शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

बेपत्ता चालकाचा मृतदेहच सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 10:08 PM

चार दिवसांपूर्वी नागपूरला जातो म्हणून घरुन निघून गेलेल्या युवकाचा वर्धा जिल्ह्यातील कोटेश्वर येथे नदीत मृतदेहच सापडला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देघातपाताचा संशय : नागपूर ऐवजी कोटेश्वरला पोहोचला कसा?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चार दिवसांपूर्वी नागपूरला जातो म्हणून घरुन निघून गेलेल्या युवकाचा वर्धा जिल्ह्यातील कोटेश्वर येथे नदीत मृतदेहच सापडला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.रुपेश खरवडे असे यातील मृताचे नाव आहे. तो स्थानिक शिवाजी चौक भागातील चमेडियानगर येथील रहिवासी होता. तो संदीप बये या आपल्या मामाकडे राहत होता. त्याच्याकडे टाटा-एस वाहन होते. हे वाहन तो स्वत:च चालवित होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यात काम निघाल्याने हे वाहन उभेच होते. तो येथीलच एका व्यक्तीकडे वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. नागपुरातून नवीन वाहन घेण्याची त्याने तयारी चालविली होती. त्यासाठी सुमारे दोन लाखांची रक्कमही जमविल्याचे सांगितले जाते. सोमवारी १५ जानेवारी रोजी तो नागपूरला जातो म्हणून घरुन निघून गेला. मात्र परत आलाच नाही. मित्र व नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध करूनही थांगपत्ता न लागल्याने अखेर मंगळवारी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात त्याच्या हरविल्याची फिर्याद नोंदविली गेली. इकडे त्याची शोधाशोध सुरू असतानाच काही जण वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील कोटेश्वर येथे पोहोचले. तेथे एका शेतात रुपेशचा मोबाईल सापडला. त्यानंतर शोध घेतला असता वर्धा नदीत त्याचा मृतदेह आढळून आला. मात्र मृतदेह फुगलेला नव्हता. त्यामुळेच रुपेशचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत तर्कवितर्क लावला जात आहे. त्याच्या घातपाताची शंकाही व्यक्त केली जात आहे. देवळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वर्धा येथे रुपेशच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.‘तो’ साथीदार कोण ?नागपूरला जाताना रुपेश सोबत कुणी तरी साथीदार होता, असे सांगितले जाते. तो साथीदार नेमका कोण? आणि रुपेशचा मृतदेह सापडूनही तो अद्याप पुढे का आला नाही, असा प्रश्न परिसरात उपस्थित केला जात आहे. रुपेशच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. देवळी पोलीस या कारणांचा शोध घेत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू