शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नियुक्तीसोबतच आता पदोन्नतीसाठीही टीईटीचे बंधन

By अविनाश साबापुरे | Updated: July 15, 2023 16:33 IST

गुरुजींचे वाढले टेन्शन : नव्या अटीने विषय शिक्षकांच्या जागा भरण्याचा पेच

यवतमाळ : प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये नियुक्तीसाठी शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. परंतु, आता शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेसाठीदेखील टीईटीचे बंधन घालण्यात आल्याने राज्यभरातील गुरुजींची भंबेरी उडाली आहे. एनसीटीईच्या अधिसूचनेचा संदर्भ देऊन शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले आहे. परंतु, या अटीमुळे सर्वच जिल्ह्यातील विषय शिक्षकांच्या हजारो रिक्त जागा भरणे प्रशासनालाही कठीण झाले आहे.

उच्च प्राथमिक वर्गांसाठी म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी आरटीई कायद्यानुसार विषय शिक्षकांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. त्याकरिता शिक्षण विभाग शिक्षकांपैकीच जे संबंधित विषयात पदवीधर आहेत, त्यांची विषय शिक्षक म्हणून बढती करतो. परंतु, गेल्या दहा वर्षात शिक्षकांच्या भरतीची प्रक्रियाच न झाल्याने अशा विषय शिक्षकांच्या नेमणुकाही रखडल्या. सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विषय शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. त्यामुळे पदोन्नतीकरिता विविध शिक्षक संघटनांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाकडे धोशा लावला आहे.

परंतु, आता या पदोन्नतीकरिता एखादा शिक्षक संबंधित विषयात केवळ पदवीधर असणेच पुरेसे नसून त्यासाठी तो टीईटी परीक्षासुद्धा उत्तीर्ण असणे आवश्यक करण्यात आले आहे. शिक्षण संचालकांनी यासंदर्भात व्हीडिओ काॅन्फरन्सद्वारे सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना तोंडी सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे सर्वच जिल्ह्यातील विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया रखडली आहे.अशा प्रकारचे बंधन घालताना राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेच्या (एनसीटीई) २०१४ मधील अधिसूचनेचा संदर्भही देण्यात आला आहे. प्रत्यक्षात टीईटी परीक्षेची अमलबजावणी २०१३ पासून सुरू झाली. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक हे २०१३ पूर्वी सेवेत लागलेले आहेत. त्यांना यातील कोणाकडेही आता टीईटी प्रमाणपत्र नाही. त्यामुळे विषय शिक्षक म्हणून नेमके कुणाला पदोन्नत करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा न निघाल्यास आरटीई कायद्यातील विषय शिक्षक नेमणुकीच्या तरतुदीचाही भंग होणार आहे.

ही पदोन्नती की पदस्थापना?

एनसीटीईच्या अधिसूचनेचा अर्थ नेमका काय यावरून आता शिक्षक आणि प्रशासनात वेगवेगळा मतप्रवाह आहे. एखाद्या शिक्षकाला विषय शिक्षक करणे ही पदोन्नती ठरते की पदस्थापना असा प्रश्न पुढे आला आहे. आरटीईनुसार शिक्षकाची नेमणूक करताना तो टीईटी उत्तीर्ण असण्याचे बंधन आहे. परंतु विषय शिक्षक ही पदोन्नती प्रक्रिया असल्याने त्यासाठी टीईटीची गरज नाही, असा दावा शिक्षक संघटनांकडून केला जात आहे. तर विषय शिक्षक ही पदोन्नती प्रक्रिया नसून ती नवीन प्रकारची पदस्थापना आहे, त्यामुळे तेथेही टीईटीची अट लागू होते, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

बाॅक्सहजारो शिक्षकांना पदावनत करण्याचे आदेशआरटीईनुसार पदवीधन विषय शिक्षक नेमणे आवश्यक असल्यामुळे राज्य शासनाने २०१६ मध्ये केवळ बारावी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती दिली. परंतु, आता एनसीटीईच्या अधिसूचनेनुसार शिक्षकाची एका स्तरातून दुसऱ्या स्तरात पदोन्नती करताना आवश्यक अहर्ता धारण करणे आवश्यक ठरले आहे. त्यामुळे ज्या बारावी उत्तीर्ण शिक्षकांना यापूर्वी पदोन्नती देण्यात आली, त्यांना आता पूर्वपदावर पदस्थापना देण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील हजारो विषय शिक्षक पदावनत होणार आहेत. प्रत्यक्षात आधीच विषय शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने कोणत्याही जिल्हा परिषदेने ही पदावनती प्रक्रिया सुरू केलेली नाही.

एनसीटीईच्या अधिसूचनेनुसार आता विषय शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिक्षण संचालकांनी व्हीसी घेऊन याबाबत सूचना दिली आहे. सर्वच जिल्ह्यातील पदोन्नती प्रक्रिया त्यामुळे थांबलेली आहे. ज्या जिल्ह्यात पदोन्नती झाली, ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. परंतु, हा तिढा महिनाभरात सुटेल, अशी चिन्हे दिसत आहेत.- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी, यवतमाळ