शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पश्चिम विदर्भात सहा महिन्यांत ६१२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2022 13:37 IST

२०१ कुटुंबांना मिळाली मदत : २२७ प्रकरणांची चौकशीच सुरू

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने मदतीचा विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. यानंतरही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. मागील सहा महिन्यांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ६१२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यातील केवळ २०१ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहे.

विविध कारणांमुळे झालेली नापिकी, उत्पन्न न झाल्याने डोक्यावर वाढलेले कर्ज, वित्तीय संस्थांकडून वसुलीसाठी लावला जात असलेला तगादा, आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या झाल्या आहे. यावर नियंत्रणासाठी समुपदेशन, मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार, आदी उपाययोजना शासनाकडून आखण्यात आलेल्या आहे. गावपातळीवरही समित्या तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यानंतरही शेतकरी आत्महत्या नियंत्रणात आलेल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात (१७५) झाल्या आहेत. त्या खालोखाल बुलडाणा (१५६) आणि यवतमाळ (१४३) जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहे. अकोला जिल्ह्यात ७५, तर वाशिम जिल्ह्यात ६३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. जानेवारी ते जुलै २०२२ या कालावधीतील या घटना आहेत. चौकशीची प्रकरणेही निकाली काढण्यात विलंब लावला जात असल्याचे दिसून येते. तब्बल २२७ प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

अनेक कुटुंबे या मदतीपासून वंचित

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत देण्यात येते. परंतु, अनेक कुटुंबे या मदतीपासून वंचित राहिले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धार्थ उके यांनी माहितीच्या अधिकारात उपलब्ध झालेली माहिती ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली. यातून अमरावती विभागातील शेतकरी आत्महत्येचे वास्तव पुढे आले आहे.

अमरावती विभागातील घटना

जिल्हा - आत्महत्या - मदत - अपात्र - चौकशीत

अमरावती - १७५ - ६५- १० - १००

बुलडाणा - १५६ - २८ - ६० - ६८

वाशिम - ६३ - १६ - ४२ - ५

यवतमाळ - १४३ - ५९ - ६८ - १६

अकोला ७५ - ३३ - ४ - ३८

पीक वाहून गेल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

राळेगाव (यवतमाळ) : शेतातील पीक वाहून गेल्याने चिंतेत असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील वरुड (जहागीर) येथे घडली. अंगद महादेव आडे (६२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने शनिवारी दुपारी विष घेतले. यवतमाळ येथे रुग्णालयात उपचार घेताना त्याचा रात्री मृत्यू झाला.

या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे. तो कर्जाची नियमित परतफेड करत होता. यावर्षी त्यांच्या शेतातील पीक अतिपावसाने वाहून गेले. त्यामुळे यावर्षी घेतलेले कर्ज फेडायचे कसे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल, याची चिंता त्याला लागली होती. या विवंचनेतूनच त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूVidarbhaविदर्भagricultureशेती