शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तगड्या उमेदवारापुढे ‘बंगला’ डगमगतो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहरराव नाईक यांनी मागील निवडणुकीपर्यंत ‘बंगल्या’त राजकीयदृष्ट्या कोणाला प्रवेश दिला नाही. या घराण्यातील प्रत्येक उमेदवाराने अपवाद वगळता २५ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजयाची नोंद केली. पण, जेव्हा केव्हा बंगल्यातील उमेदवारांपुढे ‘भारी’ उमेदवारा उभा ठाकला तेव्हा त्यांचे मताधिक्य घटलेलेच आहे.

ठळक मुद्देपुसद मतदारसंघात काठावर विजय : वर्षागणिकचा मताधार घटतोय

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकप्रियता म्हणा की आणखी काही. पुसद विधानसभा मतदारसंघात ‘बंगल्या’चा अर्थात नाईक घराण्याचा विजय जणू विधिलिखित आहे. मात्र जेव्हा केव्हा प्रतिस्पर्धी तगडा असतो तेव्हा ‘बंगल्या’च्या अढळ स्थानाला धोका तर पोहोचणार नाही ना, अशी हुरहुर समर्थकांमध्ये असते. १९९५ च्या विधानसभेत केवळ दोन हजार १५८ मताधिक्याने ‘बंगल्या’ची प्रतिष्ठा राखली होती. जनता दलाचे उमेदवार नरेंद्र मुखरे यांनी मनोहरराव नाईक यांना नाकीदम आणला होता. अशीच काहिशी परिस्थिती यावेळच्या निवडणुकीत दिसून येत होती. इंद्रनील नाईक नऊ हजार ७०० मताधिक्य घेत विजयी झाले. ‘बंगल्या’चा घटत चाललेला मताधार नाईक घराण्यासाठी चांगले संकेत नाही, असे म्हणायला मोठा वाव आहे.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहरराव नाईक यांनी मागील निवडणुकीपर्यंत ‘बंगल्या’त राजकीयदृष्ट्या कोणाला प्रवेश दिला नाही. या घराण्यातील प्रत्येक उमेदवाराने अपवाद वगळता २५ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजयाची नोंद केली. पण, जेव्हा केव्हा बंगल्यातील उमेदवारांपुढे ‘भारी’ उमेदवारा उभा ठाकला तेव्हा त्यांचे मताधिक्य घटलेलेच आहे. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत जनता पार्टीचे वसंतराव पॉल हे सुधाकरराव नाईक यांना विजयापासून दूर ठेवतील असे वातावरण तयार झाले होते. त्यावेळी नाईक यांना ११ हजार ५२७ मतांच्या आघाडीने विजय नोंदविता आला.बंगल्याच्या विजयाची मालिका १९९५ मध्ये नरेंद्र मुखरे यांच्या रूपाने खंडित करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मुखरे यांचा विजय त्यावेळी थोडक्यात हुकला. कुटुंबातील नवीन उमेदवार मनोहरराव नाईक यांच्या रूपाने घराण्याने दिला होता. मनोहरराव नाईक यांना ६३ हजार ७३२, तर मुखरे यांनी ६१ हजार ६६४ मते घेतली होती. ते जनता दलाचे उमेदवार होते. मनोहरराव नाईक यांचा काठावर झालेला विजय पाहता पुढील निवडणुकीत पुन्हा सुधाकरराव नाईक रिंगणात उतरले. शिवसेनेच्या तिकीटावर नरेंद्र मुखरे त्यांच्यासमोर आले. यावेळी मात्र सुधाकरराव नाईक १५६७० मताधिक्य घेत विजयी झाले.२००४ च्या निवडणुकीनंतर मात्र नाईकांसमोर स्ट्राँग उमेदवार आला नाही. दोनवेळा आरती फुफाटे, प्रकाश देवसरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून नाईक घराण्याला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. यात ते यशस्वी झाले नाही. पुढे मनोहरराव नाईक यांचा विजय ३० ते ६५ हजार मताधिक्यावर गेला. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत बंगल्यातील अनुभवी माणसं रिंगणात उतरली. आता २०१९ च्या निवडणुकीत नाईक घराण्यातील चौथ्या पिढीचे वारसदार इंद्रनील नाईक या तरूणाला मैदानात उतरविले. त्यांच्यासमोर नाईक कुटुंबातीलच भाजपचे अ‍ॅड. नीलय नाईक यांनी जोरदार लढत दिली. कदाचित या मतदारसंघात नीलय निघतील असे आराखडेही मांडले जात होते. अखेरच्या क्षणी इंद्रनील नाईक यांनी विजय मिळवित बंगल्याचा गड कायम राखला. पण नाईक घराण्याने १९९५ च्या अपवाद वगळता आतापर्यंत घेतलेल्या मताधिक्यापेक्षा सर्वात कमी (९७०१) मतांनी विजयी ठरलेले ते उमेदवार आहेत.आत्मचिंतनाचा विषयबंगल्याचा मताधार कमी होत असल्याच्या बाबीला मोठा आधार मिळतो आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही अनिता नाईक यांना अतिशय कमी मतांनी विजय नोंदविता आला. अपेक्षेपेक्षा कमी मते त्यांनी घेतली होती, हे विसरता येणार नाही. निसटता का होईना विजय मिळत असल्याने बंगल्याची इभ्रत अद्याप शाबूत असली तरी सातत्याने घटणारे मताधिक्य हा बंगल्यासाठी चिंतेचा आणि तेवढाच आत्मचिंतनाचा विषय ठरला आहे.

टॅग्स :pusad-acपुसद