शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

निवडणुकांमध्ये आता नव्यांना संधी द्या; अशोक चव्हाणांनी टोचले काँग्रेस नेत्यांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 10:46 IST

जुन्या चेहन्यांचा विट आला आहे, हे चेहरे नकोसे झाले आहेत, येत्या काळात पक्षाने यात बदल न केल्यास पक्षाची स्थिती सुधारेल असे वाटत नाही

यवतमाळ : निवडणुकांमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करूनही पुन्हा नव्याने उमेदवारीसाठी धडपड करणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चांगलेच कान टोचले. जनतेला जुन्या चेहऱ्यांचा विट आला असून ज्येष्ठांनी आता थांबले पाहिजे, त्याऐवजी तरुण नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली. त्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार दाद दिली.

विदर्भातील काँग्रेसच्या मंत्र्यांचा सत्कार आणि पश्चिम विदर्भीय कार्यकर्ता मेळावा शनिवारी येथे पार पडला. यात मंत्र्यांनी जोशपूर्ण भाषणे करून कार्यकत्यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत याचा विश्वास देण्याचा प्रयत्न केला. भाषणांमधून कुणी व्यथा मांडला तर कुणी पक्षाला नवी दिशा दिली. तर अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या तमाम नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे विचार मांडले.

चव्हाण म्हणाले की, एकेकाळी यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांमध्ये केवळ काँग्रेसच निवडून येत होती, आमच्या नांदेड जिल्ह्यातील ही पत राखली, मात्र यवतमाळला गेल्या काही निवडणुकांमध्ये ही पत राखता न आल्याने काँग्रेसचा हा बालेकिल्ला नेस्तनाबूत झाला. यामागील कारणे शोधले असता तेच ते चेहरे आणि प्रत्येक निवडणुकीत एकाच चेहऱ्याला तिकीट ही बाब प्रकर्षाने पुढे आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

तर लोकांना या जुन्या चेहऱ्यांचा विट आला आहे, हे चेहरे नकोसे झाले आहेत, येत्या काळात पक्षाने यात बदल न केल्यास पक्षाची स्थिती सुधारेल असे वाटत नाही, ज्येष्ठ नेत्यांनीही काहीशी उसंत घेऊन आता थांबले पाहिजे, नव्या चेहऱ्यांना पक्षाने संधी दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. अशोकराव चव्हाण यांच्या या वक्तव्याचे सभागृहातील उपस्थितांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले.अशोक चव्हाण यांचे हे वक्तव्य यवतमाळ जिल्ह्यात तंतोतंत खरे ठरत असल्याची प्रतिक्रिया उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळाली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्यातील नेत्यांपैकी कोण किती वेळा कोणती निवडणूक हारले याचा हिशोब आपसातील चर्चेत मांडणे सुरु झाले होते.