शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे परीक्षा केंद्रांची व्यवस्था कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 8:49 PM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक ‘रिसेट’ करताना स्थानिक महाविद्यालयांवर विद्यार्थ्यांचा अतिरिक्त बोझा लादण्यात आला. ऐनवेळी आसनव्यवस्था कोलमडली. यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. यामुळे संतप्त पालक प्राध्यापकांवर बरसले.

ठळक मुद्देविद्यापीठ परीक्षा । क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी, गोंधळाची स्थिती, पालक बरसले प्राध्यापकांवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक ‘रिसेट’ करताना स्थानिक महाविद्यालयांवर विद्यार्थ्यांचा अतिरिक्त बोझा लादण्यात आला. ऐनवेळी आसनव्यवस्था कोलमडली. यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. यामुळे संतप्त पालक प्राध्यापकांवर बरसले. तर काही विद्यालयांना आसनव्यवस्था वाढवावी लागली. हा गुंता चिघळू नये म्हणून सिनेट सदस्यांना परीक्षा केंद्रावर धाव घ्यावी लागली.जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये शनिवारी प्रचंड गोंधळाची स्थिती होती. प्रत्येक महाविद्यालयामध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी होते. यामुळे एका टेबलवर दोन विद्यार्थी बसविले गेले. जादा विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था करताना अतिरिक्त वेळ वाया गेला. यामुळे परीक्षेचे वेळापत्रक बदलावे लागले.नंदूरकर महाविद्यालयात वेळापत्रक बदलावे लागले. त्याचप्रमाणे कला आणि वाणिज्य महाविद्यालयातही पेपर देताना वेळ झाला. या विद्यार्थ्यांना नंतर वेळ वाढवून देण्यात आला. नंदूरकर विद्यालयाची क्षमता ५०० विद्यार्थ्यांची असताना ९०० विद्यार्थी बसविले होते. कला वाणिज्य महाविद्यालयाची क्षमता ५५० विद्यार्थ्यांची असताना १२२५ विद्यार्थी बसविले होते. अणे महिला महाविद्यालयाची क्षमता ७०० विद्यार्थ्यांची असताना ९०० विद्यार्थी बसविण्यात आले.अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही महाविद्यालयांची होती. यामुळे केंद्रप्रमुख आणि प्राध्यापकांवर चांगलाच ताण वाढला होता. गर्दी नियंत्रित करण्यासोबत परीक्षा सुरळीत करण्याची दुहेरी जबाबदारी प्राध्यापकांना पार पाडावी लागली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून ढिसाळ नियोजन झाल्यामुळे महाविद्यालयांवर ताण आला. महत्वाचे म्हणजे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना भर उन्हात मनस्ताप सहन करावा लागला.ग्रामीण भागात लिंक नसल्याने अडचणीयावेळी विद्यापीठाने पेपरचे गठ्ठे पाठविण्याऐवजी एकच आॅनलाईन प्रत पाठविली. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आॅनलाईन पेपरची प्रिंट काढताना ग्रामीण भागात लिंक नसणे हा प्रकार वारंवार घडतो. यासोबतच विजेचा लपंडाव सुरू असतो. यामुळे निर्धारित वेळेत पेपरची प्रिंट काढताना मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे विद्यापीठाने पूर्वीप्रमाणे पेपर पाठवून परीक्षा घ्यावी, असे मत बहुतांश केंद्रप्रमुखांनी विद्यापीठाकडे नोंदविले आहे.विद्यार्थ्यांची नव्हे केंद्रप्रमुखांचीच परीक्षाशनिवारची संपूर्ण स्थिती हाताळणे म्हणजे केंद्रप्रमुखांचीच परीक्षा पाहण्यासारखा प्रकार असल्याचे मत केंद्रप्रमुखांनी नोंदविले. विद्यापीठाने स्थानिक साधन सामुग्री आणि आसनव्यवस्था लक्षात घेऊन निर्णय घ्यावे, असे मत नोंदविले आहे. विद्यापीठ हा विषय किती गांभीर्याने घेते, त्यावरच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पुढील पेपरचे नियोजन अवलंबून आहे.महाविद्यालयाची गंभीर स्थिती विद्यापीठाला वारंवार सांगितली. यानंतरही प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न झाले नाही. झेरॉक्ससाठी विद्यापीठाला निधी मागण्यात आला. मात्र मिळाला नाही. अनेक केंद्रावर रेंजचा प्रश्न असल्याचे विद्यापीठाच्या लक्षात आणून दिले. यानंतरही दखल घेतली गेली नाही. महाविद्यालयाच्या क्षमतेकडे लक्ष न देता निर्णय घेतला गेला. यातून महाविद्यालयेच अडचणीत सापडली.- विवेक देशमुखसिनेट सदस्य, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी