शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

४५ हजार शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस

By admin | Updated: February 13, 2017 01:13 IST

जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे १२०० कोटी रूपयांचे कर्ज थकले आहे. त्यातील ४५ हजार शेतकऱ्यांकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे.

१२०० कोटींची थकबाकी : मालमत्ता जप्तीची कारवाई रूपेश उत्तरवार  यवतमाळ जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांकडे बँकांचे १२०० कोटी रूपयांचे कर्ज थकले आहे. त्यातील ४५ हजार शेतकऱ्यांकडे मोठ्या रकमेची थकबाकी आहे. अशा शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने कर्ज वसुलीची नोटीस बजावली आहे. या शेतकऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत कर्जाची परतफेड न केल्यास, त्यांची गहाण असलेली मालमत्ता जप्त होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामुळे राज्य शासनाने थकित कर्जाचे पुनर्गठन केले. यानंतरही थकबाकीदार शेतकऱ्यांना थकित कर्जाचा हप्ता भरता आला नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातात कर्ज वसुलीची नोटीस पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अवसानच गळाले आहे. उत्तम आणेवारी असल्याचा अहवाल महसूल विभागाने राज्याकडे पाठविला. त्या अहवालाच्या आधारावर बँकांनी थकित कर्जाची वसुली सुरू केली आहे. कलम १०१ अंतर्गत १७, १८ आणि १९ नुसार ही कारवाई शेतकऱ्यांवर होणार आहे. या कलमांनुसार बँकांना शेतकऱ्यांची मालमत्ता जप्त करता येते. त्याचा लिलावही करता येतो. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दयनीय असतानाही ही कारवाई मोठ्या थकबाकीदार शेतकऱ्यांवर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक लाख ५८ हजार शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे १२०० कोटी थकित आहे. त्यापैकी ४५ हजार मोठे थकबाकीदार आहेत. त्यांना नोटीस बजावण्यात आली. मार्च अखेरपर्यंत कर्जाचा भरणा करा अथवा मालमत्ता जप्त होईल, अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे. कर्ज माफीच्या प्रस्तावाला केराची टोपली आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी कर्जमाफीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला. तीन लाख शेतकऱ्यांना साडे आठ कोटी रूपये कर्जमाफीसाठी लागणार होते. तसा प्रस्ताव राज्याकडे पाठविण्यात आला. त्यानंतर सहा अधिवेशन झाले. मात्र कर्जमाफीच्या विषयावर निर्णयच झाला नाही. राज्याकडे पाठविलेला प्रस्ताव अद्याप धूळ खात आहे. जिल्हा बँकेला १२०० कोटींच्या थकित कर्जाची वसुली करायची आहे. आत्तापर्यंत केवळ दोन कोटी रूपयांच्याच थकित कर्जाची वसुली झाली. यामुळे थकित कर्जदार शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. - अविनाश सिंघम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक