शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हा पुरस्कार जाहीर

By admin | Updated: April 16, 2017 01:05 IST

शासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हास्तरीय पुरस्कार घोषित झाले असून या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र दिनी १ मे रोजी होणार आहे.

महाराष्ट्र दिनी वितरण : पालकमंत्र्यांची घोषणा, शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी लिखाणयवतमाळ : शासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हास्तरीय पुरस्कार घोषित झाले असून या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र दिनी १ मे रोजी होणार आहे.बळीराजा चेतना अभियानाच्या जिल्हास्तरीय पुरस्काराची घोषणा पालकमंत्री मदन येरावार यांनी केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सदर पुरस्कार घोषित करण्यात आले. यशोगाथा सांगणारे, घडविणारे शेतकरी या घटकातील प्रथम पुरस्कार माणिक बाबाराव कदम (कळंब), द्वितीय अशोक वानखडे (उमरखेड) आणि तृतीय पुरस्कार केशव तुकाराम निमकर (कोठा ता.कळंब) यांना जाहीर करण्यात आला. प्रवचनकार, नाटककार, गायक, पथनाट्य, कीर्तनकार, व्याख्याते, रांगोळीकार, कृषी मेळावे या घटकातील प्रथम पुरस्कार दत्तात्रय देवराव मारकड महाराज (आर्णी), द्वितीय पंकज खंडूसिंग राठोड (वाशीम), नागोराव भूजंगराव मुळे महाराज (उमरखेड) यांना विभागातून तर तृतीय पुरस्कार गंगाधर घोटेकर (राळेगाव) यांना जाहीर झाला.वृत्तपत्रे नियतकालिकातून लिखाण करणारे, वृत्तपत्राचे स्तंभ लेखन या घटकातील प्रथम पुरस्कार दैनिक लोकमतचे उपसंपादक सुहास सुपासे आणि दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी अमोल ढोणे यांना विभागून देण्यात आला. द्वितीय पुरस्कार देशोन्नतीचे उपसंपादक संतोष पुरी आणि टाईम्स आॅफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी टी.ओ. अब्राहम यांना विभागून तर तृतीय पुरस्कार सकाळचे तालुका प्रतिनिधी शब्बीर खान आणि एबीपी माझा वृत्त वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी कपिल देवचंद श्यामकुंवर यांना विभागून जाहीर करण्यात आला. सामाजिक, सांस्कृतिक घटकातील प्रथम पुरस्कार राळेगाव येथील गुरूदेव सेवा मंडळ (अध्यक्ष-ज्ञानेश्वर मुडे) या संस्थेला तर द्वितीय स्वर जीवन सांस्कृतिक कला व बहुद्देशीय संस्था घाटंजी (अध्यक्ष-प्रफुल्ल राऊत) तर तृतीय पुरस्कार प्रीती ग्रामीण विकास संस्था (अध्यक्ष-भीमराव महाराज) यांना जाहीर करण्यात आला. उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकीय घटकातील प्रथम पुरस्कार तलाठी श्याम रणनवरे (आर्णी) यांना देण्यात येणार आहे.समस्यांच्या अनुषंगाने निराकरण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते लोकसेवक पंचायत राज संस्थेचे सदस्य या घटकातील प्रथम पुरस्कार डॉ.प्रवीण अ. गिरी (यवतमाळ), द्वितीय विशाल खांदणकर (वणी) तर तृतीय ग्रामस्तरीय समिती (शेंबाळपिंपरी) यांना जाहीर करण्यात आला. पुरस्कारांची घोषणा करण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)‘लोकमत’चे सुहास सुपासे यांना प्रथम पुरस्कारबळीराजा चेतना अभियानाअंतर्गत उत्कृष्ट लिखाणासाठी दिला जाणारा पुरस्कार लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालयातील उपसंपादक सुहास कालिदास सुपासे यांना जाहीर झाला आहे. सुपासे यांनी बळीराजा चेतना अभियानांतर्गत विकासात्मक लेखण करून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या लिखाणाची दखल घेत त्यांना प्रथम पुरस्कार घोषित केला.