शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

नियुक्तीसोबतच आता पदोन्नतीसाठीही टीईटीचे बंधन

By अविनाश साबापुरे | Updated: July 15, 2023 16:33 IST

गुरुजींचे वाढले टेन्शन : नव्या अटीने विषय शिक्षकांच्या जागा भरण्याचा पेच

यवतमाळ : प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये नियुक्तीसाठी शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. परंतु, आता शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेसाठीदेखील टीईटीचे बंधन घालण्यात आल्याने राज्यभरातील गुरुजींची भंबेरी उडाली आहे. एनसीटीईच्या अधिसूचनेचा संदर्भ देऊन शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले आहे. परंतु, या अटीमुळे सर्वच जिल्ह्यातील विषय शिक्षकांच्या हजारो रिक्त जागा भरणे प्रशासनालाही कठीण झाले आहे.

उच्च प्राथमिक वर्गांसाठी म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी आरटीई कायद्यानुसार विषय शिक्षकांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. त्याकरिता शिक्षण विभाग शिक्षकांपैकीच जे संबंधित विषयात पदवीधर आहेत, त्यांची विषय शिक्षक म्हणून बढती करतो. परंतु, गेल्या दहा वर्षात शिक्षकांच्या भरतीची प्रक्रियाच न झाल्याने अशा विषय शिक्षकांच्या नेमणुकाही रखडल्या. सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विषय शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. त्यामुळे पदोन्नतीकरिता विविध शिक्षक संघटनांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाकडे धोशा लावला आहे.

परंतु, आता या पदोन्नतीकरिता एखादा शिक्षक संबंधित विषयात केवळ पदवीधर असणेच पुरेसे नसून त्यासाठी तो टीईटी परीक्षासुद्धा उत्तीर्ण असणे आवश्यक करण्यात आले आहे. शिक्षण संचालकांनी यासंदर्भात व्हीडिओ काॅन्फरन्सद्वारे सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना तोंडी सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे सर्वच जिल्ह्यातील विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया रखडली आहे.अशा प्रकारचे बंधन घालताना राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेच्या (एनसीटीई) २०१४ मधील अधिसूचनेचा संदर्भही देण्यात आला आहे. प्रत्यक्षात टीईटी परीक्षेची अमलबजावणी २०१३ पासून सुरू झाली. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक हे २०१३ पूर्वी सेवेत लागलेले आहेत. त्यांना यातील कोणाकडेही आता टीईटी प्रमाणपत्र नाही. त्यामुळे विषय शिक्षक म्हणून नेमके कुणाला पदोन्नत करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा न निघाल्यास आरटीई कायद्यातील विषय शिक्षक नेमणुकीच्या तरतुदीचाही भंग होणार आहे.

ही पदोन्नती की पदस्थापना?

एनसीटीईच्या अधिसूचनेचा अर्थ नेमका काय यावरून आता शिक्षक आणि प्रशासनात वेगवेगळा मतप्रवाह आहे. एखाद्या शिक्षकाला विषय शिक्षक करणे ही पदोन्नती ठरते की पदस्थापना असा प्रश्न पुढे आला आहे. आरटीईनुसार शिक्षकाची नेमणूक करताना तो टीईटी उत्तीर्ण असण्याचे बंधन आहे. परंतु विषय शिक्षक ही पदोन्नती प्रक्रिया असल्याने त्यासाठी टीईटीची गरज नाही, असा दावा शिक्षक संघटनांकडून केला जात आहे. तर विषय शिक्षक ही पदोन्नती प्रक्रिया नसून ती नवीन प्रकारची पदस्थापना आहे, त्यामुळे तेथेही टीईटीची अट लागू होते, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

बाॅक्सहजारो शिक्षकांना पदावनत करण्याचे आदेशआरटीईनुसार पदवीधन विषय शिक्षक नेमणे आवश्यक असल्यामुळे राज्य शासनाने २०१६ मध्ये केवळ बारावी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती दिली. परंतु, आता एनसीटीईच्या अधिसूचनेनुसार शिक्षकाची एका स्तरातून दुसऱ्या स्तरात पदोन्नती करताना आवश्यक अहर्ता धारण करणे आवश्यक ठरले आहे. त्यामुळे ज्या बारावी उत्तीर्ण शिक्षकांना यापूर्वी पदोन्नती देण्यात आली, त्यांना आता पूर्वपदावर पदस्थापना देण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील हजारो विषय शिक्षक पदावनत होणार आहेत. प्रत्यक्षात आधीच विषय शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने कोणत्याही जिल्हा परिषदेने ही पदावनती प्रक्रिया सुरू केलेली नाही.

एनसीटीईच्या अधिसूचनेनुसार आता विषय शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिक्षण संचालकांनी व्हीसी घेऊन याबाबत सूचना दिली आहे. सर्वच जिल्ह्यातील पदोन्नती प्रक्रिया त्यामुळे थांबलेली आहे. ज्या जिल्ह्यात पदोन्नती झाली, ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. परंतु, हा तिढा महिनाभरात सुटेल, अशी चिन्हे दिसत आहेत.- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी, यवतमाळ