लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सोसायट्यांमधून पाठवावयाचा प्रतिनिधी हा बिनविरोधच (एकमताने) निवडला जाणे आवश्यक आहे, अशी अफवा सहकार क्षेत्रातीलच काही संधीसाधूंनी जिल्हाभर पसरविली आहे. परंतु प्रत्यक्षात ही बाब खोटी असून बँक प्रतिनिधी बहुमताने निवडला गेला तरी तो वैध राहील असे बँकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्यांमधून जिल्हा बँकेवर एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. हा प्रतिनिधी बँकेच्या निवडणुकीत मतदार राहणार आहे. हा प्रतिनिधी बिनविरोधच निवडला जाणे बंधनकारक असल्याची अफवा जिल्हाभर पसरली असल्याने सेवा सोसायट्यांच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळ व सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या अभ्यासू संचालकांकडे चौकशी केली असता बँक प्रतिनिधी बिनविरोधच निवडला जावा ही एक अफवा असून ती जाणीवपूर्वक कुणी तरी वैयक्तिक स्वार्थासाठी पसरविली असण्याची शक्यता या संचालकाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. बँक प्रतिनिधी हा सोसायटीमध्ये बहुमताने निवडला जावा, बहुमताने निवड असेल तर तो वैध ठरेल असे या संचालकाने स्पष्ट केले. ही अफवा पसरविण्यामागील नेमका हेतू काय व ही कुणाची खेळी हे प्रश्न अनुत्तरीत आहे.बँक प्रतिनिधी हा वैयक्तिक थकबाकीदार आणि बँकेच्या लेखी सोसायटी थकबाकीदार नसावी ही अट विभागीय सहनिबंधकांनी यावेळी पहिल्यांदाच घातल्याने आधीच सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये भीतीचे व संभ्रमाचे वातावरण आहे. या अटीमुळे बहुतांश सोसायट्यांचे अनुभवी संचालक बाद ठरणार आहेत. त्याऐवजी थकबाकीदार नसलेल्या नवख्या सभासदाला बँक प्रतिनिधी म्हणून पाठविले जाणार आहे. या मागेही एखादी खेळी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बहुमताने निवडलेला बँक प्रतिनिधीही पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 6:00 AM
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्यांमधून जिल्हा बँकेवर एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. हा प्रतिनिधी बँकेच्या निवडणुकीत मतदार राहणार आहे. हा प्रतिनिधी बिनविरोधच निवडला जाणे बंधनकारक असल्याची अफवा जिल्हाभर पसरली असल्याने सेवा सोसायट्यांच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळ व सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देएकमताची सक्ती नाही : अफवांना पूर्णविराम