शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

६१ हजार आदिवासींचे वनहक्क धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 2:57 PM

ज्यांचे वनहक्क दावे अंतिमत: रद्द झालेले आहेत, अशा आदिवासींना वनजमिनीवरून हुसकावून लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयालयाने दिले आहेत. या आदेशाचा फटका २२ हजार आदिवासींना बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देबिरसा क्रांतीदलाचे निरीक्षणगावस्तरीय समित्यांचा अधिकाऱ्यांकडून गैरवापर झाल्याचा आरोप

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ज्यांचे वनहक्क दावे अंतिमत: रद्द झालेले आहेत, अशा आदिवासींना वनजमिनीवरून हुसकावून लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयालयाने दिले आहेत. या आदेशाचा फटका २२ हजार आदिवासींना बसण्याची शक्यता आहे. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी गावस्तरीय वनहक्क समित्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून ३१ जानेवारीपर्यंत तब्बल ६१ हजार ६४८ दावे प्रलंबित ठेवले आहेत. त्यामुळे न्यायालयीन निर्णयाचा आधार घेऊन शासन ६० हजारांपेक्षा अधिक आदिवासी कुटुंबांना निर्वासित करणार असल्याची भीती आदिवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने १३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील १३ हजार ७१२ आदिवासी आणि ८ हजार ७८७ पारंपरिक वननिवासी असे एकंदर २२ हजार ४९९ कुटुंबे प्रभावित होणार आहेत. मात्र, वनविभाग व प्रशासनातील अधिकारी वनहक्क समित्यांचा गैरवापर करून याहून अधिक कुटुंबांना विस्थापित करणार असल्याची तक्रार आदिवासी बांधवांनी केली आहे. याबाबत बिरसा क्रांतिदलाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार पाठविली आहे.वनहक्क अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी २६ जिल्ह्यात गावपातळीवर १५ हजार २ वनहक्क समित्या तयार करण्यात आल्या आहेत. सोबतच ९४ उपविभागीय समित्या, २६ जिल्हास्तरीय वनहक्क समित्या स्थापन केल्या आहे. त्यानुसार ३१ जानेवारी २०१९ पर्यंत महाराष्ट्रातील ग्रामसभांकडे आदिवासींचे एकूण २ लाख ६५ हजार २६ वनहक्क दावे प्राप्त झाले आहेत. त्यात २ लाख ५७ हजार ११८ इतके वैयक्तिक दावे व ७ हजार ९०८ सामूहिक दावे आहेत.त्यापैकी उपविभागीय समितीने २ लाख ७ हजार १२१ वैयक्तिक दावे व ५ हजार ९०१ सामूहिक असे एकूण २ लाख १३ हजार २२ दावे जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले. जिल्हास्तरीय समितीने वैयक्तिक १ लाख ५६ हजार १९ व सामूहिक ५ हजार ३४२ असे एकूण १ लाख ६१ हजार ३१६ दावे मान्य केले आहेत. तर वैयक्तिक २६ हजार ९४८ व सामूहिक १८३ असे एकूण २७ हजार १३१ दावे नाकारले आहेत.तर दुसरीकडे ग्रामसभा, उपविभागीय समिती, जिल्हास्तरीय समितीकडे आदिवासींचे एकूण ३४ हजार ५१७ वनहक्क दावे प्रलंबित आहेत. यात ३२ हजार ८३९ वैयक्तिक व १ हजार ६७८ सामूहिक दाव्यांचा समावेश आहे. याशिवाय दावेदारांकडे परत केलेले १३ हजार ७०९ दावेही प्रलंबित आहेत. भविष्यात हे सर्व दावे नाकारले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे एकूण ६१ हजार ६४८ आदिवासी कुटुंबांना वनजमिनीवरून हुसकावून लावले जाणार.ग्रामसभांचे चौकशी अहवाल नजरेआडवनदावे नाकारताना ग्रामसभा या प्राधिकरणाचे व वनहक्क समितीचे सर्व अधिकार अर्जावर सही करण्याखेरीज शासकीय अधिकाºयांनीच वापरल्याचा आरोप बिरसाक्रांती दलाने केला आहे. कोरम पूर्ण नसतानाही ग्रामसभा गठीत केल्या. सर्व पेसा गावात ग्रामसभा गठीत करण्याची तरतूद सरकारने पाळलेली नाही. उपविभागस्तरीय समितीने वन व महसूल नकाशेही ग्रामसभांना दिलेले नाहीत. उपविभागस्तरीय, जिल्हास्तरीय समितीने ग्रामसभा स्तरावरील चौकशी अहवाल तपासलेले नाहीत. उपविभाग, जिल्हा व राज्य स्तरीय सनियंत्रण समिती यांनी विहित कार्यपद्धतीने काम केलेले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दावे प्रलंबित ठेवण्यात आले किंवा रद्द करण्यात आले, असा आरोप बिरसा क्रांतिदलाचे राज्य महासचिव प्रमोद घोडाम यांनी केला आहे.आदिवासींच्या वनहक्काबाबत अध्यादेश काढावनहक्क दावे नाकारताना स्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरली आहे की नाही, हे तापसल्याविना शासनाला प्रशासकीय कारवाई करता येणार नाही. त्यामुळे वनाधिकार अधिनियम २००६ च्या कलम सहामध्ये वनहक्क विहीत करण्याची जी कार्यपद्धती निश्चित केली आहे, त्याची पुनर्समीक्षा करण्यासाठी अध्यादेश काढणे आवश्यक आहे. आदिवासी बांधवांचे वनहक्क वाचविण्यासाठी अध्यादेश काढण्यात यावा, अशी मागणी बिरसा क्रांतीदलाने केली आहे.

टॅग्स :Governmentसरकार