शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना

By अविनाश साबापुरे | Updated: May 24, 2024 09:37 IST

‘एनईपी-२०२०’नुसार केंद्र सरकारने यापूर्वीच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला; परंतु प्रत्येक राज्याने आपल्या राज्यातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, महाराष्ट्राने  बालवाटिका ते दुसऱ्या वर्गासाठीचा आराखडा तयार केला. तो अंतिम झाला आहे.

यवतमाळ : नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रम लवकरच बदलणार आहे. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पुढच्या सत्रात सर्वच वर्गांची पाठ्यपुस्तके बदलण्याची शक्यता आहे. हा आराखडा ‘एससीईआरटी’ने खुला केला असून, त्यावर ३ जूनपर्यंत सूचना मागविल्या आहेत.

‘एनईपी-२०२०’नुसार केंद्र सरकारने यापूर्वीच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला; परंतु प्रत्येक राज्याने आपल्या राज्यातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, महाराष्ट्राने  बालवाटिका ते दुसऱ्या वर्गासाठीचा आराखडा तयार केला. तो अंतिम झाला आहे. आता परिषदेने इयत्ता तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला. त्यावर ३ जूनपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी साहित्यनिर्मितीचे काम आमच्याकडे असते. अंगणवाडी पाठ्यपुस्तक छपाईबाबत आमची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही पाठ्यपुस्तके याच वर्षी पुरविण्याचे आमचे प्रयत्न आहेत.- कृष्णकुमार पाटील, संचालक ‘बालभारती’

अंगणवाडीच्या पुस्तकांसाठी प्रतीक्षा - ‘एनईपी’नुसार पूर्व प्राथमिक ते इयत्ता दुसरी हा शिक्षणाचा पायाभूत स्तर मानला गेला आहे. त्यात अंगणवाडीला बालवाटिका संबोधण्यात आले आहे. - आता बालवाटिका एक, बालवाटिका दोन, बालवाटिका तीन तसेच इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी या पाच वर्गांसाठीचा अभ्यासक्रम आराखडा ‘एससीईआरटी’ने तयार केला आहे.  लवकरच पाठपुस्तकांची छपाई  सुरू केली जाणार आहे.  

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण