शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

यवतमाळमध्ये चार मंत्री असूनही पाच वर्षात काय विकास झाला? अजित पवार यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 12:47 IST

राज्यातील राजकीय पक्षांतरामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी दाखल करताना प्रचंड गोंधळ उडणार असल्याचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्दे'राज्यातील राजकीय पक्षांतरामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे.''जिल्ह्यात चार मंत्री असून देखील पाच वर्षात काय विकास झाला? उलट कंपन्यांनी कामगार कपात केली.'पूरग्रस्तांना शासनाने कोणतीच मदत वेळेत दिली नाही, असा आरोप ही अजित पवार यांनी केला.

यवतमाळ - राज्यातील राजकीय पक्षांतरामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी दाखल करताना प्रचंड गोंधळ उडणार असल्याचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी बुधवारी (21 ऑगस्ट) यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्यातील शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात चार मंत्री असून देखील पाच वर्षात काय विकास झाला? उलट येथील कंपन्यांनी कामगार कपात केली आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

युती सरकार केवळ खोटे आश्वासन देण्यात व्यस्त आहे, पूरग्रस्तांना शासनाने कोणतीच मदत वेळेत दिली नाही, असा आरोप ही अजित पवार यांनी केला आहे. खासदार अमोल कोल्हे, वक्ते अमोल मिटकरी, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया हे देखील यावेळी  उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते शिवसेना आणि भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी फेसबुक आणि ट्विटरवरुन गौप्यस्फोट केला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापुर्वी राज्यात अफवांना अजून पेव फुटेल. भाजपा-शिवसेनेचेही अनेक जुने नेते नाराज आहेत, असे अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेच कोणते जुने नेते नाराज आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

भाजपात माजी मंत्री एकनाथ खडसेंची नाराजी सर्वपरिचीत आहे. अनेकवेळा खडसेंनीही ते जाहीरपणे बोलून दाखवले आहे. मात्र, मी भाजपा सोडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर, अजित पवारांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेनेतील ते जुने आणि ज्येष्ठ नेते कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत, उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.  तसेच, सध्या आर्थिक मंदी, बेरोजगारी अशा लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. तर, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांनीही विधानसभेला राष्ट्रवादीच्या तिकीटावर आपली लढाई नसेल हे स्पष्ट केलं आहे. तसेच, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल आणि राष्ट्रवादीचे इतरही काही नेते भाजपा-शिवसेनेत जात असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हे ट्विट केल्याचं दिसून येत आहे. 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारYavatmalयवतमाळNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा