शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

वय कोवळे पण निर्धार कठोर

By admin | Updated: April 30, 2017 01:13 IST

दररोजच्या आयुष्यात सतत संकटांशीच सामना. डोक्यावर पितृछत्र नाही.

सत्यमेव जयते : दुष्काळ मुक्तीसाठी सरसावल्या आंजीच्या दोन बहिणीयवतमाळ : दररोजच्या आयुष्यात सतत संकटांशीच सामना. डोक्यावर पितृछत्र नाही. जेवणाची, शिक्षणाची ददात. तरीही मनात मात्र गावाच्या विकासाचा ध्यास. स्वत:चे अभावग्रस्त जीवन सावरता सावरता अख्ख्या गावाचा परिघ विकासाच्या सुगंधाने दरवळून जावा यासाठी त्या दोघी बहिणींनी पराकोटीचे कष्ट सुरू केले आहे. अंगमेहनतीपेक्षाही इतरांकडून होणारी अवहेलना दुर्लक्षित करण्याचे धाडस त्यांनी दाखविले आहे. गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पदर खोचून कामाला लागलेल्या या दोन बहिणी राळेगाव तालुक्यात चर्चेत आहेत. मनीषा पिंपरे आणि प्रगती पिंपरे, अशी या दोन तरुणीची नावे. आपले आंजी हे गाव दुष्काळमुक्त करण्याचा चंग या दोघींनी बांधला. डोक्यावर वडिलांचे छत्र नाही. घरात गरिबी. आईसोबत मजुरीला जाताजाताच त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. आईचा आधार बनलेल्या या मुली आता संपूर्ण गाव दुरूस्त करण्याच्या इराद्याने झपाटल्या. आमीर खानच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून आपलेही गाव दुष्काळमुक्त व्हावे, ही त्यांची धडपड आहे. स्पर्धेसाठी पोटगव्हाण येथे प्रशिक्षण सुरू होताच आंजी गावाच्यावतीने मनीषा पिंपरे, प्रगती पिंपरे आणि दादाराव कोवे हे तिघेजण प्रशिक्षणाला गेले. प्रशिक्षण घेऊन परतल्यावर त्यांनी संपूर्ण गावाचा सहभाग मिळविण्यासाठी जीवाचे रान केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून गावातून रॅली काढणे, बचत गटाच्या बैठका घेणे, गावातील पोलीस पाटील, सरपंच, शिक्षक आणि प्रतिष्ठित नागरिकांना जागविण्याचे काम त्यांनी सुरू केले. श्रमदानाच्या यज्ञात किमान एक तास सहभाग द्यावा म्हणून त्यांनी प्रत्येकाच्या उंबरठ्यावर निमंत्रणाच्या अक्षता वाटल्या. शिवारापासून गावापर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला वृक्षारोपणाचा त्यांचा निर्धार आहे. त्यासाठी दररोज पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे भर उन्हात त्या हाता सब्बल आणि टिकास घेऊन वृक्ष खड्डे करीत आहे. त्यांच्या कोवळ््या हातांनी आतापर्यंत ७७ खड्डे पूर्ण केले. एकदा तर खड्ड्यातून निघालेल्या सापाला सब्बलचा घाव लागला. त्यामुळे मनीषा घाबरून घरी गेली, मात्र दुसऱ्या दिवशी येऊन पुन्हा काम सुरू केले. श्रमदानाचा वसा घेऊन २२ मे पर्यंत काम करण्याचा या बहिणींचा निर्धार पक्का आहे. आईनेही त्यांच्या इच्छाशक्तीला बळ देत घरी शोषखड्डा करण्यासाठी मदत केली. (स्थानिक प्रतिनिधी)समाजासमोर आदर्श गावाच्या विकासासाठी श्रमदानाचा अनोखा आदर्श मनीषा आणि प्रगतीने समोर ठेवला आहे. आज ना उद्या या गावातील प्रत्येक नागरिक जागरूक होऊन त्या गावाचा दुष्काळ इतिहासजमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.