शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

बोगस बियाण्यांचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 9:43 PM

तालुक्यातील भोजला येथे सिजेन्टा या कंपनी चे शुगर क्विन या जातीचे टरबूजाच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि शेतकरी नेते मनीष जाधव आले होते. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

ठळक मुद्देटरबूज बियाण्यांचा दगा : चार गावातील शेतकरी आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील भोजला येथे सिजेन्टा या कंपनी चे शुगर क्विन या जातीचे टरबूजाच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आणि शेतकरी नेते मनीष जाधव आले होते. त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.टरबूज पिकाला अल्प फुल व जी फळे आलीत ती वाकडीतिकडी आढळून आली. पिकाचे काटेकोर व्यवस्थापन व नियोजन करुनही या दोषाचे प्रादुर्भाव आढळून येत असल्याचे निर्देशनास आले.निंबी पारडी, भोजला ही तीन गावे टरबुजच्या उत्पादनामध्ये प्रसिद्ध आहे. चांगल्या गुणवत्ता पूर्ण टरबुजाचे पीक गावातील शेतकरी घेतात. परंतु यावर्षीच्या संपूर्ण हंगाम अडचणीत आला आहे. या बोगस बियाण्याला एकूण २२ शेतकरी बळी पडलेले आहे. या बोगस बियाण्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडणार असल्याने शेतकरी चिंतातुर व अस्वस्थ झालेला आहे.शेतकºयांच्या नुकसानीची कृषी विद्यापीठ, विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पाहणी केली. याचा अहवाल आल्यानंतर बियाणे कंपनीकडून लागवड खर्च व येणारे उत्पन्न वसूल केले जाईल, असे आश्वासन किशोर तिवारी यांनी शेतकºयांना दिले. यावेळी तिवारी यांनी कृषी आयुक्त पुणे यांच्या सोबत चर्चा केली. संबंधित कंपनीच्या माध्यमातून तातडीने दखल घेऊन शासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी, विलंब झाल्यास हक्कासाठी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनीष जाधव यांनी दिला. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील हे बोगस बियाणे, किटकनाशकची मालिका थांबायचे नाव घेत नाही. संबंधित यंत्रणाच्या कार्यक्षमतावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असा आरोप मनीष जाधव यांनी केले आहे .यावेळी एसडीओ नितीन हिंगोले, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक, तहसीलदार डॉ.संजय गरकल, तालुका कृषी अधिकारी धुळधुळे, गटविकास अधिकारी गवई, तालुका कृषी अधिकारी शंकर राठोड, कृषी सहायक सचिन राठोड, प्रा.महादेव गावंडे, संजय कुंभारे, हेमंत ठाकरे, निखिल ठाकरे, विजय राऊत, भालचंद्र पेन्शनवार, जिजाबाई गावंडे , विशाल ठाकरे, गजानन ठाकरे, लक्ष्मीबाई ठाकरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.