शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी योजनेला शेतकऱ्यांचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 22:14 IST

थकीत वीज बिल असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना नोव्हेंबर महिन्यात सुरू केली. या योजनेंतर्गत थकीत बिलावरील व्याज व दंड माफ केला जाणार होता.

ठळक मुद्देएक कोटींचा भरणा : केवळ ३,५९६ शेतकरी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : थकीत वीज बिल असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना नोव्हेंबर महिन्यात सुरू केली. या योजनेंतर्गत थकीत बिलावरील व्याज व दंड माफ केला जाणार होता. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १३ हजार २२४ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले होते. मात्र केवळ ३ हजार ५९५ शेतकऱ्यांनीया योजनेत सहभाग घेतला आहे.राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अत्यंत कमी किंमतीत वीज जोडणी उपलब्ध करून दिली जाते. वीज जोडणीचा खर्च जवळपास सव्वा लाख रूपये असला तरी नाममात्र तीन ते चार हजार रूपयांमध्ये वीज जोडणी दिली जाते. त्याचबरोबर वीज दरामध्येही विशेष सूट दिली जाते. पिकांवर येणारे रोग व पडणारा दुष्काळ यामुळे बऱ्याचवेळा शेतकºयाचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. परिणामी सवलतीत वीज पुरवठा करूनही शेतकऱ्यांना वीज बिल भरणे शक्य होत नाही. त्यामुळे वीज बिलाची थकबाकी वाढते. शेतकऱ्यांचा सहानुभूतीने विचार करून वीज वितरण कंपनी सहजासहजी वीज पुरवठा खंडीत करीत नाही.काही शेतकºयांवर १० ते २० हजार रूपयांच्या दरम्यान वीज बिल थकीत आहे. एवढे वीज बिल एकाच वेळी शेतकऱ्यांना भरणे शक्य होत नाही. याचा विचार करून शासनाने नोव्हेंबर २०१७ मध्ये मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे चालू बिल भरायचे होते. डिसेंबर महिन्यात एकूण थकीत वीज बिलाच्या २० टक्के पहिला हप्ता भरायचा होता. दुसरा हप्ता मार्च २०१८ मध्ये, तिसरा हप्ता जून २०१८ मध्ये चौथा हप्ता सप्टेंबर व पाचवा हप्ता डिसेंबर महिन्यात भरायचा होता. पाच हप्त्यामध्ये वीज बिल भरल्यानंतर त्यावरील दंड व थकीत बिलावरील व्याज माफ केली जाणार होती. मात्र शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १७ हजार ५३५ शेतकऱ्यांकडे कृषीपंप आहे. त्यापैकी १३ हजार २२४ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले होते. या शेतकऱ्यांवर १३ कोटी ८१ लाख ७३ हजार रूपयांची थकबाकी होती. कृषी संजीवनी योजनेमध्ये शेतकºयांचा फायदा असल्याने ९० टक्के शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होतील, असा अंदाज महावितरण व शासनाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्षात केवळ ३ हजार ५९६ शेतकरी या योजनेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी केवळ १ कोटी ३३ लाख रूपयांचा भरणा केला आहे. यावरून शेतकरी या योजनेकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.यावर्षी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूकयावर्षी पडलेला कोरडा दुष्काळ व धान निसवण्याच्या मार्गावर असताना मावा, तुडतुडा रोगांचा झालेला प्रकोप यामुळे धानाच्या उत्पादनात ५० टक्के घट झाली आहे. काही शेतकऱ्यांचे धानपीक मावा व तुडतुडा रोगाने पूर्णपणे सपाट झाले. त्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. बोंड अळीने कापूस पीकही नष्ट केले. त्यामुळे यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. परिणामी शासनाने सवलत देऊन सुध्दा शेतकरी या योजनेमध्ये सहभागी झाले नसल्याचे दिसून येत आहे.