शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
3
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
7
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
10
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
11
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
12
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
13
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
14
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
15
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
16
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
17
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
18
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
19
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
20
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?

वय कोवळे पण निर्धार कठोर

By admin | Updated: April 30, 2017 01:13 IST

दररोजच्या आयुष्यात सतत संकटांशीच सामना. डोक्यावर पितृछत्र नाही.

सत्यमेव जयते : दुष्काळ मुक्तीसाठी सरसावल्या आंजीच्या दोन बहिणीयवतमाळ : दररोजच्या आयुष्यात सतत संकटांशीच सामना. डोक्यावर पितृछत्र नाही. जेवणाची, शिक्षणाची ददात. तरीही मनात मात्र गावाच्या विकासाचा ध्यास. स्वत:चे अभावग्रस्त जीवन सावरता सावरता अख्ख्या गावाचा परिघ विकासाच्या सुगंधाने दरवळून जावा यासाठी त्या दोघी बहिणींनी पराकोटीचे कष्ट सुरू केले आहे. अंगमेहनतीपेक्षाही इतरांकडून होणारी अवहेलना दुर्लक्षित करण्याचे धाडस त्यांनी दाखविले आहे. गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पदर खोचून कामाला लागलेल्या या दोन बहिणी राळेगाव तालुक्यात चर्चेत आहेत. मनीषा पिंपरे आणि प्रगती पिंपरे, अशी या दोन तरुणीची नावे. आपले आंजी हे गाव दुष्काळमुक्त करण्याचा चंग या दोघींनी बांधला. डोक्यावर वडिलांचे छत्र नाही. घरात गरिबी. आईसोबत मजुरीला जाताजाताच त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. आईचा आधार बनलेल्या या मुली आता संपूर्ण गाव दुरूस्त करण्याच्या इराद्याने झपाटल्या. आमीर खानच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून आपलेही गाव दुष्काळमुक्त व्हावे, ही त्यांची धडपड आहे. स्पर्धेसाठी पोटगव्हाण येथे प्रशिक्षण सुरू होताच आंजी गावाच्यावतीने मनीषा पिंपरे, प्रगती पिंपरे आणि दादाराव कोवे हे तिघेजण प्रशिक्षणाला गेले. प्रशिक्षण घेऊन परतल्यावर त्यांनी संपूर्ण गावाचा सहभाग मिळविण्यासाठी जीवाचे रान केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून गावातून रॅली काढणे, बचत गटाच्या बैठका घेणे, गावातील पोलीस पाटील, सरपंच, शिक्षक आणि प्रतिष्ठित नागरिकांना जागविण्याचे काम त्यांनी सुरू केले. श्रमदानाच्या यज्ञात किमान एक तास सहभाग द्यावा म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या उंबरठ्यावर निमंत्रणाच्या अक्षता वाटल्या. शिवारापासून गावापर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला वृक्षारोपणाचा त्यांचा निर्धार आहे. त्यासाठी दररोज पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे भर उन्हात त्या हाता सब्बल आणि टिकास घेऊन वृक्ष खड्डे करीत आहे. त्यांच्या कोवळ््या हातांनी आतापर्यंत ७७ खड्डे पूर्ण केले. एकदा तर खड्ड्यातून निघालेल्या सापाला सब्बलचा घाव लागला. त्यामुळे मनीषा घाबरून घरी गेली, मात्र दुसऱ्या दिवशी येऊन पुन्हा काम सुरू केले. श्रमदानाचा वसा घेऊन २२ मे पर्यंत काम करण्याचा या बहिणींचा निर्धार पक्का आहे. आईनेही त्यांच्या इच्छाशक्तीला बळ देत घरी शोषखड्डा करण्यासाठी मदत केली. (स्थानिक प्रतिनिधी)समाजासमोर आदर्श गावाच्या विकासासाठी श्रमदानाचा अनोखा आदर्श मनीषा आणि प्रगतीने समोर ठेवला आहे. आज ना उद्या या गावातील प्रत्येक नागरिक जागरूक होऊन त्या गावाचा दुष्काळ इतिहासजमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.