शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

६४ गावे टंचाईक्षेत्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 10:00 PM

अपुऱ्या पावसाने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून फेब्रुवारी महिन्यातच आठ तालुक्यांची स्थिती बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई निवारण विभागाने जिल्ह्यातील ६४ गावे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केले असून दुष्काळ निवारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.

ठळक मुद्देआठ तालुक्यात स्थिती बिकट : दुष्काळ निवारण्यासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुऱ्या पावसाने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून फेब्रुवारी महिन्यातच आठ तालुक्यांची स्थिती बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई निवारण विभागाने जिल्ह्यातील ६४ गावे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केले असून दुष्काळ निवारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील जलस्रोत तळाला गेले असून भूजल पातळीही खालावत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील १६३ गावांची भूजल पातळी दीड मीटरने खाली गेली आहे. यामुळे पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीटंंचाई निवारण विभागाने यवतमाळ, कळंब, बाभूळगाव, आर्णी, राळेगाव, दारव्हा, वणी आणि नेर तालुक्यातील ६४ गावे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. यामुळे या गावात पाणीटंचाई समस्या सोडविण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहे. या ६४ गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापर्यंत ६७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. आणखी २५० विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. परंतु गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांकडून हे प्रस्ताव शासनाकडे पाठविले जात नाही, असा जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप आहे. त्यावर उपाययोजना म्हणून खास दूत नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या. या दुतामार्फत प्रस्ताव निकाली काढले जाणार आहे.जलप्रकल्पात केवळ २० टक्के पाणीजिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाण्याचा साठा झपाट्याने खाली जात आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये केवळ २० टक्केच पाणीसाठा आहे. त्यात पूस प्रकल्प १८.७८ टक्के, अरुणावती प्रकल्प १२.०९ टक्के, बेंबळा प्रकल्प १६.०३ टक्के, अडाण प्रकल्प २०.३६ टक्के, नवरगाव प्रकल्प ३२.९२ टक्के, गोखी प्रकल्प ९.३२ टक्के, वाघाडी प्रकल्प ११.८२ टक्के, सायखेड प्रकल्प ५९.९० टक्के, अधरपूस ४५.५६ टक्के, बोरगाव १०.१४ टक्के तर ९१ लघु प्रकल्पांमध्ये २२.९८ टक्के जलसाठा आहे. तर तालुक्यातील गणेशपूर, करंजगाव, तोरनाळा, तेलगव्हाण, कोहळा, पांढरी, धानोरा, बोथ, ईचोरी, जांभुळणी, सारफळी, पेटूल, खरडगाव, झोंबाडी येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.