शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये ५१ शेतकऱ्यांची आत्महत्या; यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांत सर्वाधिक बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 18:14 IST

धगधगते वास्तव : प. विदर्भात ११२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शासन, प्रशासन, राजकारणी निवडणुकीत व्यस्त अन् मस्त असल्याने शेतकरी दुर्लक्षित आहे. अशा परिस्थितीत पश्चिम विदर्भात ऑक्टोबर महिन्यात तब्बल ११२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात ३१ दिवसांत ५१ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढल्याचे धक्कादायक वास्तव आहे. 

पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात सर्व जिल्हे शेतकरी आत्महत्याप्रवण आहेत. यामध्ये अमरावती विभागातील यवतमाळ व अमरावती जिल्ह्यांत सर्वाधिक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरत आहेत. यावर्षीच्या १० महिन्यांत ९०६ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात २८६ तर अमरावती जिल्ह्यात २०७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यात १३९, बुलढाणा १९३ व वाशिम जिल्ह्यात ८१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. 

नैसर्गिक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, बँकांचे आणि सावकाराचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा, मुलीचे लग्न, आजारपण यासह विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचा धीर खचून शेतकरी आत्महत्या होत आहेत. सततचा पाऊस, अतिवृष्टीने झालेले पिकांचे नुकसान त्यामुळे उताऱ्यात घट आल्याने उत्पादन खर्च पदरी पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करत आहे. 

२१ वर्षांत २१ हजार शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात सन २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवली जाते. तेव्हापासून ऑक्टोबर २०२४ या कालावधीत तब्बल २०,९८० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये शासन मदत फक्त ९५६८ प्रकरणांत देण्यात आली आहे तर १०,८२२ प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली आहेत. ३४९ प्रकरणे वर्षभरापासून चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याYavatmalयवतमाळVidarbhaविदर्भAmravatiअमरावती