रबळ गट निर्माण  झाले आहे. भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष  यांना मानणारा एक गट आहे. या दोन्ही गटात चांगलीच धुसफूस सुरू आहे. भाजपमधील गटातटाचे राजकारण व अंतर्गत धुसफुशीचा परिणाम पालिकेच्या राजकारणावर दिसून येणार आहे. अंतर्गत बंडाळी शमविण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाची चांगलीच  दमछाक होणार असल्याचे संकेत आहे. इतरही पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे. त्यातून उमेदवारी देताना नेतृत्वाच्या नाकीनऊ येणार आहे. 

तिसरी आघाडी बिघडविणार समीकरण- पालिकेच्या निवडणुकीत अनेक पक्ष रिंगणात उतरणार असले तरी खरी लढत मात्र भाजप, शिवसेना, काँग्रेस, एमआयएम आणि नव्यानेच निर्माण झालेल्या तिसऱ्या आघाडीत होण्याची शक्यता आहे. - राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, वंचित आघाडी यांचीही अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. पालिकेच्या राजकारणात आजपर्यंत काँग्रेस, भाजप, शिवसेना यांनीच अनेक वर्षांपासून सत्ता उपभोगली आहे. मात्र, आता अनेकांना आरक्षण बदल झाल्यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.- काही नवीन युवक व महिलांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. त्यादृष्टीने नवयुवक आणि महिलांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भागातील जनतेशी संपर्क वाढविला जात आहे. - आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे गणित बिघडले आहे. मात्र, पक्षीय राजकारणामुळे त्यांनी आपला मोर्चा इतर प्रभागाकडे वळविला आहे. 

सर्वच पक्ष लागले कामालाराज्यातील काही पालिकांची निवडणूक जाहीर होवून स्थगित झाली आहे. येथेही कोणत्याही क्षणी निवडणूक घोषित होऊ शकते. हे लक्षात घेऊन सर्व प्रमुख पक्षांनी राजकीय बैठका घेऊन हालचालींना वेग दिला आहे. त्यामुळे आमचा पक्ष किती चांगला आहे व आमची सत्ता आल्यानंतर कशी कामे करू शकतो, ही भूमिका मतदारांना पटवून सांगण्यास सुरूवात झाली आहे. आपापल्या परीने काँग्रेस,  भाजप, शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, वंचित बहुजन आघाडी यासह नव्यानेच निर्माण झालेल्या तिसऱ्या आघाडीसह अपक्षही जोमाने कामाला लागले आहे. तिसरी आघाडी सर्व प्रस्थापित पक्षांना डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहे. शहरात नव्यानेच निर्माण झालेल्या तिसऱ्या आघाडीत अनेक होतकरू तरुणांचा समावेश आहे.  

 

टॅग्स :BJPभाजपा