शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बिरसा ब्रिगेडवर ‘दुकानदारी’चा आरोप

By admin | Updated: August 28, 2015 02:38 IST

आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सव ३० आॅगस्ट रोजी यवतमाळात होत आहे. मात्र शासनाचा निधी घेऊन बिरसा ब्रिगेड ही संघटना स्वत:च श्रेय घेत असल्याचा आरोप ...

यवतमाळ : आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सव ३० आॅगस्ट रोजी यवतमाळात होत आहे. मात्र शासनाचा निधी घेऊन बिरसा ब्रिगेड ही संघटना स्वत:च श्रेय घेत असल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद, विद्यार्थी परिषदेसह आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांनी केला.वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील ढाले यांच्या नेतृत्वात गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सवाच्या आयोजकांवर विविध आरोप करण्यात आले. सुनील ढाले म्हणाले की, या महोत्सवासाठी राज्याचे आदिवासी मंत्री विष्णू सावरा पहिल्यांदाच जिल्ह्यात येत आहेत. त्यांचे नाव सांगून जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय आदिवासी वसतिगृहाकडून १५ हजार रुपये वसूल करीत आहे. महोत्सवाच्या आयोजकांनी एकप्रकारे आदिवासी विद्यार्थ्यांची ही लूटच चालविली आहे. वास्तविक पाहाता, या महोत्सवाच्या आयोजनासाठी शासनाने १३ लाखांचा निधी दिला आहे. विशेष म्हणजे, न्युक्लिअस बजेटमधून हा निधी मिळविण्यासाठी आमदार अशोक उईके यांनीच पत्रही लिहिले होते. असे असताना वसतिगृहांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी राखून ठेवलेले १५ हजार उकळण्याचे काम महोत्सवाचे आयोजक करीत आहेत. विद्यार्थी एकता महोत्सव असताना जिल्ह्यातील कोणत्याही वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही, अशी माहिती विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष प्रफुल्ल गेडाम यांनी दिली.हा कार्यक्रम शासकीय असला तरी कोणतेही शासकीय नियम पाळण्यात आले नाही. केवळ बिरसा ब्रिगेड या एकाच संघटनेने सर्व आयोजनाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, औपचारिकता म्हणून काही विद्यार्थ्यांचे फोटो महोत्सवाच्या बॅनरवर लावण्यात आले. त्याबाबतही विद्यार्थ्यांना विचारण्यात आले नाही, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. महोत्सवात गर्दी जमविण्यासाठी वसतिगृहातील ३० आॅगस्टचे जेवणही कार्यक्रमस्थळीच ठेवण्यात आले आहे. आदिवासी समाजाचा केवळ गर्दी जमविण्यासाठीच वापर करणार काय? असा संतप्त सवालही विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला. आदिवासी विद्यार्थी एकता महोत्सव म्हणजे काही लोकांचा केवळ राजकीय स्टंट आहे. विद्यार्थ्यांच्या भरवशावर काही लोकं स्वत:ची राजकीय भाकर भाजून घेण्याची धडपड करीत आहे, असा आरोप पत्रकार परिषदेत सुनील ढाले यांनी केला. पत्रकार परिषदेत उपस्थित प्रफुल्ल गेडाम, अविनाश मेश्राम, भूमिका कुमरे, धर्मेंद्र मेश्राम, संतोष टाले, मंगल टेकाम, संदीप इंगळे, अमन सोयाम, अरविंद बोलके, अंकुश मडावी, राहुल मडावी, मंगल वडदे, उषा काळे, जयश्री पेंदाम, प्रियंका पुसाम, जीवन आत्राम, किशोर येडमे, सतीश आडे, धनराज मडावी, स्वप्नील बोलके, दत्ता काळे, उशांगी आत्राम, मिनल इनवते, स्नेहा कोडापे, सतीश आत्राम, अमोल सोयाम आदींनी महोत्सवाच्या आयोजकांचा निषेध केला. (स्थानिक प्रतिनिधी)