शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ५१ शेतकऱ्यांची आत्महत्या; यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांत सर्वाधिक बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 18:14 IST

धगधगते वास्तव : प. विदर्भात ११२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शासन, प्रशासन, राजकारणी निवडणुकीत व्यस्त अन् मस्त असल्याने शेतकरी दुर्लक्षित आहे. अशा परिस्थितीत पश्चिम विदर्भात ऑक्टोबर महिन्यात तब्बल ११२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात ३१ दिवसांत ५१ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढल्याचे धक्कादायक वास्तव आहे. 

पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात सर्व जिल्हे शेतकरी आत्महत्याप्रवण आहेत. यामध्ये अमरावती विभागातील यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांत सर्वाधिक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरत आहेत. यावर्षीच्या १० महिन्यांत ९०६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात २८६ तर अमरावती जिल्ह्यात २०७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यात १३९, बुलढाणा १९३ व वाशिम जिल्ह्यात ८१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. 

नैसर्गिक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, बँकांचे आणि सावकाराचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा, मुलीचे लग्न, आजारपण यासह विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचा धीर खचून शेतकरी आत्महत्या होत आहेत. सततचा पाऊस, अतिवृष्टीने झालेले पिकांचे नुकसान त्यामुळे उताऱ्यात घट आल्याने उत्पादन खर्च पदरी पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करत आहे. 

२१ वर्षांत २१ हजार शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवली जाते. तेव्हापासून ऑक्टोबर २०२४ या कालावधीत तब्बल २०,९८० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये शासन मदत फक्त ९५६८ प्रकरणांत देण्यात आली आहे तर १०,८२२ प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली आहेत. ३४९ प्रकरणे वर्षभरापासून चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याYavatmalयवतमाळVidarbhaविदर्भAmravatiअमरावती