शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पिहिली प्रतिक्रिया 
3
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
4
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
5
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
6
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
7
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
8
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
9
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
10
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
11
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
12
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
13
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
14
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
15
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
16
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
17
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
18
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
19
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
20
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आता ‘प्रशासन राज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

राज्यात गेल्या २० दिवसांपासून सत्ता स्थापनेचा खेळखंडोबा सुरू आहे. कोणत्याही पक्षाला १४५ च्या जादुई आकड्याचे पत्र राज्यपालांना सोपविता न आल्याने अखेर मंगळवारी रात्री ८.३० पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी होताच जिल्ह्यात प्रशासनाने संपूर्ण सूत्रे आपल्या हाती घेतली.

ठळक मुद्देतिन्ही मंत्र्यांची वाहने परत घेतली : कर्मचारीही मूळ आस्थापनेवर रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून ‘प्रशासन राज’ सुरू झाले आहे. काळजीवाहू म्हणून जिल्ह्यातील तीन मंत्र्यांकडे असलेली शासकीय वाहने काढून घेण्यात आली असून त्यांच्याकडे प्रतिनियुक्तीवर असलेले शासकीय मनुष्यबळही त्यांच्या मूळ विभागात परत पाठविण्यात आले.राज्यात गेल्या २० दिवसांपासून सत्ता स्थापनेचा खेळखंडोबा सुरू आहे. कोणत्याही पक्षाला १४५ च्या जादुई आकड्याचे पत्र राज्यपालांना सोपविता न आल्याने अखेर मंगळवारी रात्री ८.३० पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी होताच जिल्ह्यात प्रशासनाने संपूर्ण सूत्रे आपल्या हाती घेतली. कालपर्यंत जिल्ह्यात काळजीवाहू म्हणून कार्यरत असलेले आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची शासकीय वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार तीनही मंत्र्यांनी आपली वाहने लगेच प्रशासनाच्या सुपूर्द केली. बुधवारी या तीनही मंत्र्यांकडे शासनाच्या विविध विभागांचे प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी-कर्मचारी काढून घेऊन त्यांच्या मूळ आस्थापनेवर सायंकाळी पाठविण्यात आले. प्रत्येक मंत्र्याकडे राज्यभरात किमान २० शासकीय अधिकारी-कर्मचारी राहत असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रपती राजवट लागल्याने मंत्र्यांच्यापुढे मंगळवारी रात्रीपासून ‘माजी’ हा शब्दप्रयोग सुरू झाला आहे. जिल्हाभर आता केवळ प्रशासनाचे राज राहणार आहे.पाच जागा मिळवूनही भाजप बाहेर२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आमदारांच्या संख्याबळाचे चित्र जैसे थे राहिले. भाजपने दोन नव्या चेहऱ्यांसह आपल्या पाच जागा कायम राखल्या. शिवसेनेने अपेक्षेनुसार दिग्रसची जागा तर राष्ट्रवादीने पुसदची जागा पुन्हा मिळविली. पुसदमध्ये केवळ चेहरा बदल पहायला मिळाला. निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-सेनेचे सरकार बसेल असे गृहित धरुन विद्यमान मंत्री पुन्हा मोर्चेबांधणीला लागले होते. दोघांनी कॅबिनेटपदी बढती मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले होते. मात्र भाजप-सेनेची बोलणी फिस्कटताच राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे नवे समीकरण जुळण्याची चिन्हे दिसू लागली. हे चित्र जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विधान परिषद व विधानसभा सदस्यांसाठी दिलासादायक ठरले आहे. हे समीकरण डोळ्यापुढे ठेऊन राष्ट्रवादीतून दोघांच्या तर काँग्रेसमधून एका आमदाराची आशा मंत्रीपदाच्या दृष्टीने पल्लवीत झाली आहे. शिवसेनेच्या गोटातून जिल्ह्याला मंत्री पद मिळणार हे निश्चित असले तरी कॅबिनेटपदी बढती मिळावी ही शिवसैनिकांची इच्छा वजा मागणी आहे. ‘सरकार स्थापनेला राज्यपालांनी सहा महिन्याचा भरपूर अवधी दिला आहे’ असे विधान बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केल्याने सरकार स्थापनेसाठी आणखी किती वेळ लागतो याकडे सर्वांच्या नजरा आहे. सरकार लवकर स्थापन व्हावे आणि राज्याचा कारभार रुळावर यावा हीच सर्वांची अपेक्षा आहे.काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या आशा पल्लवितनव्या समीकरणातील सरकारमध्ये जिल्ह्याच्या हाती मंत्रीपदाच्या निमित्ताने नेमके किती आणि काय लागते हे पाहणेही महत्वाचे ठरते. मंत्रीपदी संधी न मिळाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मंडळ-महामंडळासाठी मोर्चेबांधणी केली जाण्याची शक्यता आहे. नव्या समीकरणात मंत्रीपदाच्या कमी जागा वाट्याला येणार असल्याने जिल्ह्यात काँग्रेस व राष्टÑवादीच्या कोट्यात काही मिळते की नाही याबाबत राजकीय गोटात साशंकता पहायला मिळते.नव्या आमदारांना हवी ‘मान्यता’जिल्ह्यात आमदार म्हणून तीन नवे चेहरे निवडून आले आहेत. त्यातही उमरखेड व पुसदचे आमदार पहिल्यांदाच विधानसभेत जात आहे. मात्र अद्याप त्यांचा शपथविधी न झाल्याने त्यांच्या चेहºयावर चिंतेचे वातावरण पहायला मिळते आहे. पुन्हा निवडणुका तर लागणार नाही ना अशी हूरहूर त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. ‘शपथविधीच नाही तर आमदार कसे’ असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याने ग्रामीण भागात या नवनिर्वाचित आमदारांना अद्याप ‘मान्यता’ मिळाली नसल्याचे बोलले जाते. शपथविधी न झाल्याने हे नवे आमदारही अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते.मंगळवारी रात्री राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने मंत्र्यांकडील शासकीय वाहने परत घेण्यात आली, मनुष्यबळही मूळ आस्थापनेवर परत बोलाविण्यात आले. जिल्ह्यात आता ‘गव्हर्नर राज’ असे म्हणता येईल.- अजय गुल्हानेजिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा