शहरं
Join us  
Trending Stories
1
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
2
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
3
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
4
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
6
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
7
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
8
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
9
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
10
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
11
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
12
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
13
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
14
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
15
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
16
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
17
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
18
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
19
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
20
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल

५०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:59 PM

गत सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. यामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्राची सर्वाधिक हानी झाली आहे. घरांची पडझड, जनावरे वाहून जाणे, वीज खांब कोसळणे, रस्ते खरडून जाणे, कालव्यांची नासधूस, या सर्व क्षेत्राचे नुकसान ५०० कोटींच्या घरात पोहोचले आहे.

ठळक मुद्देअतिवृष्टी : प्राथमिक अंदाज, शेतजमीन खरडून गेल्याने फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत सहा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. यामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्राची सर्वाधिक हानी झाली आहे. घरांची पडझड, जनावरे वाहून जाणे, वीज खांब कोसळणे, रस्ते खरडून जाणे, कालव्यांची नासधूस, या सर्व क्षेत्राचे नुकसान ५०० कोटींच्या घरात पोहोचले आहे.दारव्हा, दिग्रस, आर्णी, महागाव, उमरखेड, नेर, पुसद या सात तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ७१ टक्के पाऊस नोंदविला गेला. त्यामुळे या तालुक्यात एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. आर्णी तालुक्याने तर वार्षिक सरासरी ओलांडली आहे. हा पाऊस मासिक सरासरीच्या २०० पट अधिक आहे. अतिपावसाचा पिकांना जबर फटका बसला आहे. कृषी मालाचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेत जमिनीतूनच पूर गेल्याने पिके खरडून गेली आहे. जीवित हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. मालमत्तांचे नुकसान न मोजता येण्याजोगे आहे.नदी, नाल्यांना आलेला पूर, फुटलेले कालवे आणि खोलगट भागामुळे जिल्ह्यात ६१ हजार ९३० हेक्टरवरील पीक खरडून गेले आहे. हेक्टरी ५० हजारांप्रमाणे ३०९ कोटी रूपयांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवारातील नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून हेक्टरी नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. २०० किमी रस्ते पुरामुळे वाहून गेले आहेत. दुरूस्तीसाठी २५ कोटी रूपयांचा निधीची गरज आहे.कालवे दुरूस्तीसाठी पाच कोटींचा निधी लागणार आहे. सहा हजार ७०६ घरांची पडझड झाली. ५० हजारांप्रमाणे हे नुकसान ३३ कोटींच्या घरात आहे. २५९ जनावरे वाहून गेली आहे. तिघांचा मृत्यू झाला. ७९ लाख ७५ हजार रूपयाची मदत वितरित केली गेली. यात धान्य, कपडे, भांडे, केरोसीनचा समावेश आहे.वीज वितरण कंपनीचेही नुकसानपूर पीडित क्षेत्रात वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर कोसळले आहेत. अनेक खांब कोलमडले, तारा तुटल्या. यातून वीज वितरण कंपनीला तब्बल ५० लाख रूपयांच्या नुकसानीचा सामना करावा लागला.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती