शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

भारत-पाक शांततेसाठी ५० हजार मुलांची ‘पीस आर्मी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 10:37 IST

भारत-पाकिस्तानातील सततचा संघर्ष हा आंतरराष्ट्रीय राजकारणातील ऐरणीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मात्र, आता या दोन्ही देशात शांततामय संबंध प्रस्थापित करण्यासाठी निरागस विद्यार्थी पुढाकार घेणार आहेत.

ठळक मुद्देलेट्स क्रॉस द बॉर्डरमहाराष्ट्रातील शिक्षकांचा ध्येयवादी प्रकल्पआठ देशांतील शिक्षकांची मदत

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारत-पाकिस्तानातील सततचा संघर्ष हा आंतरराष्ट्रीय राजकारणातील ऐरणीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मात्र, आता या दोन्ही देशात शांततामय संबंध प्रस्थापित करण्यासाठी निरागस विद्यार्थी पुढाकार घेणार आहेत. दोन्ही देशातील ५० हजार विद्यार्थ्यांची ‘पीस आर्मी’ तयार होत आहे. त्यातील ५ हजार शांतता सैनिक तयारही झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हे सैन्य कोणत्याही सरकारने तयार केलेले नाही, तर महाराष्ट्रातील एका ध्येयवादी शिक्षकाने त्याची मुहूर्तमेढ रोवून आठ देशातील शिक्षकांना सहभागी करून घेतले आहे.रोज शाळेत ‘भारत माझा देश आहे’ असे म्हणताना आपण भारतासाठी काय करतो हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. तोच प्रश्न सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या मनात निर्माण झाला आणि त्यांनी सुरू केला ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ हा प्रकल्प. व्हॉट्सअपवर लिंक तयार करून या प्रकल्पात देशभरातील शाळांचा सहभाग मिळविला. सहभागाची इच्छा दर्शविणाऱ्या ५८० शाळांपैकी महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, लुधियाना, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील १४८ शाळांची निवड केली. तेवढ्याच शाळा पाकिस्तानातील घेण्यात आल्या. त्यासाठी पाकिस्तानातील रजा वकास, हयात जहान बेग, पुरशरा लक्वी, मुस्तफा रजव्हा, अशफाक वकास या शिक्षकांनी पुढाकार घेतला. त्यांच्या माध्यमातून इस्लामाबादमधील रुट इंटरनॅशनल स्कूल, लाहोरमधील मरिहा जेएआयन स्कूल या दोन मोठ्या शैक्षणिक संस्थांच्या १४८ शाळा सहभागी झाल्या.

- असा आहे प्रकल्पसहा आठवड्यांच्या या प्रकल्पात भारत-पाकिस्तानातील मुलांचा ‘स्काईप’द्वारे ‘वन टू वन’ संवाद घडविण्यात आला. दुसºया आठवड्यात मुलांनी एकमेकांच्या देशातील साम्य आणि फरक, यावर चर्चा केली. तिसऱ्या आठवड्यात जगातील टॉप टेन शांत देशातील शिक्षकांना ‘ग्लोबल स्पिकर’ म्हणून निमंत्रित करण्यात आले. आॅस्ट्रीयातील सुसान गिलका, फिनलंडचे पेक्का ओली, कॅनडातील वर्बितो नेगी, आयर्लंडमधील मेकील पेस्तो, जपानमधील नियो होरियो यांच्यासह डेन्मार्क, न्यूझीलंड, पोर्तुगालमधील शिक्षकांनी मार्गदर्शन केले. चौथ्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात संघर्ष का होतो, याची कारणे मुलांनी एकमेकांना सांगितली. पाचव्या आठवड्यात दोन देशातील भांडण आपण कसे थांबवू शकतो, याबाबत मुलांनी आपापल्या परिने उपाय सूचविले. तर सहाव्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानचे संबंध शांततापूर्ण राहण्यासाठी मी काय करणार आहे, याबाबत मुलांनी एकमेकांशी ‘कमिटमेंट’ केल्या. या ५ हजार विद्यार्थ्यांना ‘पीस आर्मी’चे प्रमाणपत्र देण्यात आले. मायक्रोसॉफ्टतर्फे दिल्लीत या प्रकल्पाला देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक प्रकल्प म्हणून गौरविण्यात आले. हा प्रकल्प २०३० पर्यंत चार टप्प्यात चालविला जाणार असून ५० हजार विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करून घेतले जाणार आहे.मुले म्हणतात, दोन्ही देशातील बातम्या बघादोन्ही देशात शांततामय वातावरण निर्माण होण्यासाठी मुलांनी एकमेकांशी बोलताना महत्त्वाचे उपाय सूचविले. ज्या दिवशी भारताने पाकिस्तानचे सैन्य मारले अशी बातमी येईल, त्या दिवशी पाकिस्तानच्या चॅनलने ती बातमी कशी दाखविली ते पाहायचे. त्यावरून खरे काय ते ठरवायचे, असा उपाय एका मुलाने सूचविला. आपल्या ‘कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटी’ सतत ‘एक्सचेंज’ करण्याचे प्रमाण वाढवावे, असा उपाय दुसऱ्याने सूचविला.

टॅग्स :Studentविद्यार्थी