शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसाखळी तुटल्याने वन्यजीव हिंस्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:31 IST

टिपेश्वर अभयारण्य व परिसरातील जंगलात वास्तव्य करून तृणभक्षी प्राण्यांवर गुजराण करणाऱ्या वाघांची अन्नसाखळी तुटल्यानेच ते हिंस्र बनले आहेत. त्यातूनच ते मानव आणि पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले करत असल्याचे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देवन्यप्राणी-मानवात संघर्षाची ठिणगी : तृणभक्षी प्राण्यांच्या मागावर वाघ जंगलाबाहेर

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : टिपेश्वर अभयारण्य व परिसरातील जंगलात वास्तव्य करून तृणभक्षी प्राण्यांवर गुजराण करणाऱ्या वाघांची अन्नसाखळी तुटल्यानेच ते हिंस्र बनले आहेत. त्यातूनच ते मानव आणि पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले करत असल्याचे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. राळेगाव तालुक्यातील जंगलामध्ये बछड्यांसह वास्तव्याला असलेल्या नरभक्षी वाघिणीकडून झालेल्या हल्ल्यामागेही हेच कारण असल्याचे वन्यजीव अभ्यासकांना वाटते. यातूनच मानव आणि वन्यजीवांत संघर्षाची ठिणगी पडल्याचे मानले जाते.पूर्वी टिपेश्वर अभयारण्य व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर तृणभक्षी प्राण्यांची संख्या होती. त्यात ससे, हरिण, सांबर, रोही यासारख्या प्राण्यांचा समावेश आहे. या प्राण्यांची शिकार करून वाघ आपली गुजराण करतो. वर्षभरात एक वाघ किमान ५० प्राण्यांची शिकार करतो. हे प्राणी जंगलाबाहेर जाऊ नये, त्यांची अन्नसाखळी तुटू नये, यासाठी वनविभागाकडून कुरण विकास योजना राबविली जाते. त्यासाठी लाखो रूपयांचा निधी येतो. परंतु या योजनेची प्रभावी अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही. केवळ कागदोपत्रीच ही योजना राबविली जात असल्याने वन्यजीवांचे अस्तित्वच आता धोक्यात आले आहे. टिपेश्वर अभयारण्य व परिसरातील ‘प्री बेस लाईन’ (खाद्य पुरवठ्याची साखळी) संपत आली आहे. परिणामी तृणभक्षी प्राणी सैरभैर झाले आहेत.मागील दोन वर्षांत या तृणभक्षी प्राण्यांनी जंगलाबाहेर जाणेच पसंद केले आहे. शेतशिवारात तूर, पºहाटीचे उत्पादन घेतले जाते. या प्राण्यांनी या पिकांना आपले टार्गेट केले. खाद्याच्या शोधात तृणभक्षी प्राणी जंगलाबाहेर पडल्याने त्यांच्या मागोमाग वाघही जंगलाबाहेर पडले. सध्या राळेगाव तालुक्यातील जंगलात बछड्यांसह भटकत असलेली वाघिणदेखिल तृणभक्षी प्राण्यांच्या मागावर जंगल सोडून बाहेर गेली, असे वन्यजीव अभ्यासकांना वाटते. राळेगाव परिसरात जुने प्रादेशिक जंगल आहे. तसेच तेथे लपण्यासाठी पुरेसे आडोसेदेखील आहेत. त्यामुळे ही वाघिण त्याच परिसरात रमली. या भागात रानडुकरांची संख्या मोठी असून त्यांचा आकार मोठा आहे. त्यामुळे वाघिणीला सहज खाद्य मिळाले. परिणामी अद्यापही ही नरभक्षी वाघिण त्याचठिकाणी वास्तव्याला आहे.या वाघिणीने आतापर्यंत १४ जणांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे नागरिक प्रचंड भयग्रस्त आहे. या वाघिणीला जेरबंद करण्याची योजना वनविभागाने आखली असली तरी तिच्यासोबत असलेल्या तिच्या बछड्यांचे काय, हा प्रश्न वन्यजीव अभ्यासकांना अस्वस्थ करीत आहे. सदर नरभक्षी वाघिणीला बछड्यांसह बेशुद्ध करून सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे उभे ठाकले आहे.सरकारी व्यवस्थेचा हस्तक्षेप वाढलाटिपेश्वर अभयारण्यातून वन्यजीव बाहेर पडण्याचे आणखी एक कारण सांगितले जाते. या जंगलात मोठ्या प्रमाणावर सरकारी हस्तक्षेप वाढला आहे. सन २०१३-१४ मध्ये जवळपास वर्षभर जेसीबीद्वारे टिपेश्वर अभयारण्यात खोदकाम करण्यात आले. जेसीबीचा भलामोठा आवाज आणि मानवी वावर, यामुळे वन्यजीव सैरभैर झाले व जंगलाबाहेर निघून गेले, असा वन्यजीवपे्रमींचा अंदाज आहे.वन्यजीव जंगलामध्ये सुरक्षित राहावे, असे वाटत असेल तर सर्वप्रथम जंगलातील अन्नसाखळी वाढविणे गरजेचे आहे. टिपेश्वर अभयारण्यासह परिसरातील प्रादेशिक जंगलातील कुरण मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले आहे. कुरण वाढविण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागतो. परंतु त्यामुळे अनेक वर्षासाठीची वन्यजीवांसाठी अन्नाची तजविज होऊ शकते.-प्राचार्य धर्मेंद्र तेलगोटे,वन्यजीव अभ्यासक

टॅग्स :Tigerवाघ