शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

नियुक्तीसोबतच आता पदोन्नतीसाठीही टीईटीचे बंधन

By अविनाश साबापुरे | Updated: July 15, 2023 16:33 IST

गुरुजींचे वाढले टेन्शन : नव्या अटीने विषय शिक्षकांच्या जागा भरण्याचा पेच

यवतमाळ : प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये नियुक्तीसाठी शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. परंतु, आता शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेसाठीदेखील टीईटीचे बंधन घालण्यात आल्याने राज्यभरातील गुरुजींची भंबेरी उडाली आहे. एनसीटीईच्या अधिसूचनेचा संदर्भ देऊन शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले आहे. परंतु, या अटीमुळे सर्वच जिल्ह्यातील विषय शिक्षकांच्या हजारो रिक्त जागा भरणे प्रशासनालाही कठीण झाले आहे.

उच्च प्राथमिक वर्गांसाठी म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी आरटीई कायद्यानुसार विषय शिक्षकांची नेमणूक करणे बंधनकारक आहे. त्याकरिता शिक्षण विभाग शिक्षकांपैकीच जे संबंधित विषयात पदवीधर आहेत, त्यांची विषय शिक्षक म्हणून बढती करतो. परंतु, गेल्या दहा वर्षात शिक्षकांच्या भरतीची प्रक्रियाच न झाल्याने अशा विषय शिक्षकांच्या नेमणुकाही रखडल्या. सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विषय शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. त्यामुळे पदोन्नतीकरिता विविध शिक्षक संघटनांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाकडे धोशा लावला आहे.

परंतु, आता या पदोन्नतीकरिता एखादा शिक्षक संबंधित विषयात केवळ पदवीधर असणेच पुरेसे नसून त्यासाठी तो टीईटी परीक्षासुद्धा उत्तीर्ण असणे आवश्यक करण्यात आले आहे. शिक्षण संचालकांनी यासंदर्भात व्हीडिओ काॅन्फरन्सद्वारे सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना तोंडी सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे सर्वच जिल्ह्यातील विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया रखडली आहे.अशा प्रकारचे बंधन घालताना राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेच्या (एनसीटीई) २०१४ मधील अधिसूचनेचा संदर्भही देण्यात आला आहे. प्रत्यक्षात टीईटी परीक्षेची अमलबजावणी २०१३ पासून सुरू झाली. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक हे २०१३ पूर्वी सेवेत लागलेले आहेत. त्यांना यातील कोणाकडेही आता टीईटी प्रमाणपत्र नाही. त्यामुळे विषय शिक्षक म्हणून नेमके कुणाला पदोन्नत करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा न निघाल्यास आरटीई कायद्यातील विषय शिक्षक नेमणुकीच्या तरतुदीचाही भंग होणार आहे.

ही पदोन्नती की पदस्थापना?

एनसीटीईच्या अधिसूचनेचा अर्थ नेमका काय यावरून आता शिक्षक आणि प्रशासनात वेगवेगळा मतप्रवाह आहे. एखाद्या शिक्षकाला विषय शिक्षक करणे ही पदोन्नती ठरते की पदस्थापना असा प्रश्न पुढे आला आहे. आरटीईनुसार शिक्षकाची नेमणूक करताना तो टीईटी उत्तीर्ण असण्याचे बंधन आहे. परंतु विषय शिक्षक ही पदोन्नती प्रक्रिया असल्याने त्यासाठी टीईटीची गरज नाही, असा दावा शिक्षक संघटनांकडून केला जात आहे. तर विषय शिक्षक ही पदोन्नती प्रक्रिया नसून ती नवीन प्रकारची पदस्थापना आहे, त्यामुळे तेथेही टीईटीची अट लागू होते, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

बाॅक्सहजारो शिक्षकांना पदावनत करण्याचे आदेशआरटीईनुसार पदवीधन विषय शिक्षक नेमणे आवश्यक असल्यामुळे राज्य शासनाने २०१६ मध्ये केवळ बारावी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती दिली. परंतु, आता एनसीटीईच्या अधिसूचनेनुसार शिक्षकाची एका स्तरातून दुसऱ्या स्तरात पदोन्नती करताना आवश्यक अहर्ता धारण करणे आवश्यक ठरले आहे. त्यामुळे ज्या बारावी उत्तीर्ण शिक्षकांना यापूर्वी पदोन्नती देण्यात आली, त्यांना आता पूर्वपदावर पदस्थापना देण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील हजारो विषय शिक्षक पदावनत होणार आहेत. प्रत्यक्षात आधीच विषय शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने कोणत्याही जिल्हा परिषदेने ही पदावनती प्रक्रिया सुरू केलेली नाही.

एनसीटीईच्या अधिसूचनेनुसार आता विषय शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिक्षण संचालकांनी व्हीसी घेऊन याबाबत सूचना दिली आहे. सर्वच जिल्ह्यातील पदोन्नती प्रक्रिया त्यामुळे थांबलेली आहे. ज्या जिल्ह्यात पदोन्नती झाली, ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. परंतु, हा तिढा महिनाभरात सुटेल, अशी चिन्हे दिसत आहेत.- किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी, यवतमाळ