९४ हजार गरजवंतांकडे रेशन कार्डच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:00:40+5:30

रेशन दुकानांमधून धान्य वितरित करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. यानंतर तीन महिन्याचा कोटा मंजूर झाला. मनुष्यबळाचा अभाव आणि वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणीमुळे पुरवठा विस्कळीत झाला. अखेर धान्य पोहोचले. ९५ टक्के नागरिकांना नियमित धान्य मिळाले. तर ७२ टक्के नागरिकांना मोफत धान्य मिळाले. अद्याप २८ टक्के नागरिक धान्याच्या प्रतीक्षेत आहे.

94,000 needy people do not have ration cards | ९४ हजार गरजवंतांकडे रेशन कार्डच नाही

९४ हजार गरजवंतांकडे रेशन कार्डच नाही

ठळक मुद्देमोफत धान्यासाठी दात्यांची प्रतीक्षा : लॉकडाऊन वाढल्याने २४ हजार कुटुंबांपुढील चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात गरजवंतांना रेशन दुकानांमधून नियमित धान्यासोबत मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे. यानंतरही २४ हजार कुटुंबातील ९४ हजार नागरिकांना धान्य मिळालेच नाही. यामुळे वाढत्या लॉकडाऊनसोबत त्यांना दोन घासाची चिंता पडली आहे.
रेशन दुकानांमधून धान्य वितरित करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. यानंतर तीन महिन्याचा कोटा मंजूर झाला. मनुष्यबळाचा अभाव आणि वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणीमुळे पुरवठा विस्कळीत झाला. अखेर धान्य पोहोचले. ९५ टक्के नागरिकांना नियमित धान्य मिळाले. तर ७२ टक्के नागरिकांना मोफत धान्य मिळाले. अद्याप २८ टक्के नागरिक धान्याच्या प्रतीक्षेत आहे. यासोबतच २४ हजार ४२ कुटुंब रेशन कार्ड नसल्याने अपात्र ठरले आहे. या नागरिकांना धान्याची नितांत गरज आहे. मात्र अजूनही त्यांच्यासाठी उपाययोजना झाल्या नाही. यामुळे पुढील काळात घर कसे चालवायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा झाला आहे.
जिल्ह्यात एक लाख ३३ हजार १९० क्ंिवटल धान्य नियमित स्वरूपात दुकानांमधून वितरित करण्यात येते. यासोबतच दोन लाख ४५ हजार २६० क्ंिवटल धान्य अतिरिक्त स्वरुपात उचल करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात धान्य जिल्ह्यात आणताना यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली आहे. असे असले तरी रेशन न मिळालेल्या २४ हजार कुटुंबांचा रोष पुरवठा विभागावर कायम आहे. २४ हजार कुटुंबातील ९१ हजार ८५४ नागरिकांंना धान्य हवे आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.

साखर आली, पण डाळीचे काय ?
स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ आणि गहू वितरित करण्यात येते. यासोबतच साखर आणि डाळ वितरित केली जाते. कोरोनाच्या साथरोगानंतर जिल्ह््याची डाळ आलीच नाही. साखरेसाठी अनेक पत्रव्यवहारानंतर उपलब्धतेची मान्यता मिळाली आहे. आता ही साखर पुढील महिन्यात अंत्योदय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. एका कुटुंबासाठी एक किलो साखर या दराने ही साखर ग्राहकांना २० रुपये दराने मिळणार आहे. याच सुमारास डाळीचे दर गगणाला भिडले आहे. सर्वसामान्य नागरिकांना तूरडाळ मिळावी अशी अपेक्षा आहे. यापूर्वी डाळ मिळाली होती. आता अडचणीतच डाळ न मिळाल्याने नागरिकांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: 94,000 needy people do not have ration cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.