शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

‘मिनी मंत्रालया’ची वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:24 AM

जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची राजकीय वाताहत झाली आहे. आधीच तीन पक्ष व अपक्षाचे सरकार आणि त्यात अभ्यासू व अनुभवी सदस्यांची प्रचंड वाणवा असल्याने

ठळक मुद्देअभ्यासू-अनुभवाचा अभाव : प्रशासन शिरजोर, सभापती केवळ खात्यांपुरते

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची राजकीय वाताहत झाली आहे. आधीच तीन पक्ष व अपक्षाचे सरकार आणि त्यात अभ्यासू व अनुभवी सदस्यांची प्रचंड वाणवा असल्याने प्रशासन पदाधिकाऱ्यांवर शिरजोर झाल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. पदाधिकारी व सदस्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अधिकारी वर्ग त्यांना नियम-कायद्यांचा बाऊ करून फाईलीतच गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. सभापती मंडळी संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करण्याऐवजी आपल्या खात्यापुरतेच काम करीत असल्याने आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत.जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्षांनी मिळून सत्ता स्थापन केली. नैसर्गिकरित्या ही युती-आघाडी सुरूवातीपासून कुणालाच रूचली नाही. मात्र सत्तेपेक्षा दुसरे काहीही महत्त्वाचे नसते, या भावनेतून एकमेकांना सदोदित पाण्यात पाहणारे पक्ष एकत्र आले. त्यातून पदाधिकाºयांमधील अंतर्गत कुरबुरीतून प्रशासन दरदिवशी वरचढ होऊ लागले. त्यातच सीईओंच्या पारदर्शक प्रशासनाच्या दाव्याने सर्वांचीच बोलती बंद झाली. त्यामुळे आता सर्व पुन्हा एकवटले. त्याचा प्रत्यय सर्वसाधारण सभेत आला. शिवसेना सदस्यांच्या दबावाला अध्यक्ष बळी पडल्या अन् सभा तहकूब करीत त्यांनी सत्ताधाºयांचे विरोधकांना सहकार्य असल्याचे एकप्रकारे अधोरेखित केले. यातून जिल्हा परिषदेत राजकीय कलगितुरा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.बदली-समायोजनावरच भर, विकास कामे ठरताहेत दुय्यमअल्प पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत आहे. राम देवसरकर यांच्यासह महागावच्या सभापतींनी हाच धागा पकडून सर्वसाधारण सभेत सभा सुरळीत चालू देण्याचे साकडे घातले. मात्र शिवसेना सदस्यांना यापेक्षा कोण अधिकारी रजेवर आहे, सीईओंचा चार्ज कुणाला दिला, यातच जादा रस दिसला. पाणीटंचाईसह विकास कामांचा त्यांना विसर पडल्याचे दिसून आले. त्यांनी सभेतून बहिर्गमन केले. त्यात अध्यक्षांनी शिवसेनेसह भाजपाचे सदस्य बाहेर पडल्याने सभा तहकूब करावी लागल्याचे सांगितले, तर भाजपा गटनेत्या मंगला पावडे यांनी काँग्रेसचेच सदस्य बाहेर गेल्याने सभा तहकूब झाल्याचा दावा केला. यामुळे सत्ताधाºयांमधील दुरावा पुन्हा स्पष्ट झाला. या सर्व कलगितुºयात जिल्ह्यातील विकास कामे मात्र बाजूला पडली, हेच खरे.