शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हा पुरस्कार जाहीर

By admin | Updated: April 16, 2017 01:05 IST

शासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हास्तरीय पुरस्कार घोषित झाले असून या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र दिनी १ मे रोजी होणार आहे.

महाराष्ट्र दिनी वितरण : पालकमंत्र्यांची घोषणा, शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी लिखाणयवतमाळ : शासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हास्तरीय पुरस्कार घोषित झाले असून या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र दिनी १ मे रोजी होणार आहे.बळीराजा चेतना अभियानाच्या जिल्हास्तरीय पुरस्काराची घोषणा पालकमंत्री मदन येरावार यांनी केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सदर पुरस्कार घोषित करण्यात आले. यशोगाथा सांगणारे, घडविणारे शेतकरी या घटकातील प्रथम पुरस्कार माणिक बाबाराव कदम (कळंब), द्वितीय अशोक वानखडे (उमरखेड) आणि तृतीय पुरस्कार केशव तुकाराम निमकर (कोठा ता.कळंब) यांना जाहीर करण्यात आला. प्रवचनकार, नाटककार, गायक, पथनाट्य, कीर्तनकार, व्याख्याते, रांगोळीकार, कृषी मेळावे या घटकातील प्रथम पुरस्कार दत्तात्रय देवराव मारकड महाराज (आर्णी), द्वितीय पंकज खंडूसिंग राठोड (वाशीम), नागोराव भूजंगराव मुळे महाराज (उमरखेड) यांना विभागातून तर तृतीय पुरस्कार गंगाधर घोटेकर (राळेगाव) यांना जाहीर झाला.वृत्तपत्रे नियतकालिकातून लिखाण करणारे, वृत्तपत्राचे स्तंभ लेखन या घटकातील प्रथम पुरस्कार दैनिक लोकमतचे उपसंपादक सुहास सुपासे आणि दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी अमोल ढोणे यांना विभागून देण्यात आला. द्वितीय पुरस्कार देशोन्नतीचे उपसंपादक संतोष पुरी आणि टाईम्स आॅफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी टी.ओ. अब्राहम यांना विभागून तर तृतीय पुरस्कार सकाळचे तालुका प्रतिनिधी शब्बीर खान आणि एबीपी माझा वृत्त वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी कपिल देवचंद श्यामकुंवर यांना विभागून जाहीर करण्यात आला. सामाजिक, सांस्कृतिक घटकातील प्रथम पुरस्कार राळेगाव येथील गुरूदेव सेवा मंडळ (अध्यक्ष-ज्ञानेश्वर मुडे) या संस्थेला तर द्वितीय स्वर जीवन सांस्कृतिक कला व बहुद्देशीय संस्था घाटंजी (अध्यक्ष-प्रफुल्ल राऊत) तर तृतीय पुरस्कार प्रीती ग्रामीण विकास संस्था (अध्यक्ष-भीमराव महाराज) यांना जाहीर करण्यात आला. उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकीय घटकातील प्रथम पुरस्कार तलाठी श्याम रणनवरे (आर्णी) यांना देण्यात येणार आहे.समस्यांच्या अनुषंगाने निराकरण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते लोकसेवक पंचायत राज संस्थेचे सदस्य या घटकातील प्रथम पुरस्कार डॉ.प्रवीण अ. गिरी (यवतमाळ), द्वितीय विशाल खांदणकर (वणी) तर तृतीय ग्रामस्तरीय समिती (शेंबाळपिंपरी) यांना जाहीर करण्यात आला. पुरस्कारांची घोषणा करण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)‘लोकमत’चे सुहास सुपासे यांना प्रथम पुरस्कारबळीराजा चेतना अभियानाअंतर्गत उत्कृष्ट लिखाणासाठी दिला जाणारा पुरस्कार लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालयातील उपसंपादक सुहास कालिदास सुपासे यांना जाहीर झाला आहे. सुपासे यांनी बळीराजा चेतना अभियानांतर्गत विकासात्मक लेखण करून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या लिखाणाची दखल घेत त्यांना प्रथम पुरस्कार घोषित केला.