शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

वय कोवळे पण निर्धार कठोर

By admin | Updated: April 30, 2017 01:13 IST

दररोजच्या आयुष्यात सतत संकटांशीच सामना. डोक्यावर पितृछत्र नाही.

सत्यमेव जयते : दुष्काळ मुक्तीसाठी सरसावल्या आंजीच्या दोन बहिणीयवतमाळ : दररोजच्या आयुष्यात सतत संकटांशीच सामना. डोक्यावर पितृछत्र नाही. जेवणाची, शिक्षणाची ददात. तरीही मनात मात्र गावाच्या विकासाचा ध्यास. स्वत:चे अभावग्रस्त जीवन सावरता सावरता अख्ख्या गावाचा परिघ विकासाच्या सुगंधाने दरवळून जावा यासाठी त्या दोघी बहिणींनी पराकोटीचे कष्ट सुरू केले आहे. अंगमेहनतीपेक्षाही इतरांकडून होणारी अवहेलना दुर्लक्षित करण्याचे धाडस त्यांनी दाखविले आहे. गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पदर खोचून कामाला लागलेल्या या दोन बहिणी राळेगाव तालुक्यात चर्चेत आहेत. मनीषा पिंपरे आणि प्रगती पिंपरे, अशी या दोन तरुणीची नावे. आपले आंजी हे गाव दुष्काळमुक्त करण्याचा चंग या दोघींनी बांधला. डोक्यावर वडिलांचे छत्र नाही. घरात गरिबी. आईसोबत मजुरीला जाताजाताच त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. आईचा आधार बनलेल्या या मुली आता संपूर्ण गाव दुरूस्त करण्याच्या इराद्याने झपाटल्या. आमीर खानच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून आपलेही गाव दुष्काळमुक्त व्हावे, ही त्यांची धडपड आहे. स्पर्धेसाठी पोटगव्हाण येथे प्रशिक्षण सुरू होताच आंजी गावाच्यावतीने मनीषा पिंपरे, प्रगती पिंपरे आणि दादाराव कोवे हे तिघेजण प्रशिक्षणाला गेले. प्रशिक्षण घेऊन परतल्यावर त्यांनी संपूर्ण गावाचा सहभाग मिळविण्यासाठी जीवाचे रान केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून गावातून रॅली काढणे, बचत गटाच्या बैठका घेणे, गावातील पोलीस पाटील, सरपंच, शिक्षक आणि प्रतिष्ठित नागरिकांना जागविण्याचे काम त्यांनी सुरू केले. श्रमदानाच्या यज्ञात किमान एक तास सहभाग द्यावा म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या उंबरठ्यावर निमंत्रणाच्या अक्षता वाटल्या. शिवारापासून गावापर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला वृक्षारोपणाचा त्यांचा निर्धार आहे. त्यासाठी दररोज पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे भर उन्हात त्या हाता सब्बल आणि टिकास घेऊन वृक्ष खड्डे करीत आहे. त्यांच्या कोवळ््या हातांनी आतापर्यंत ७७ खड्डे पूर्ण केले. एकदा तर खड्ड्यातून निघालेल्या सापाला सब्बलचा घाव लागला. त्यामुळे मनीषा घाबरून घरी गेली, मात्र दुसऱ्या दिवशी येऊन पुन्हा काम सुरू केले. श्रमदानाचा वसा घेऊन २२ मे पर्यंत काम करण्याचा या बहिणींचा निर्धार पक्का आहे. आईनेही त्यांच्या इच्छाशक्तीला बळ देत घरी शोषखड्डा करण्यासाठी मदत केली. (स्थानिक प्रतिनिधी)समाजासमोर आदर्श गावाच्या विकासासाठी श्रमदानाचा अनोखा आदर्श मनीषा आणि प्रगतीने समोर ठेवला आहे. आज ना उद्या या गावातील प्रत्येक नागरिक जागरूक होऊन त्या गावाचा दुष्काळ इतिहासजमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.