शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात सहा महिन्यांत ६१२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2022 13:37 IST

२०१ कुटुंबांना मिळाली मदत : २२७ प्रकरणांची चौकशीच सुरू

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने मदतीचा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. यानंतरही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. मागील सहा महिन्यांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ६१२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यातील केवळ २०१ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहे.

विविध कारणांमुळे झालेली नापिकी, उत्पन्न न झाल्याने डोक्यावर वाढलेले कर्ज, वित्तीय संस्थांकडून वसुलीसाठी लावला जात असलेला तगादा, आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या झाल्या आहे. यावर नियंत्रणासाठी समुपदेशन, मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार, आदी उपाययोजना शासनाकडून आखण्यात आलेल्या आहे. गावपातळीवरही समित्या तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानंतरही शेतकरी आत्महत्या नियंत्रणात आलेल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात (१७५) झाल्या आहेत. त्या खालोखाल बुलडाणा (१५६) आणि यवतमाळ (१४३) जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहे. अकोला जिल्ह्यात ७५, तर वाशिम जिल्ह्यात ६३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. जानेवारी ते जुलै २०२२ या कालावधीतील या घटना आहेत. चौकशीची प्रकरणेही निकाली काढण्यात विलंब लावला जात असल्याचे दिसून येते. तब्बल २२७ प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

अनेक कुटुंबे या मदतीपासून वंचित

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत देण्यात येते. परंतु, अनेक कुटुंबे या मदतीपासून वंचित राहिले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धार्थ उके यांनी माहितीच्या अधिकारात उपलब्ध झालेली माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली. यातून अमरावती विभागातील शेतकरी आत्महत्येचे वास्तव पुढे आले आहे.

अमरावती विभागातील घटना

जिल्हा - आत्महत्या - मदत - अपात्र - चौकशीत

अमरावती - १७५ - ६५- १० - १००

बुलडाणा - १५६ - २८ - ६० - ६८

वाशिम - ६३ - १६ - ४२ - ५

यवतमाळ - १४३ - ५९ - ६८ - १६

अकोला ७५ - ३३ - ४ - ३८

पीक वाहून गेल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

राळेगाव (यवतमाळ) : शेतातील पीक वाहून गेल्याने चिंतेत असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील वरुड (जहागीर) येथे घडली. अंगद महादेव आडे (६२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने शनिवारी दुपारी विष घेतले. यवतमाळ येथे रुग्णालयात उपचार घेताना त्याचा रात्री मृत्यू झाला.

या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे. तो कर्जाची नियमित परतफेड करत होता. यावर्षी त्यांच्या शेतातील पीक अतिपावसाने वाहून गेले. त्यामुळे यावर्षी घेतलेले कर्ज फेडायचे कसे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल, याची चिंता त्याला लागली होती. या विवंचनेतूनच त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूVidarbhaविदर्भagricultureशेती