शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ५१ शेतकऱ्यांची आत्महत्या; यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांत सर्वाधिक बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 18:14 IST

धगधगते वास्तव : प. विदर्भात ११२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शासन, प्रशासन, राजकारणी निवडणुकीत व्यस्त अन् मस्त असल्याने शेतकरी दुर्लक्षित आहे. अशा परिस्थितीत पश्चिम विदर्भात ऑक्टोबर महिन्यात तब्बल ११२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात ३१ दिवसांत ५१ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढल्याचे धक्कादायक वास्तव आहे. 

पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात सर्व जिल्हे शेतकरी आत्महत्याप्रवण आहेत. यामध्ये अमरावती विभागातील यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांत सर्वाधिक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरत आहेत. यावर्षीच्या १० महिन्यांत ९०६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात २८६ तर अमरावती जिल्ह्यात २०७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यात १३९, बुलढाणा १९३ व वाशिम जिल्ह्यात ८१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. 

नैसर्गिक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, बँकांचे आणि सावकाराचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा, मुलीचे लग्न, आजारपण यासह विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचा धीर खचून शेतकरी आत्महत्या होत आहेत. सततचा पाऊस, अतिवृष्टीने झालेले पिकांचे नुकसान त्यामुळे उताऱ्यात घट आल्याने उत्पादन खर्च पदरी पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करत आहे. 

२१ वर्षांत २१ हजार शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवली जाते. तेव्हापासून ऑक्टोबर २०२४ या कालावधीत तब्बल २०,९८० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये शासन मदत फक्त ९५६८ प्रकरणांत देण्यात आली आहे तर १०,८२२ प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली आहेत. ३४९ प्रकरणे वर्षभरापासून चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याYavatmalयवतमाळVidarbhaविदर्भAmravatiअमरावती