शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
3
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
4
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
5
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
6
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
7
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
8
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
9
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
10
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
11
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
12
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
13
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
14
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
15
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
16
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
17
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
18
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
19
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
20
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

तगड्या उमेदवारापुढे ‘बंगला’ डगमगतो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहरराव नाईक यांनी मागील निवडणुकीपर्यंत ‘बंगल्या’त राजकीयदृष्ट्या कोणाला प्रवेश दिला नाही. या घराण्यातील प्रत्येक उमेदवाराने अपवाद वगळता २५ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजयाची नोंद केली. पण, जेव्हा केव्हा बंगल्यातील उमेदवारांपुढे ‘भारी’ उमेदवारा उभा ठाकला तेव्हा त्यांचे मताधिक्य घटलेलेच आहे.

ठळक मुद्देपुसद मतदारसंघात काठावर विजय : वर्षागणिकचा मताधार घटतोय

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकप्रियता म्हणा की आणखी काही. पुसद विधानसभा मतदारसंघात ‘बंगल्या’चा अर्थात नाईक घराण्याचा विजय जणू विधिलिखित आहे. मात्र जेव्हा केव्हा प्रतिस्पर्धी तगडा असतो तेव्हा ‘बंगल्या’च्या अढळ स्थानाला धोका तर पोहोचणार नाही ना, अशी हुरहुर समर्थकांमध्ये असते. १९९५ च्या विधानसभेत केवळ दोन हजार १५८ मताधिक्याने ‘बंगल्या’ची प्रतिष्ठा राखली होती. जनता दलाचे उमेदवार नरेंद्र मुखरे यांनी मनोहरराव नाईक यांना नाकीदम आणला होता. अशीच काहिशी परिस्थिती यावेळच्या निवडणुकीत दिसून येत होती. इंद्रनील नाईक नऊ हजार ७०० मताधिक्य घेत विजयी झाले. ‘बंगल्या’चा घटत चाललेला मताधार नाईक घराण्यासाठी चांगले संकेत नाही, असे म्हणायला मोठा वाव आहे.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, मनोहरराव नाईक यांनी मागील निवडणुकीपर्यंत ‘बंगल्या’त राजकीयदृष्ट्या कोणाला प्रवेश दिला नाही. या घराण्यातील प्रत्येक उमेदवाराने अपवाद वगळता २५ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजयाची नोंद केली. पण, जेव्हा केव्हा बंगल्यातील उमेदवारांपुढे ‘भारी’ उमेदवारा उभा ठाकला तेव्हा त्यांचे मताधिक्य घटलेलेच आहे. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत जनता पार्टीचे वसंतराव पॉल हे सुधाकरराव नाईक यांना विजयापासून दूर ठेवतील असे वातावरण तयार झाले होते. त्यावेळी नाईक यांना ११ हजार ५२७ मतांच्या आघाडीने विजय नोंदविता आला.बंगल्याच्या विजयाची मालिका १९९५ मध्ये नरेंद्र मुखरे यांच्या रूपाने खंडित करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मुखरे यांचा विजय त्यावेळी थोडक्यात हुकला. कुटुंबातील नवीन उमेदवार मनोहरराव नाईक यांच्या रूपाने घराण्याने दिला होता. मनोहरराव नाईक यांना ६३ हजार ७३२, तर मुखरे यांनी ६१ हजार ६६४ मते घेतली होती. ते जनता दलाचे उमेदवार होते. मनोहरराव नाईक यांचा काठावर झालेला विजय पाहता पुढील निवडणुकीत पुन्हा सुधाकरराव नाईक रिंगणात उतरले. शिवसेनेच्या तिकीटावर नरेंद्र मुखरे त्यांच्यासमोर आले. यावेळी मात्र सुधाकरराव नाईक १५६७० मताधिक्य घेत विजयी झाले.२००४ च्या निवडणुकीनंतर मात्र नाईकांसमोर स्ट्राँग उमेदवार आला नाही. दोनवेळा आरती फुफाटे, प्रकाश देवसरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून नाईक घराण्याला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. यात ते यशस्वी झाले नाही. पुढे मनोहरराव नाईक यांचा विजय ३० ते ६५ हजार मताधिक्यावर गेला. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत बंगल्यातील अनुभवी माणसं रिंगणात उतरली. आता २०१९ च्या निवडणुकीत नाईक घराण्यातील चौथ्या पिढीचे वारसदार इंद्रनील नाईक या तरूणाला मैदानात उतरविले. त्यांच्यासमोर नाईक कुटुंबातीलच भाजपचे अ‍ॅड. नीलय नाईक यांनी जोरदार लढत दिली. कदाचित या मतदारसंघात नीलय निघतील असे आराखडेही मांडले जात होते. अखेरच्या क्षणी इंद्रनील नाईक यांनी विजय मिळवित बंगल्याचा गड कायम राखला. पण नाईक घराण्याने १९९५ च्या अपवाद वगळता आतापर्यंत घेतलेल्या मताधिक्यापेक्षा सर्वात कमी (९७०१) मतांनी विजयी ठरलेले ते उमेदवार आहेत.आत्मचिंतनाचा विषयबंगल्याचा मताधार कमी होत असल्याच्या बाबीला मोठा आधार मिळतो आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही अनिता नाईक यांना अतिशय कमी मतांनी विजय नोंदविता आला. अपेक्षेपेक्षा कमी मते त्यांनी घेतली होती, हे विसरता येणार नाही. निसटता का होईना विजय मिळत असल्याने बंगल्याची इभ्रत अद्याप शाबूत असली तरी सातत्याने घटणारे मताधिक्य हा बंगल्यासाठी चिंतेचा आणि तेवढाच आत्मचिंतनाचा विषय ठरला आहे.

टॅग्स :pusad-acपुसद