शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

५७ हजार लाभार्थी घरकुलापासून वंचित

By admin | Updated: September 29, 2016 01:20 IST

घरकुलासाठी अस्तिवात आलेली ‘जनरेटेड प्रायोरीटी लीस्ट’ अर्थात जीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील अर्थात बीपीएल जनतेचे सर्व लाभ बंद करण्याचे षड्यंत्र आहे.

यवतमाळ : घरकुलासाठी अस्तिवात आलेली ‘जनरेटेड प्रायोरीटी लीस्ट’ अर्थात जीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील अर्थात बीपीएल जनतेचे सर्व लाभ बंद करण्याचे षड्यंत्र आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक गरजवंत घरकुलापासून वंचित राहणार आहे. हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी आणि गरजवंतांना घरकूल मिळवून देण्याच्या मागणीसाठी येत्या १४ आॅक्टोबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गरीबांना दारिद्र्य रेषेखालील यादीतून बाद करून जागतिक पातळीवर देश दारिद्र्यमुक्त झाल्याचे दर्शवून आपली प्रतिमा उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार प्रयत्नशील असल्याचा आरोप पवार यांनी केला. त्यासाठी देश पातळीवर मोठे षड्यंत्र रचले जात आहे. बीपीएल प्रतीक्षा यादीतील गरजवंतांना पूर्वी घरकूल देण्यात येत होते. आता त्याऐवजी जीपीएल आणण्यात आले. त्यात जवळपास १३ जाचक अटी आहे. त्यानुसार लाभार्थ्यांकडे कुडाचे घर असेल, मात्र त्याच्याकडे दुचाकी, टी.व्ही., फ्रीज आदी वस्तू असेल तर त्याला यापुढे घरकूल मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला. जिल्ह्यात २00२ मध्ये पाच लाख पाच हजार २४0 कुटुंब होते. त्यापैकी दोन लाख ३0 हजार २८३ कुटुंब दारिद्र्य रेषेखालील प्रतीक्षा यादीत होते. त्यानंतर अपिलातून पुन्हा ३२ हजार ७२४ कुटुंब त्यात समाविष्ट झाले. तसेच २0११ मध्ये केंद्रातील तत्कालीन आघाडी शासनाने आर्थिक, सामाजिक, जात गणना केली. त्यात बीपीएलचाही समावेश होता. जिल्ह्यात एक लाख २0 हजार ८१८ नागरिक बीपीएलच्या कायम प्रतीक्षा यादीत होते. मात्र आता हे सर्व रद्द करून केंद्र शासनाने ‘जीपीएल’ योजना आणली. त्यात केवळ ६२ हजार ५५६ कुटुंबाचा समावेश आहे. आता या यादीतूनही १३ जाचक अटी लादून नावे वगळण्याचे निर्देश ग्रामसभांना देण्यात आले. यातून गावागावांत भानगडी होत आहे. गावोगावी हाणामारी होत आहे. बीपीएलकडून लक्ष वळविण्यासाठी हा सर्व प्रकार केला जात असून मागेल त्याला घर देण्याची मागणी देवानंद पवार यांनी केली. प्रधानमंत्री आवास योजनेतील जाचक अटी रद्द करून विशेष बाब म्हणून १५ एकरापर्यंत शेती असलेल्यांनाही घरकूल देण्याच्या मागणीसाठी मोर्चा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, भीमराव राठोड, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरूण राऊत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)