शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

जनावर तस्करी रोखण्यास प्रशासन अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 5:00 AM

महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही हैद्राबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमीतपणे जनावरे नेल्या जात आहे. मागील महिन्यापासून या तस्करीत वाढ झाली आहे. गेल्या ११ ऑक्टोबर रोजी पिंपळखुटी चेकपोस्टवरील बॅरेकेटींग तोडून तेलंगणात पळून जाणाऱ्या गुरे भरून असलेल्या कंटेनरला पोलिसांनी अडवून ४० जनावरांची सुटका केली.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुक्यातून राजरोसपणे तस्करी : वाहन पास करून देण्यासाठी दलाल झाले सक्रीय, चौकशी करण्याची होतेयं मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथून जाणाऱ्या नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची तस्करी सुरूच असून मोठ्या प्रमाणावर होणारी ही तस्करी रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही हैद्राबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमीतपणे जनावरे नेल्या जात आहे. मागील महिन्यापासून या तस्करीत वाढ झाली आहे. गेल्या ११ ऑक्टोबर रोजी पिंपळखुटी चेकपोस्टवरील बॅरेकेटींग तोडून तेलंगणात पळून जाणाऱ्या गुरे भरून असलेल्या कंटेनरला पोलिसांनी अडवून ४० जनावरांची सुटका केली. ही घटना घडत नाही, तोच पुन्हा १७ ऑक्टोबरला याच चेकपोस्टवर गुरे भरून जाणाऱ्या कंटेनरला पोलिसांनी पकडून ३५ बैलांची सुटका केली. एकूण ३८ बैल असलेल्या या कंटेनरमध्ये तीन बैलांचा गुदमरून मृत्यू झाला होता. पाच-सहा दिवसाआड या घटना घडत आहे. जनावरांची वाहने तेलंगणातही पास करून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. परंतु जनावरांची तस्करी सुरूच आहे. पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तेलंगणामध्ये जनावरांची वाहने पास करून देण्याकरिता कोण मदत करतात, याचा शोध घेणे आवश्यक आहे. जनावरांची वाहने पास करून देणाऱ्या दलालांना राजकीय पाठबळ असल्याचे बोलल्या जात आहे. पोलिसांनी सखोल चौकशी करून या दलालांना बेड्या ठोकणे आवश्यक आहे. मुख्य सुत्रधार अद्यापही मोकळेच असल्याचे बोलल्या जात आहे. मागील तीन महिन्यात हैद्राबाद येथील कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेणारे जवळपास नऊ ट्रक पांढरकवडा पोलिसांनी पिपंळखुटी चेकपोस्टवर पकडले होते. ट्रकचालक व संबंधितांना अटक केल्या जाते. जनावरांची सुटका केली जाते. परंतु जनावरांची तस्करी बंद का होत नाही, हा एक संशोधनाचा विषय आहे.पांढरकवडा तालुक्यातील पशुधन आले संकटातजनावरांची तस्करीला आळा न बसता, जनावरांची तस्करी सतत सुरूच आहे. प्रशासन मात्र मुग गीळून गप्प बसले आहे. या प्रकाराकडे गंभीरतेने पाहत नसल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. गोवंश हत्याबंदी कायदा होऊनही ट्रकद्वारे कत्तलीसाठी नेली जात आहे.

टॅग्स :Smugglingतस्करी