शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २३६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 10:14 PM

जिल्ह्यातील ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर कर्जमाफीचे २३६ कोटी रूपये वळते झाले आहे. हे सर्व शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद आहेत. दरम्यान, कर्जमाफीच्या यादीतील उर्वरित ६९ हजार शेतकऱ्यांच्या कागदपत्रांतील त्रुटींचा शोध सुरूच आहे.

ठळक मुद्देकर्जमाफीची रक्कम : ६९ हजार शेतकऱ्यांच्या यादीतील त्रुट्यांचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर कर्जमाफीचे २३६ कोटी रूपये वळते झाले आहे. हे सर्व शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद आहेत. दरम्यान, कर्जमाफीच्या यादीतील उर्वरित ६९ हजार शेतकऱ्यांच्या कागदपत्रांतील त्रुटींचा शोध सुरूच आहे.जिल्ह्यातील दोन लाख ४० हजार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. त्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी कर्जमाफीची संपूर्ण रक्कम शेतकºयांच्या खात्यात वळती होईल, अशी ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात अद्याप एक छदामही त्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता. आयटी विभागाने यादीत अनेक त्रुठया काढल्याने कर्जमाफीचे गुऱ्हाळ लांबले होते. गत आठ दिवसांपासून जिल्हा बँकेचे गटसचिव ४१ हजार शेतकऱ्यांच्या यादीची छाननी करीत होते. आता एकदाची ही छाननी संपली आहे. यामुळे जिल्ह्यातील ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे २३६ कोटी रूपये जमा झाले आहेत.शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी संपल्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ६९ हजार शेतकºयांच्या नावांची दुसरी यादी आली. या यादीची आता छाननी करण्यात येत आहे. त्यातील त्रुटी दुरूस्त करण्याचे काम गटसचिव करीत आहे. सर्व त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वळती केली जाणार आहे. मात्र त्यासाठी आणखी नेमका किती कालावधी लागेल, हे सांगणे कठीण झाले आहे.राष्ट्रीयीकृत बँका माघारल्याजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली. त्यांची आता दुसऱ्या यादीची तयारी सुरू आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांच्या याद्या अद्याप गुलदस्त्यातच आहे. यामुळे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेणारे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी