शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

पश्चिम विदर्भात सहा महिन्यांत ६१२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2022 13:37 IST

२०१ कुटुंबांना मिळाली मदत : २२७ प्रकरणांची चौकशीच सुरू

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने मदतीचा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. यानंतरही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. मागील सहा महिन्यांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ६१२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यातील केवळ २०१ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहे.

विविध कारणांमुळे झालेली नापिकी, उत्पन्न न झाल्याने डोक्यावर वाढलेले कर्ज, वित्तीय संस्थांकडून वसुलीसाठी लावला जात असलेला तगादा, आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या झाल्या आहे. यावर नियंत्रणासाठी समुपदेशन, मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार, आदी उपाययोजना शासनाकडून आखण्यात आलेल्या आहे. गावपातळीवरही समित्या तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानंतरही शेतकरी आत्महत्या नियंत्रणात आलेल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात (१७५) झाल्या आहेत. त्या खालोखाल बुलडाणा (१५६) आणि यवतमाळ (१४३) जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहे. अकोला जिल्ह्यात ७५, तर वाशिम जिल्ह्यात ६३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. जानेवारी ते जुलै २०२२ या कालावधीतील या घटना आहेत. चौकशीची प्रकरणेही निकाली काढण्यात विलंब लावला जात असल्याचे दिसून येते. तब्बल २२७ प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

अनेक कुटुंबे या मदतीपासून वंचित

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत देण्यात येते. परंतु, अनेक कुटुंबे या मदतीपासून वंचित राहिले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धार्थ उके यांनी माहितीच्या अधिकारात उपलब्ध झालेली माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली. यातून अमरावती विभागातील शेतकरी आत्महत्येचे वास्तव पुढे आले आहे.

अमरावती विभागातील घटना

जिल्हा - आत्महत्या - मदत - अपात्र - चौकशीत

अमरावती - १७५ - ६५- १० - १००

बुलडाणा - १५६ - २८ - ६० - ६८

वाशिम - ६३ - १६ - ४२ - ५

यवतमाळ - १४३ - ५९ - ६८ - १६

अकोला ७५ - ३३ - ४ - ३८

पीक वाहून गेल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

राळेगाव (यवतमाळ) : शेतातील पीक वाहून गेल्याने चिंतेत असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील वरुड (जहागीर) येथे घडली. अंगद महादेव आडे (६२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने शनिवारी दुपारी विष घेतले. यवतमाळ येथे रुग्णालयात उपचार घेताना त्याचा रात्री मृत्यू झाला.

या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे. तो कर्जाची नियमित परतफेड करत होता. यावर्षी त्यांच्या शेतातील पीक अतिपावसाने वाहून गेले. त्यामुळे यावर्षी घेतलेले कर्ज फेडायचे कसे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल, याची चिंता त्याला लागली होती. या विवंचनेतूनच त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूVidarbhaविदर्भagricultureशेती