शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भाजप सरकार राज्यातील शेतकऱ्यांंना उद्ध्वस्त करण्याचे पाप करीत आहे, विजय वडेट्टीवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 13:10 IST

काँग्रेसची जनसंवाद यात्रा

यवतमाळ : अतिवृष्टीनंतर आर्थिक साहाय्य करणार म्हणाले, ५० हजारांचा प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला, त्यानंतर शेतकरी सन्मान निधीच्या बाता मारल्या. यापैकी किती जणांच्या खात्यात अनुदान पडले, असा सवाल करीत उद्योगपती मित्रांसाठी काम करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी कसलेही घेणे-देणे नसल्याची टीका करीत भाजप सरकार राज्यातील शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे पाप करीत असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

मंगळवारी दुपारी काँग्रेसची जनसंवाद यात्रा यवतमाळमध्ये आली. वडकी, राळेगाव, आर्णी आदी ठिकाणीही यात्रेअंतर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यवतमाळ येथील कळंब चौकात यात्रेचे स्वागत करण्यात आले, तर मराठा आरक्षणासाठी संघर्ष करीत असलेल्या आंदोलकांशी वडेट्टीवार यांनी आर्णी बायपासवर संवाद साधला. त्यानंतर माळम्हसोला येथील शेतात वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शेतकरी, तसेच नागरिकांशी संवाद साधला.

सोयाबीनची अवस्था वाईट आहे, कापसाचे भाव पडलेले आहेत, शेतकऱ्याला चार पैसे मिळतील असे वाटत असताना सरकारने कांदा निर्यातीवर ५० टक्के टॅक्स लावला. आता तांदळावरही २० टक्के टॅक्स लागू केला आहे. दुसरीकडे अदानी सारखे उद्योगपती मोठमोठ्या वखारी खोदून स्वस्तात शेतमाल खरेदी करणार आहेत आणि दरवाढ झाल्यानंतर हाच शेतमाल दाम दुपटीने विकणार आहेत, अशी सारी व्यवस्था मोदी सरकारने देशात उभी केली आहे. या सरकारला शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांच्या प्रश्नाशी कसलेही देणे-घेणे नसल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

सध्या राज्यातील परिस्थिती विदारक झाली आहे, मराठा आंदोलकांवर लाठीमार होतो आहे, दुसरीकडे मागासवर्गीयांवरील अत्याचार वाढले आहेत, महिला अत्याचाराच्या प्रमाणातही भयंकर वाढ झाली आहे, अशा परिस्थितीत राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडतो, असे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.

यावेळी माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, आमदार वजाहत मिर्झा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, यवतमाळ काँग्रेस प्रभारी संजय राठोड, जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, जावेद अन्सारी, अनिल गायकवाड, दिनेश गोगरकर, चंद्रशेखर चौधरी, प्रदीप साळवे, संजय भोयर, नारायण राठोड, सरपंच उमेश चव्हाण, ओम तिवारी आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

भाजपने घेतला ‘इंडिया’चा धसका

महाराष्ट्रासह देशात भाजपविरोधात इंडिया आघाडी आकाराला येत आहे. या आघाडीची एकजूट पाहून भाजपने धसका घेतल्याचे सांगत त्यामुळेच इंडियाऐवजी भारत असे गॅझेटमध्ये नाव बदलल्याची टीका विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशात भाजपला २०० पेक्षा कमी जागा मिळतील, असे सर्व्हे येत असून पुढील काळात कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास भाजपची आणखी घसरण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आदेश कोणी दिले; नार्को टेस्ट करा

जालना जिल्ह्यात शांततामय मार्गाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपण लाठीमार करण्याचे आदेश दिले नव्हते, असे म्हटले आहे. आदेश नव्हते, तर एसपींनी लाठीचार्ज कसा केला या प्रकरणात दुय्यम अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मग हीच कारवाई एसपींवर का करीत नाही, असा सवाल करीत सर्वांचीच नार्को टेस्ट करावी, म्हणजे कोणी आदेश दिले हे पुढे येईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसYavatmalयवतमाळ