शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

यवतमाळमध्ये चार मंत्री असूनही पाच वर्षात काय विकास झाला? अजित पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 12:47 IST

राज्यातील राजकीय पक्षांतरामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी दाखल करताना प्रचंड गोंधळ उडणार असल्याचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्दे'राज्यातील राजकीय पक्षांतरामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे.''जिल्ह्यात चार मंत्री असून देखील पाच वर्षात काय विकास झाला? उलट कंपन्यांनी कामगार कपात केली.'पूरग्रस्तांना शासनाने कोणतीच मदत वेळेत दिली नाही, असा आरोप ही अजित पवार यांनी केला.

यवतमाळ - राज्यातील राजकीय पक्षांतरामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी दाखल करताना प्रचंड गोंधळ उडणार असल्याचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी बुधवारी (21 ऑगस्ट) यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात चार मंत्री असून देखील पाच वर्षात काय विकास झाला? उलट येथील कंपन्यांनी कामगार कपात केली आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

युती सरकार केवळ खोटे आश्वासन देण्यात व्यस्त आहे, पूरग्रस्तांना शासनाने कोणतीच मदत वेळेत दिली नाही, असा आरोप ही अजित पवार यांनी केला आहे. खासदार अमोल कोल्हे, वक्ते अमोल मिटकरी, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया हे देखील यावेळी  उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते शिवसेना आणि भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी फेसबुक आणि ट्विटरवरुन गौप्यस्फोट केला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापुर्वी राज्यात अफवांना अजून पेव फुटेल. भाजपा-शिवसेनेचेही अनेक जुने नेते नाराज आहेत, असे अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेच कोणते जुने नेते नाराज आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

भाजपात माजी मंत्री एकनाथ खडसेंची नाराजी सर्वपरिचीत आहे. अनेकवेळा खडसेंनीही ते जाहीरपणे बोलून दाखवले आहे. मात्र, मी भाजपा सोडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर, अजित पवारांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेनेतील ते जुने आणि ज्येष्ठ नेते कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत, उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.  तसेच, सध्या आर्थिक मंदी, बेरोजगारी अशा लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. तर, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांनीही विधानसभेला राष्ट्रवादीच्या तिकीटावर आपली लढाई नसेल हे स्पष्ट केलं आहे. तसेच, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल आणि राष्ट्रवादीचे इतरही काही नेते भाजपा-शिवसेनेत जात असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हे ट्विट केल्याचं दिसून येत आहे. 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारYavatmalयवतमाळNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा