शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सावधान ! चोरट्यांनी मारला 42 लाखांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

शेतातील मोटारपंप, धान्यसुद्धा सुरक्षित राहिलेले नाही. शेळ्या, बैल, गाई यांचीही सर्रास चोरी केली जात आहे. याचा एकही गुन्हा उघड झालेला नाही. शेतकरी व गोरगरीब वर्गही आता चोरट्यांमुळे धास्तावलेला आहे. पूर्वी एका ठराविक वर्गालाच चोरांची भीती राहत होती. परिस्थिती त्या पलीकडे गेली आहे. चोरच पोलिसांवर भारी पडत आहे, अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.  ग्रामीण भागातील नागरिक वाढत्या चोऱ्यांमुळे दहशतीत वावरत आहे.

सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ३१ ही पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल करून घेण्यापलीकडे कुठलीही कारवाई केली जात नाही. नागरिकांनी स्वत:हून एखादा चोर पकडून दिला तर त्याला दोन-तीन गुन्ह्यांत सहभागी दाखवून तपास पूर्ण केला जातो. चोरी गेलेला मुद्देमाल कधीच शोधला जात नाही. अपवादानेच तो एखाद्या प्रकरणात हाती लागतो. पोलीस गुन्ह्यांचा तपास करणे विसरले की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. १७ दिवसांमध्ये चोरीच्या ४१ घटना घडल्या आहेत. यात शहरी, ग्रामीण दोन्ही भागांचा समावेश आहे. सातत्याने चोरी होत असूनही चोर मिळत का नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. शेतातील मोटारपंप, धान्यसुद्धा सुरक्षित राहिलेले नाही. शेळ्या, बैल, गाई यांचीही सर्रास चोरी केली जात आहे. याचा एकही गुन्हा उघड झालेला नाही. शेतकरी व गोरगरीब वर्गही आता चोरट्यांमुळे धास्तावलेला आहे. पूर्वी एका ठराविक वर्गालाच चोरांची भीती राहत होती. परिस्थिती त्या पलीकडे गेली आहे. चोरच पोलिसांवर भारी पडत आहे, अशी स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.  ग्रामीण भागातील नागरिक वाढत्या चोऱ्यांमुळे दहशतीत वावरत आहे. पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करण्याची गरज आहे. 

सर्वसामान्यांच्या मालमत्ता संरक्षणासाठी गस्त घालणारे पोलीसच चोरांच्या रडारवर आहे. थेट पोलीस ठाण्यातून दुचाकी चोरी करण्यापर्यंत चोरांची मजल गेली आहे. सध्या जिल्ह्यात काय चालू आहे असे कोणी विचारले तर चोरांचीच चलती असल्याचे सहज उत्तर निघते. एप्रिल महिन्यातील १७ दिवसांत चोरट्यांनी ४१ ठिकाणी चोरी केली. त्यामध्ये ४१ लाख ७८ हजार ७३८ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरांपासून घर, शेत, गोठा, जनावर, वाहन, बँक, एटीएम, निर्जनस्थळ, गर्दीची ठिकाणे इतकेच काय पोलीस ठाणे हेसुद्धा सुरक्षित नाही. चोरी होणारच नाही अशी कुणी हमी देऊ शकत नाही. एवढी दहशत चोरट्यांची निर्माण झाली आहे. घरात चोरी होते म्हणून सोबत दागिने घेतले तर प्रवासातही ते चोरीला जातात. अशा दोन घटना १७ दिवसांच्या अवधीत घडल्या आहेत. 

१७ दिवसात केवळ चार गुन्हे उघड - १ ते १७ एप्रिल दरम्यान जिल्ह्यात दुचाकीचोरीच्या १३ घटना तर चारचाकी वाहनचोरीची एक घटना घडली आहे. याशिवाय घरफोडी, लुटमार या घटना ४१ आहेत. यातील केवळ चार गुन्ह्यांचा पोलिसांना छडा लावता आला आहे. - घाटंजी पोलीस रात्रगस्त करीत असल्याने दुकान फोडणारे चोरटे रंगे हाथ त्यांच्या हाती लागले. झटापटीत दोन जण पळून गेले. दोघांना अटक करता आली. विशेष म्हणजे मुद्देमाल त्यांच्याजवळ मिळून आला. - पारवा पोलिसांनी फिरते पोलीस ठाणे उपक्रमातून वाटमारीची घटना उघड केली. आरोपी अटक केला. पुसद ग्रामीण पोलिसांनी घोन्सरातील वृद्धेचा गळा चिरणाऱ्या दोघांना अटक केली. 

१४ वाहने गेली चोरीला - वाहन सार्वजनिक ठिकाणी ठेवा, पोलीस ठाण्यात ठेवा, स्वत:च्या घरात ठेवा, चोरटे ते लांबविल्याशिवाय राहत नाही. एप्रिल महिन्यात १७ दिवसांत १४ वाहने चोरीला गेली. यामध्ये १३ दुचाकी व एका कारचा समावेश आहे. दिग्रसमधील दुद्दलवार यांची मैदान उभी असलेली कार चोरट्याने नेली. याची तक्रार दाखल करून दहा दिवस लोटले आहे. अद्याप शोध लागलेला नाही. दुचाकी चाेरीबाबत तर सांगायलाच नको. तक्रार द्या आणि विसरून जा. 

शाळा, अंगणवाडीसुद्धा लक्ष्य- चोरटे गावखेड्यातील शाळा, अंगणवाड्यासुद्धा सोडायला तयार नाही. तेथील शैक्षणिक साहित्य सर्रास लंपास केले जात आहे. महागाव येथील मेंढीतील जिल्हा परिषद शाळा, नेर तालुक्यातील वाई इजारा येथील अंगणवाडीतही चोरी झाली. याशिवाय १७ दिवसांत आठ घरफोड्या झाल्या आहेत. पुसद, राळेगाव, कळंब, पांढरकवडा, यवतमाळ या शहरांमध्ये गुन्हे घडले आहेत. रोख, किमती मुद्देमालासोबतच धान्याचीही चोरी वाढली आहे. तूर, सोयाबीन, कापूस, शेतातील मोटारपंप, तुषारसंच घेऊन चोरटे पसार होत आहे. सार्वजनिक उत्सव रॅलीमध्येही हात साफ करीत आहे.

 

टॅग्स :Thiefचोर